वडीगोद्री (जालना ): मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांकडून होत असलेल्या विरोधानंतर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथे झालेल्या ओबीसी महा एल्गार सभेवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. ही सभा ओबीसीची नसून, बीड जिल्ह्यावर दहशत निर्माण करण्यासाठी एका विशिष्ट जातीची सभा होती, असा थेट आरोप जरांगे यांनी केला आहे.
'मराठ्यांना आता ताकद दाखवावी लागेल'
जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आता आक्रमक भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "मराठा ५०-५५ टक्के आहे, त्याच्या आकडेवारीवर कोण लक्ष देत? आता बीड जिल्ह्यातील मराठ्यांना ताकद दाखवावी लागणार आहे. मराठे कोणाला भीत नाहीत. यांना तोडीस तोड उत्तर द्यावे लागेल." बीड जिल्हा महाराष्ट्रासाठी दिशादर्शक करून दाखवावा, असे आवाहनही त्यांनी मराठा बांधवांना केले.
सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न
छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले की, भुजबळ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'डॅमेज' करण्याचे काम करत आहेत. "सरकारला बदनाम करण्यासाठी ते काम करत आहेत. आमचे शिंदे साहेब आणि अजित दादा यांना बदनाम करण्याचे हे काम आहे. परळीचे टोळी चालवणाऱ्याने हे केले, यात अजित दादांचे काही नाही."
धनंजय मुंडेंना इशारा
धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना जरांगे यांनी थेट त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रकरणांचा उल्लेख केला. "संपलेल्या माणसावर बोलू नये. मी तुमच्या वैयक्तिक मॅटरमध्ये पडत नाही. करुणा मुंडे मला भेटायला आली होती, तिने मला सांगितले, तू माझ्या नादी लागू नको." असा इशारा त्यांनी धनंजय मुंडेंना दिला.
धनंजय मुंडेंनी भुजबळांच्या नादी लागू नये
जरांगे यांनी छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यावर सर्वात गंभीर आरोप केले. जरांगे म्हणाले की, "हा जातीय दंगली घडवून आणणार आहे. गृहमंत्री यांनी त्याची जामीन रद्द करावी." तसेच, धनंजय मुंडेंनी भुजबळांच्या नादी लागू नये, कारण तो जातीचा नेता आहे, ओबीसीचा नेता नाही, असा सल्ला जरांगे यांनी दिला.
Web Summary : Manoj Jarange Patil slammed the Beed OBC rally, alleging it aimed to intimidate, not represent OBCs. He urged Marathas to show strength and accused Bhujbal of undermining the government. Jarange also cautioned Munde against Bhujbal, fearing caste-based conflict.
Web Summary : मनोज जारांगे पाटिल ने बीड ओबीसी रैली की आलोचना करते हुए आरोप लगाया कि इसका उद्देश्य ओबीसी का प्रतिनिधित्व करने के बजाय डराना था। उन्होंने मराठों से शक्ति दिखाने का आग्रह किया और भुजबल पर सरकार को कमजोर करने का आरोप लगाया। जारांगे ने मुंडे को भुजबल के खिलाफ चेतावनी दी, जाति आधारित संघर्ष का डर जताया।