शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

अवकाळी आणि लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांवर संकट; कापणी-मळणीला आलेला शेतमाल उघडयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 8:51 PM

निसर्गाचा कोप अन् कोरोनामुळे बळीराजा दुहेरी संकटात

- अविनाश मुडेगांवकर

अंबाजोगाई : कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन व सुरू झालेली संचारबंदी त्यातच या आठवडयात झालेली गारपीट व वादळी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे कापणीसाठी व मळणीसाठी मजूर मिळेना. शेतकºयांचा राहिलेला माल उघडयावर पडून आहे. निसर्गाचा कोप व कोरोना यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. 

अंबाजोगाई तालुक्यात आठवडाभरापूर्वी सलग दोनवेळा गारपीट व वादळी पाऊस झाला. या वादळी पावसात गहू, ज्वारी, हरभरा, मका, आंबे, टरबूज, खरबूज व भाजीपाल्यांचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणचे हरभºयाचे ढीग वादळाबरोबर विस्कटले. तर अनेक ढीग पावसात भिजले. शेतात उभी असणारी ज्वारी सुसाट वाºयामुळे आडवी पडली. भाजीपाला, टरबूज व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काढून ठेवलेला माल मळणी करण्यासाठी तर शेतात उभी असणारी ज्वारी काढण्यासाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतात माल तसाच उभा आहे. अजूनही अवकाळी पावसाचा नेम सांगता येत नसल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागही लॉकडाऊन झाला आहे. 

शासनाने पुढचे २१ दिवस घराबाहेर पडू नका असा आदेश काढल्याने ग्रामीण भागातही घराच्या बाहेर येण्यासाठी कोणी धजावत नाही. ग्रामीण भागातही संचारबंदी सुरू असल्याने शेतात जनावरांना सांभाळणे मोठ्या जिकीरीचे काम बनले आहे. मोठ्या प्रमाणात लागवड केलेला भाजीपाला शहरापर्यंत पोहचविण्यासाठी वाहतूक व्यवस्था बंद राहिल्याने आहे या ठिकाणी भाजीपाला सडू लागला आहे. अशा अनेक समस्यांनी शेतकºयांना ग्रासले आहे. 

जीव धोक्यात घालून शेतकरी शेतात

संचारबंदी व घराबाहेर न निघण्याचे आदेश असतानाही स्वत:चा जीव धोक्यात घालून शेतकरी शेतात जाऊन आपली बैलजोडी, गाई, म्हशी, यांना चारापाणी व त्यांचा सांभाळ करत आहेत. आहे हे दुध करायचे काय? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक व्यवस्था बंद पडल्याने अनेक दुध उत्पादकांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. 

गुढी बदलली पण सालदार मिळेना

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शेतातील सालदाराचा पहिला दिवस असतो. या दिवशी शेतात येऊन तो सर्व  माहिती करून घेतो व आपल्या कामाचा प्रारंभ करून वर्षभराच्या कामाचे नियोजन करतो. मात्र, या वर्षी लॉकडाऊनमध्ये गुढीपाडवा आला. सालदारही साल ठरवायला आले नाहीत. त्यामुळे अनेक कामांना खो बसल्याने स्वत: मालकालाच पुढाकार घेऊन शेतीतील कामे करण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड