शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

आता आषाढातही शुभमंगल सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:26 IST

बीड : आषाढात साधारणत: शुभकार्ये टाळली जातात. मात्र कोरोनामुळे यंदा आषाढातही लग्न केली जात आहेत. आषाढ मासात चातुर्मासाचा आरंभ ...

बीड : आषाढात साधारणत: शुभकार्ये टाळली जातात. मात्र कोरोनामुळे यंदा आषाढातही लग्न केली जात आहेत.

आषाढ मासात चातुर्मासाचा आरंभ होतो. या कालावधीत श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक पौर्णिमेपर्यंत निषिद्ध काल आहे. देवशयनी एकादशी ते प्रबोधनी एकादशीपर्यंतचा कालावधी देवांच्या निद्रेचा मानला जातो. त्यामुळे या कालावधीत लग्नकार्य होत नाही. तुलसी विवाहापासून लग्न कार्याला सुरुवात होते. मात्र अलीकडच्या काळात श्रावण, भाद्रपद आणि इतकेच नव्हे तर पक्ष पंधरवड्यातही लोक विवाह सोहळे करू लागले आहेत. कोरोमुळे विस्कळीत झालेली परिस्थिती त्याचबरोबर काम आणि व्यस्ततेमुळे पुरेसा वेळ मिळत नाही. यातच जुळवून ठेवलेली लग्न किती दिवस ठेवायची त्यामुळे लग्न उरकण्यावर भर दिला जात आहे. हे करताना मुहूर्ताकडे दुर्लक्ष करून गौण मुहूर्त, पर्यायी मुहूर्त अशी पळवाट शोधत आषाढातही शुभमंगल धुमधडाक्यात केले जात आहे.

आषाढात शुभ तारखा - चातुर्मासात लग्नकार्य निषिद्धच

धर्मबंधन न पाळण्याची नास्तिक वृत्ती वाढत आहे. स्वैर आचरणाला कोण रोखू शकतो? अत्यावश्यक बाबींमध्ये शास्त्री आषाढात परवानगी देऊ शकतात. अत्यंत अडचणी असतील तरच अशा प्रसंगी निषिद्ध कालातील किंवा गौण काळातील मुहूर्ताचाही पंचांगकर्त्यांनी विचार केलेला आहे. - एकनाथ पुजारी, बीड.

-------

आषाढापासून चातुर्मासाचा कालावधी विवाहासाठी निषिद्ध मानला गेला आहे. प्राचीन पंचांगामध्ये या तिथी नव्हत्या. आषाढ शुद्ध नवमी पर्यंत कठीण प्रसंगी काही मुहूर्त ग्राह्य धरले जातात. लग्नासाठी त्याचा आधार घेतला जातो. मात्र चातुर्मासात होणाऱ्या विवाहांना शास्त्राधार नाही. चातुर्मासात न करता तुलसी विवाहानंतरच लग्न कार्य करायला हवे. - संतोष मुळे, बीड.

-----

मंगल कार्यालये बुक

चातुर्मासत २२, २५, २६, २८, २९ जुलै असे गौण मुहूर्त आहेत. पंचागाला मानणारे चातुर्मासात लग्नकार्य करत नाहीत. परंतु बदलत्या परिस्थितीत विविध पद्धतीने पर्यायी मुहूर्त काढून लग्नसोहळे केले जात आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हौशी आयोजक विवाहासाठी मंगल कार्यालय, केटरिंग, बँड बुकिंग करत आहेत. तुरळक तारखा असल्याने व पावसाळ्यात अडचणी नकोत म्हणून बहुतांश मंगल कार्यालयेदेखील या कालावधीत आरक्षित आहेत.

---------

परवानगी ५० चीच, पण...

विवाह सोहळ्यासाठी प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. पन्नास लोकांना परवानगी आहे. विवाह आयोजन करताना विविध अटी प्रशासनाने ठरवून दिल्या आहेत. या अटींचे पालन करून विवाह करणे आवश्यक आहे. मात्र पन्नासऐवजी १० ते २० पट गर्दी जमवून विवाह सोहळे होत आहेत. काही ठिकाणी होणाऱ्या विवाहांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष तर काही ठिकाणी प्रशासनाकडून कारवायाही झाल्या आहेत.