शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मराठा आरक्षण काळाची गरज, केंद्र सरकारने मध्यस्थी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:36 IST

बीड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसइबीसी) प्रवर्गांतर्गत दिलेले आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर जिल्ह्यातील ...

बीड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसइबीसी) प्रवर्गांतर्गत दिलेले आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर जिल्ह्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतर्मुख करणारा आहे. समाजातील तरुणाईसमोर आता भविष्यात प्रश्नचिन्ह आहे. आमचा प्रामाणिक 'नायक' कोण? आरक्षणाचा खरा 'टक्का' कोण? सांगेल आणि देईल? असा सवाल माझे मराठा समाज बांधव विचारत असल्याचे ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले.

३०-३५ वर्षापासून आपण संघर्ष करून हे मराठा आरक्षण मिळवलेले होते, ते आरक्षण राज्य सरकारला साधे टिकवता सुध्दा आले नाही. राज्य सरकार व अशोक चव्हाण यांना मराठा समाज कधीही माफ करणार नाही. अशोक चव्हाण यांनी या निकालाच्या अनुषंगाने तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया आ.विनायक मेटे यांनी दिली.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने मध्यस्थी करून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. तर मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. ही आपली ठाम भूमिका आहे. आज जरी हे आरक्षण रद्द केले असले तरी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा त्रुटी दूर करून याचिका दाखल करता येईल का? या बाबत पुनर्विचार व्हावा,

राज्य सरकारने या बाबतीत पुढाकार घ्यावा, असे मत आ. नमिता मुंदडा यांनी व्यक्त केले.

संपूर्णपणे समाजाची बाजू व सत्य परिस्थिती मांडण्यात सरकार अपयशी ठरल्याने आरक्षण रद्दचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. आणखी पिढ्यान‌् पिढ्या समाजाच्या बरबाद होतील, हे सत्य नाकारुन चालणार नाही, असे आ. सुरेश धस म्हणाले. तर मराठा आरक्षणप्रश्नी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. मराठा आरक्षणप्रश्नी पुनर्विलोकन करता येईल का? याबाबत तज्ज्ञांनी अभ्यास करावा, असे माजी आ. भीमसेन धोंडे म्हणाले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे एकत्र सरकार असूनदेखील ही दुर्दैवी वेळ फक्त राज्यकर्त्यांमुळेच आली आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली. कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण दिले म्हणणारे फडणवीस तोंडघशी पडले. ३७० प्रमाणेच घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण केंद्र सरकारने द्यावे, या मागणीसाठी निर्णायक लढा उभा करावा लागेल, असे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे म्हणाले.