शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

देशातील एकमेव पुरूषोत्तमपुरी देवस्थान विकासापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:38 IST

संपूर्ण भारत देशात एकमेव असे भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर माजलगाव तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे आहे. लोकप्रतिनिधीच्या उदासिनतेमुळे एकमेवाद्वितीय असलेले हे मंदिर अद्याप विकासापासून कोसोदूर राहिले आहे.

ठळक मुद्देआजपासून सुरू होणार अधिकमास : महिनाभर चालणाऱ्या यात्रेमध्ये येतात लाखो भाविक

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : संपूर्ण भारत देशात एकमेव असे भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर माजलगाव तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे आहे. लोकप्रतिनिधीच्या उदासिनतेमुळे एकमेवाद्वितीय असलेले हे मंदिर अद्याप विकासापासून कोसोदूर राहिले आहे. या पौराणिक अनमोल ठेव्याचे जतन करून या तीर्थक्षेत्राला विशेष पर्यटन क्षेत्राचा दर्जा देवून भुतळीच्या या पुरूषोत्तमाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा आहे. बुधवारपासून सुरू होणा-या अधिकमास यात्रेची तयारी पूर्ण झाली असून महिनाभर चालणा-या या यात्रेत महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोप-यातून भाविक दर्शनासाठी येतात.

पुरूषोत्तममास अर्थात धोंड्याचा महिना. या महिन्याला हिंदू धर्मात असाधारण महत्व असते. या महिन्यात श्रीक्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे अधिकमास उत्सव यात्रा भरतो. या पर्वकाळात महाराष्ट्रासह परराज्यातून लाखो भाविक येथे दाखल होतात. गोदावरी काठावर वसलेले हे पुरूषोत्तमपुरी गाव राष्ट्रीय महामार्ग २२२ वर माजलगाव-गेवराई दरम्यानच्या सारवरगावपासून १० कि.मी. अंतरावर आहे. दर तीन वर्षांनी येणाºया या पर्वकाळात येथे लाखो भाविक रोज येत असतात. परत पुढील तीन वर्षांनीच ही यात्रा भरते. यावेळी १६ मे पासून १३ जूनपर्यंत ही यात्रा भरणार असल्याने या यात्रेतील ग्रामस्थांच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान राज्यकर्ते येथील सोयी-सुविधांसाठी पुन्हा उदासीन होतात. त्यांना यात्रा आल्यानंतरच या ठिकाणची आठवण येते.

या तीर्थक्षेत्राला पर्यटन क्षेत्राचा विशेष दर्जा देऊन येथील रस्ते, भक्तनिवास, मंदिर दुरूस्ती, पार्किंग व्यवस्था, परिसर स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करून रस्ते विकास करणे आवश्यक आहे. परंतु लोकप्रतिनिधी व शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने भाविक भक्तांची मोठी गैरसोय होत आहे. अरूंद रस्त्यामुळे वाहनांची कोंडी होते.

पवित्र पापनाशिनी गोदावरी तटावर पुरूषोत्तमाचे हे हेमाडपंथी मंदिर असून, या मंदिराचे बांधकाम १५०० वर्षांपूर्वी झाल्याचा शीलालेख येथे आहे. या मंदिराचा कळस व बांधणी हे केदारनाथ मंदिर (उत्तराखंड) पध्दतीचे आहे व शेजारीच वरदविनायक, सहलक्षेश्वर महादेव, पार्वती पादुका मंदिर आहे व ही दोन्ही मंदिरे जुनी असल्याचे दिसते. वरदविनायक मंदिर हे वृंदावनातील कृष्णमंदिराची प्रतिकृती असल्याचे दिसते.मुख्य पुरूषोत्तम मंदिरातील पुरूषोत्तमाची मूर्ती ही गंडळी शिलेची असून ती स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. चतुर्भुज पुरूषोत्तमाच्या हातात शंख, चक्र , पद्म असून मूर्ती मनमोहक अशी आहे.

या मंदिराबाबत पुराणात आख्यायिका सांगितली जाते. गोदावरी तिरापलीकडे भस्मटेकडी असून येथे पुराणकाळी ऋषी-मुनी यज्ञयाग करत. परंतु या परिसरात शार्दूल नावाचा राक्षस यज्ञयाग उधळून लावत व पंचक्रोशीतील जनतेला छळत होता. त्याचा हा अत्याचार दिवसेंदिवस वाढत गेला. त्यामुळे ऋषीमुनींनी भगवान महाविष्णूकडे न्याय मागितला व त्यांचा धावा केल्यावरून महाविष्णूने पुरूषोत्तमाचा अवतार घेऊन या राक्षसाचा वध केला व हा पुरूषोत्तम या मंदिरात स्थिरावला. त्याने सुदर्शनाने गोदावरी शांत केली. त्यामुळे गोदावरीतील त्या ठिकाणाला चक्रतीर्थ हे नाव पडले व आजही या ठिकाणचे पाणी हे लालसर दिसत असल्याचे भक्तगण सांगतात. आजतागायत भक्तमंडळी अधिकमास महिन्यात याठिकाणी येऊन या तीर्थात स्नान करून पुरूषोत्तमाचे दर्शन घेतात.निजामाकडून न्याय, पण सरकारकडून अन्यायपौराणिकदृष्ट्या प्रसिध्द असणाºया या मंदिराला निजाम सरकारने भरघोस मदत देऊन या तीर्थक्षेत्राला न्याय देण्याचे काम केले होते, यामुळे या भागात अनेक कामे झाल्याची साक्ष दिसत आहे. परंतू आपले शासन मात्र या मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा देत नसल्याने अन्याय होत असून, मंदिराचा विकास खुंटला आहे.मंदिर व परिसर विकासापासून कोसोदूर राहिले आहे. त्यामुळे भक्तवर्गात संताप व्यक्त केला जातो. अधिकमासात सौभाग्यवती स्त्रिया येथे गोदावरीत स्नान करून पतीच्या समृध्दी व दीर्घायुष्यासाठी पुरूषोत्तमाला ३०+३ धोंडे अर्पण करतात व सुखाची कामना करतात. त्यामुळे या महिन्यात राज्यातून अनेक महिला या यात्रेत सहभागी होत असतात.मंदिरात प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या रु पात पूजा करण्याची प्रथा अनादीकाळापासून चालू आहे. हे मंदिर स्थापत्य कलेचा आदर्श नमुना असून मंदिराच्या विटा या पाण्यावर तरंगतात व मंदिरातला गरु डध्वज पंढरपुरची आठवण करून देतात.

हैदराबाद येथे ताम्रपट व तांब्याचा गरु डनिजाम राजवटीत या स्थळाला फार मोठा मान होता व निजामाने या देवस्थानच्या देखरेखीसाठी शेकडो एकर जमिनी दिल्या होत्या व याबाबत ताम्रपट देऊन त्यावर या जमिनी कोणाकडे वहितीसाठी द्याव्यात याचा उल्लेख होता. परंतु हे ताम्रपट व तांब्याचा गरुड हैदराबाद येथील पुराणवस्तू संग्रहालयात संग्रहित केला असल्याने मंदिराचा विकास खुंटला असल्याचे भाविक बोलतात.

धोंड्याचा महिनाभारतीय संस्कृतीत धोंड्याच्या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व असून, या महिन्यात पुरूषोत्तमाला ३०+३ असे सोन्याचे, चांदीचे, पुरणाचे, पेठ्याचे धोंडे अर्पण करण्याची प्रथा आहे.दर तीन वर्षांनी येणा-या या अधिकमासाचे वर्णन ‘धोंडे महात्म्य’ या ग्रंथात असून, बारा महिन्याचे बारा स्वामी असतात. परंतु उरी-सुरीच्या तेराव्या महिन्याचा स्वामी कोण होणार? या वरून पुरूषोत्तमाने हे स्वामित्व स्वीकारले व तेव्हापासून या महिन्याला पुरूषोत्तमास हे नाव पडल्याचा उल्लेख आढळतो. या महिन्यात जावयांना पुरणाचे धोंडे खाऊ घालण्याची प्रथा ही महाराष्ट्रातील घराघरात जोपासली जाते.

टॅग्स :BeedबीडtempleमंदिरMarathwadaमराठवाडा