शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

एकाच्या अंत्यसंस्कारावेळी तिघांच्या मृत्यूची वार्ता धडकली, चार कुटुंबांनी कर्ते पुरुष गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 13:13 IST

चौघेही गरीब कुटुंबातील असल्याने हमाली व मोलमजुरी करुन पोट भरत होते. घरातील कर्ते पुरुष गमवल्याने चारही कुटुंबे उघड्यावर आली आहेत, गावावर शोककळा पसरली आहे 

- संतोष स्वामी दिंद्रुड (बीड) : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली. मयत तिघेही माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील रहिवासी होते‌. दरम्यान, रंग देताना जिन्यावर पडल्याने याच गावातील गंभीर जखमी तरुण भारत दिलीप गायकवाड या तरुणाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. भारतवर अंत्यसंस्कार सुरु असतानाच तिघांच्या मृत्यूची वार्ता धडकली. चार तरुणांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबांनी घरातील कर्ते पुरुष गमावले आहेत.

याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, लहामेवाडी येथील लक्ष्मण सुभाष कापसे (वय ३६ वर्ष), नितीन भाऊसाहेब हुलगे (वय ३० वर्ष ), अण्णा बळीराम खटके (वय 27 वर्ष) हे तीन तरुण तेलगाव येथील जिनिंगवर मजुरीचे काम करत होते. बुधवारी सायंकाळी काम झाल्यानंतर तिघेही एकाच दुचाकीवरून गावाकडे परतत होते. दरम्यान, माजलगावकडून धारूरकडे जाणाऱ्या कारने दुचाकीला समोरासमोर जबरदस्त धडक दिली यात. यातील दोघांना चारचाकीने दूरपर्यंत फरफटत नेले. त्यामुळे दोघेजण जागेवरच ठार झाले. तर एकाचा उपचारार्थ माजलगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेले असता मृत्यू झाला. माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या सपोनि प्रभा पुंडगे कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी दाखल झाल्या.

एकाच्या अंत्यसंस्कारावेळी तिघांच्या मृत्यूची वार्तालहामेवाडी येथील भारत गायकवाड (३९) हा तरुण 27 जानेवारी रोजी देवदहीफळ येथे एका इमारतीस रंग देत असताना जिन्यावरून पडून जखमी झाला होता. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर औरंगाबाद येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु होते. बुधवारी उपचार सुरु असतानाच भारतची प्राणज्योत मालवली. दरम्यान, बुधवारी सायंकाळी गावकरी मयत भारतवर अंत्यसंस्कार करत असतानाच भीषण अपघातात गावातील तिघांचा मृत्यू झाल्याची बातमी येऊन धडकली. एकाच गावातील चार तरुण मृत झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.

चार कुटुंबांनी कर्ते पुरुष गमावलेमृत चौघेही विवाहित होते. भारत याच्या पश्चात आई-वडील, एक लहान भाऊ, पत्नी आणि दिड वर्षाची मुलगी असा परिवार आहे. आण्णा खटके यास 2 वर्षाची मुलगी व केवळ 6 महिन्याचा मुलगा आहे. नितीन हुलगे यास 7 वर्षाचा मुलगा व 10 वर्षाची मुलगी आहे तर लक्ष्मण कापसे यास 2 मुली व 1 मुलगा आहे. चौघेही गरीब कुटुंबातील असल्याने हमाली व मोलमजुरी करुन पोट भरत होते. घरातील कर्ते पुरुष गमवल्याने चारही कुटुंबे उघड्यावर आली आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातBeedबीडDeathमृत्यू