शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
2
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
3
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
4
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
5
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
6
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
7
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
8
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
9
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
10
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
12
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
13
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
14
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
15
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
16
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
17
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
18
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
20
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला

युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 13:32 IST

सरकारने खोटी आकडेवारी दाखवून खोटी कर्जमाफी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी फक्त कागदावर आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको कर्जमुक्ती हवी, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.

बीड : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आजपासून बीड, जालन्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शिवसेनेकडून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पशुखाद्य आणि पाणी टँकर वाटप करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी युतीची चर्चा गेली खड्ड्यात आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अशा शब्दांत भाजपावर टीका केली.

खरं बोलून एकही मत मिळालं नाही तरी चालेल पण खोटं बोलून मिळालेली मते नकोत,  असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते, परंतु, हे सरकार आश्वासनाची खैरात करत आहे. तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकलात, ना राम मंदिराचा मुद्दा. आता हा मुद्दा घटनापीठाकडे टोलविला. मग, राम मंदीराचे आश्वासन दिलेच कशाला. अजूनही घोषणाबाजी चालूच आहे. घोषणा कशाला करता, अंमल करा हे सांगताना तुमचे दिवसच किती उरलेत असा प्रश्न भाजपावर टीका करताना उपस्थित केला. युतीची चर्चा गेली खड्यात जनता, शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार ते सांगा, असे बीड येथील जाहीर सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनांवर सुद्धा टीका केली. पीक विमा, सौभाग्य योजनेचे कुणाला फायदा झाला असा सवाल करत पीकविमा घोटाळा हा राफेल घोटाळ्यापेक्षा मोठा आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर केला. सरकारने घोषणांचा पाऊस बंद करावा, आधी दिलेल्या घोषणांची नीट अंमलबजावणी करावी, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. 

दुष्काळी दौऱ्याची सुरुवात त्यांनी बीड येथून केली. यावेळी शेतकऱ्यांना पशूखाद्य, पाण्याच्या टाक्याचे वाटप त्यांच्याहस्ते झाले. शेतकऱ्यांशी संवादही साधला. प्रशासकीय यंत्रणा सूस्त झाली आहे, या यंत्रणेला जागे करण्यासाठी आलो आहे. सरकारच्या घोषणा कशा फसव्या आहेत, हे सांगताना त्यांनी लोकमतच्या बातमीचा वारंवार उल्लेख करून अंक दाखविला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे व्यवसाय करण्यासाठी राज्यात कर्ज मागणाऱ्यांची संख्या ३० हजारांवर आहे आणि प्रत्यक्षात मात्र ६ हजार लोकांनाच कर्ज मिळणार, अशी बातमी लोकमतच्या बीड आवृत्तीने छापली होती. याचा उल्लेख करून ते म्हणाले की, लोकमतने छापले आहे. लोकांचे मत आहे, असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात लोकमतचा अंक दाखवून केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रBeedबीड