शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

‘महावितरण’च्या मनमानीमुळे कांदा रोप वाया गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:30 IST

धारूर शहराच्या परिसरातील चिंचपूर रस्त्यावर कृषी विजेच्या लोडशेंडिंगची वेळ निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘महावितरण’चे अधिकारी, कर्मचारी मनमानी पद्धतीने ...

धारूर शहराच्या परिसरातील चिंचपूर रस्त्यावर कृषी विजेच्या लोडशेंडिंगची वेळ निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘महावितरण’चे अधिकारी, कर्मचारी मनमानी पद्धतीने वेळेत बदल करून लोडशेंडिंग करत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतातील उन्हाळी कामाचे नियोजन बिघडत आहे. या रोडवरील शेतकरी पप्पू तिवारी यांनी रविवारी दिवसा वीजपुरवठा सुरू असते. त्यामुळे कांदा लागवड हाती घेतली. कांदा रोप मोकळी केली. मात्र, सकाळी अचानकच ‘महावितरण’ने मनमानीपणे वीजपुरवठ्याची वेळ बदलली. कांदा लागवड करत असताना पाणी असल्याशिवाय लागवड करणे शक्य नाही. ‘महावितरण’कडे वीज केव्हा येणार याविषयी विचारले असता, कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे बंद झाला असल्याचे उत्तर दिले तसेच केव्हा पूर्ण दाबाने वीजपुरवठा होईल, याचीही माहिती संबंधितांना नव्हती. या मनमानी पद्धतीच्या कारभारामुळे रोप वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ‘महावितरण’च्या गलथान कारभाराची चौकशी करून दोषी अभियंत्यांवर कारवाई करत लोडशेंडिंगच्या वेळा निश्चित कराव्यात, अशी मागणीही शेतकरी पप्पू तिवारी यांनी मुख्य अभियंत्यांकडे केली आहे.