शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

थकित ऊस बिलासाठी माजलगावात अधिकाऱ्यांना कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 23:24 IST

माजलगाव : मागील आठ महिन्यांपासून ऊस बिलाचे पैसे थकविल्यामुळे सोमवारी दुपारी जय महेश कारखान्यासमोर एका शेतक-याने आत्महत्येचा प्रत्यत्न केला. वेळीच शेतक-यांनी त्यांना रोखले. संतप्त शेतक-यांनी जय महेश साखर कारखान्याच्या अधिका-यांना कोंडले होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून सदर अधिका-यांना पोलीस ठाण्यात आणले.पवारवाडी येथील जय महेश या खाजगी साखर कारखान्याने मागील वर्षी ...

माजलगाव : मागील आठ महिन्यांपासून ऊस बिलाचे पैसे थकविल्यामुळे सोमवारी दुपारी जय महेश कारखान्यासमोर एका शेतक-याने आत्महत्येचा प्रत्यत्न केला. वेळीच शेतक-यांनी त्यांना रोखले. संतप्त शेतक-यांनी जय महेश साखर कारखान्याच्या अधिका-यांना कोंडले होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून सदर अधिका-यांना पोलीस ठाण्यात आणले.

पवारवाडी येथील जय महेश या खाजगी साखर कारखान्याने मागील वर्षी आठ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. गाळप हंगाम संपून आठ महिने झाले असताना अद्यापही कारखाना प्रशासनाने मात्र गाळपासाठी आणलेल्या शेतकºयांच्या उसाचे अद्यापही दिले नाहीत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

थकीत पैशांसाठी शेतक-यांनी अनेकवेळा खेटे मारले, साखर आयुक्तांकडे तक्रारी केल्या तरीही शेतकºयांना ऊसाचे पैसे भेटले नाहीत. यामुळे सोमवारी काही शेतकºयांनी कारखाना गेटसमोर आंदोलन केले. यावेळी वडवणी तालुक्यातील देवगाव येथील बाबू भागूजी गवळी (वय ५८) यांनी सोबत आणलेले विष खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात बाजूच्या शेतकºयांनी त्यांना रोखून आत्महत्येपासून परावृत्त केले.

यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी थेट कारखान्याच्या कार्यालयात जाऊन शेतकी अधिकारी वाय. आर. कदम, एच.आर. शाखाधिकारी कैलास चौधरी, सुरक्षा अधिकारी बरुळे यांच्यासह अनेक कर्मचाºयांना त्यांच्या खोलीत कोंडून ठेवले. दोन तासानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिर्झा बेग, पोलीस उप निरीक्षक विकास दांडे, शिवसेनेचे अप्पासाहेब जाधव यांनी हस्तक्षेप करून शेतकी अधिकारी वाय. आर. कदम, एच.आर. शाखाधिकारी कैलास चौधरी, सुरक्षा अधिकारी बरुळे यांच्यासह अनेक कर्मचारी, शेतकरी यांना पोलीस ठाण्यात घेऊन आले.पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनशेतकºयांचे थकीत बिल देण्यासाठी अनेकवेळा आंदोलने केली, लेखी निवेदने दिली; परंतु कारखान्याच्या अधिका-यांनी साखर आयुक्तांपर्यंत सर्वांनाच ‘मॅनेज’ केले. बिल थकल्याने शेतकºयावर आत्महत्येची वेळ आली आहे. आता दोन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- अप्पासाहेब जाधवशिवसेना नेते

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा