शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

मराठा आरक्षण काळाची गरज, केंद्र सरकारने मध्यस्थी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:36 IST

बीड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसइबीसी) प्रवर्गांतर्गत दिलेले आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर जिल्ह्यातील ...

बीड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसइबीसी) प्रवर्गांतर्गत दिलेले आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर जिल्ह्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतर्मुख करणारा आहे. समाजातील तरुणाईसमोर आता भविष्यात प्रश्नचिन्ह आहे. आमचा प्रामाणिक 'नायक' कोण? आरक्षणाचा खरा 'टक्का' कोण? सांगेल आणि देईल? असा सवाल माझे मराठा समाज बांधव विचारत असल्याचे ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले.

३०-३५ वर्षापासून आपण संघर्ष करून हे मराठा आरक्षण मिळवलेले होते, ते आरक्षण राज्य सरकारला साधे टिकवता सुध्दा आले नाही. राज्य सरकार व अशोक चव्हाण यांना मराठा समाज कधीही माफ करणार नाही. अशोक चव्हाण यांनी या निकालाच्या अनुषंगाने तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया आ.विनायक मेटे यांनी दिली.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने मध्यस्थी करून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. तर मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. ही आपली ठाम भूमिका आहे. आज जरी हे आरक्षण रद्द केले असले तरी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा त्रुटी दूर करून याचिका दाखल करता येईल का? या बाबत पुनर्विचार व्हावा,

राज्य सरकारने या बाबतीत पुढाकार घ्यावा, असे मत आ. नमिता मुंदडा यांनी व्यक्त केले.

संपूर्णपणे समाजाची बाजू व सत्य परिस्थिती मांडण्यात सरकार अपयशी ठरल्याने आरक्षण रद्दचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. आणखी पिढ्यान‌् पिढ्या समाजाच्या बरबाद होतील, हे सत्य नाकारुन चालणार नाही, असे आ. सुरेश धस म्हणाले. तर मराठा आरक्षणप्रश्नी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. मराठा आरक्षणप्रश्नी पुनर्विलोकन करता येईल का? याबाबत तज्ज्ञांनी अभ्यास करावा, असे माजी आ. भीमसेन धोंडे म्हणाले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे एकत्र सरकार असूनदेखील ही दुर्दैवी वेळ फक्त राज्यकर्त्यांमुळेच आली आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली. कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण दिले म्हणणारे फडणवीस तोंडघशी पडले. ३७० प्रमाणेच घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण केंद्र सरकारने द्यावे, या मागणीसाठी निर्णायक लढा उभा करावा लागेल, असे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे म्हणाले.