शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

मयत शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणाऱ्यांना ‘वैद्यनाथ’वर बोलण्याचा अधिकार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:48 IST

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी काल परळीच्या मोर्चात केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा घणाघात आ. सुरेश धस यांनी केला आहे.

ठळक मुद्देसुरेश धस यांचा धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात : पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपास दिले प्रत्युत्तर

बीड : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी काल परळीच्या मोर्चात केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा घणाघात आ. सुरेश धस यांनी केला आहे. त्यांचे आरोप केवळ राजकीय द्वेषातून असतात, हे आता जनतेला माहीत झाले आहे, असे सांगून मयत शेतक-यांच्या जमिनी लुबाडणारांना वैद्यनाथ वर बोलण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी सुनावले.राष्ट्रवादी काँग्रेसने काल परळी येथे जो मोर्चा काढला ते एक नाटक होते. हा मोर्चा मुळातच पंकजा मुंडे यांना विरोध करण्यासाठी होता, हे सिद्ध झाले आहे. धनंजय मुंडे यांनी मोर्चात पंकजा यांच्यावर केलेले आरोप हे केवळ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले असून त्यांचा राजकीय द्वेष यानिमित्ताने पुन्हा उफाळून आला असल्याचे आ. धस यांनी म्हटले आहे. पोषण आहारा संदर्भात पंकजा यांच्यावर त्यांनी केलेला आरोप तर हास्यास्पद आहे, एवढे मोठे संवेधानिक पद असताना कुठलाही अभ्यास न करता बेछूट आरोप करण्याची सवयच त्यांना लागली आहे, सभागृहात ते पंकजा यांच्यावरील एकही आरोप सिद्ध करू शकले नाहीत, त्यामुळेच आता निवडणुकीचे निमित्त साधून हा रडीचा डाव ते खेळत आहेत असे ते म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष रसातळाला चालल्याने ते व त्यांचे नेते बिथरले असून आरोप करण्याशिवाय ते काहीही करू शकत नाहीत त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता पुन्हा एकदा त्यांना चांगली अद्दल घडवणार आहे, असे ते म्हणाले.तोडीपाणी करता, मग शेतकºयांचे पैसे का देत नाहीत ? : धसजगमित्र कारखाना काढतो म्हणून धनंजय मुंडे यांनी अनेक शेतकºयांच्या जमिनी लुबाडल्या, त्यांना खोटे चेक दिले, पैसे लाटले. याप्रकरणी शेतकºयांनी त्यांना कोर्टातही खेचले आहे, असेही आ. धस म्हणाले.तोडीपाणीचे राजकारण करता, मग त्या शेतकºयांचे पैसे का देत नाहीत? तुमचे शेतकºयांवर खरचं प्रेम असेल तर त्यांच्या लुबाडलेल्या जमिनीचा अगोदर हिशेब द्या मगच वैद्यनाथबद्दल बोला असे आ. धस म्हणाले.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पश्चात पंकजा यांनी कारखाना अतिशय हिंमतीने चालवला आहे. आतापर्यंत ऊस उत्पादकांना ६५ कोटी रुपयांचे वाटप केले आहे.वैद्यनाथ कारखान्याच्या शेतकºयांची उर्वरित रक्कमही पंकजा मुंडे लवकरच देणार आहेत. त्यासाठी कर्ज मंजूर होणारं आणि पैसे मिळणार असं दिसलं की सर्व माहिती घेऊन धनंजय मुंडे यांनी मोर्चा त्यांनी काढला.तथापि पंकजा यांनी कठीण परिस्थितीतून कारखान्याला बाहेर काढले. त्यामुळे शेतकºयांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. सभासदांना त्यांनी नेहमीच पुढाकार घेऊन मदत केली आहे.मात्र, धनंजय मुंडे केवळ सुडाचे राजकारण करून संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत, अशी टीका आ. सुरेश धस यांनी केली आहे.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेSuresh Dhasसुरेश धसPankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडे