शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 13:32 IST

सरकारने खोटी आकडेवारी दाखवून खोटी कर्जमाफी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी फक्त कागदावर आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको कर्जमुक्ती हवी, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.

बीड : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आजपासून बीड, जालन्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शिवसेनेकडून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पशुखाद्य आणि पाणी टँकर वाटप करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी युतीची चर्चा गेली खड्ड्यात आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अशा शब्दांत भाजपावर टीका केली.

खरं बोलून एकही मत मिळालं नाही तरी चालेल पण खोटं बोलून मिळालेली मते नकोत,  असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते, परंतु, हे सरकार आश्वासनाची खैरात करत आहे. तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकलात, ना राम मंदिराचा मुद्दा. आता हा मुद्दा घटनापीठाकडे टोलविला. मग, राम मंदीराचे आश्वासन दिलेच कशाला. अजूनही घोषणाबाजी चालूच आहे. घोषणा कशाला करता, अंमल करा हे सांगताना तुमचे दिवसच किती उरलेत असा प्रश्न भाजपावर टीका करताना उपस्थित केला. युतीची चर्चा गेली खड्यात जनता, शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार ते सांगा, असे बीड येथील जाहीर सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनांवर सुद्धा टीका केली. पीक विमा, सौभाग्य योजनेचे कुणाला फायदा झाला असा सवाल करत पीकविमा घोटाळा हा राफेल घोटाळ्यापेक्षा मोठा आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर केला. सरकारने घोषणांचा पाऊस बंद करावा, आधी दिलेल्या घोषणांची नीट अंमलबजावणी करावी, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. 

दुष्काळी दौऱ्याची सुरुवात त्यांनी बीड येथून केली. यावेळी शेतकऱ्यांना पशूखाद्य, पाण्याच्या टाक्याचे वाटप त्यांच्याहस्ते झाले. शेतकऱ्यांशी संवादही साधला. प्रशासकीय यंत्रणा सूस्त झाली आहे, या यंत्रणेला जागे करण्यासाठी आलो आहे. सरकारच्या घोषणा कशा फसव्या आहेत, हे सांगताना त्यांनी लोकमतच्या बातमीचा वारंवार उल्लेख करून अंक दाखविला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे व्यवसाय करण्यासाठी राज्यात कर्ज मागणाऱ्यांची संख्या ३० हजारांवर आहे आणि प्रत्यक्षात मात्र ६ हजार लोकांनाच कर्ज मिळणार, अशी बातमी लोकमतच्या बीड आवृत्तीने छापली होती. याचा उल्लेख करून ते म्हणाले की, लोकमतने छापले आहे. लोकांचे मत आहे, असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात लोकमतचा अंक दाखवून केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रBeedबीड