शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

‘राष्टÑवादीची कागदोपत्री, आमची कामे गुणवत्तेची’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:20 IST

बीड जिल्ह्यातील विकासकामासाठी आलेल्या निधीत पूर्वीचे लोक सरकार चालवत. पूर्वी कागदोपत्री कामे केली जात होती. मात्र, आता गुणवत्ता असलेली कामे केली जातात. गेली चौदा वर्षे सत्ता भोगून सर्वसामान्याच्या कामी राष्ट्रवादी काँग्रेस आले नसल्याने त्यांना बोलायला तोंड नाही असा घणाघाती हल्लाबोल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बनसारोळा येथील जाहीर सभेत बोलताना केला.

ठळक मुद्देपालकमंत्री पंकजा मुंडेची राष्टÑवादीवर टीका : बनसारोळा येथील कार्यक्रमात वाचला विकासकामांचा पाढा

केज : बीड जिल्ह्यातील विकासकामासाठी आलेल्या निधीत पूर्वीचे लोक सरकार चालवत. पूर्वी कागदोपत्री कामे केली जात होती. मात्र, आता गुणवत्ता असलेली कामे केली जातात. गेली चौदा वर्षे सत्ता भोगून सर्वसामान्याच्या कामी राष्ट्रवादी काँग्रेस आले नसल्याने त्यांना बोलायला तोंड नाही असा घणाघाती हल्लाबोल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बनसारोळा येथील जाहीर सभेत बोलताना केला. तालुक्यातील बनसारोळा जिल्हा परिषद गटात रविवारी एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. प्रा. संगीता ठोंबरे या होत्या तर यावेळी जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, रमेश आडसकर, सभापती संदीप पाटील,ऋषिकेश आडसकर, जोगदंड, रमाकांत मुंडे आदी उपस्थित होते.पंकजा मुंडे म्हणाल्या की, बनसारोळा येथे वैद्यनाथ साखर कारखान्याच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली. पूर्वी लोकांना ग्रामविकास मंत्रालयाचा २५/१५ चा निधी माहीत नव्हता. मात्र, हे खाते माझ्याकडे आल्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावास २५/१५ अंतर्गत विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. २८०० कोटी रुपये खर्च करुन रेल्वे आम्ही आणली. गल्ली ते दिल्लीपर्यंत आमची सत्ता असताना यांनी कामे कोठून आणत विकास केला असा प्रश्न त्यांनी केला. पवार साहेबांनी जिल्ह्यात डझनभर आमदार दिले मात्र रस्ते, सिंचनाची कामे त्यांच्याकडेच केली, असे त्या म्हणाल्या. आता जिल्ह्यातील कंत्राटी कामात बोगसगिरी चालत नसल्याचे मुंडे म्हणाल्या.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व रस्ते आपण २०१९ पर्यंत पूर्ण होतील. ९१९ कोटी रुपयांचा निधी आपल्या खात्यातून दिला असून, ३ हजार बचतगट तयार केले तर पळसखेडा येथील बचत गटासही निधी दिला आहे. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढल्याचे त्यांनी नमूद केले. आ. संगीता ठोंबरे म्हणाल्या, पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेला निधी जनतेपर्यंत पोहचवला. होळ गटासाठी तब्बल ४० कोटी निधी दिला. आता केवळ भीमा अस्तरीकरण योजनेतून उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी धनेगाव धरणात सोडावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली. रमेश आडसकर म्हणाले की, यापूर्वी विकासकामांची केवळ उद्घाटने झाली. जे काम ज्यांनी आणले त्यांनीच त्याचे श्रेय घ्यावे. शिवाय दुष्काळी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. प्रास्ताविकात जि. प. सदस्या डॉ. योगिनी थोरात यांनी विकासकामांचा लेखाजोखा मांडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस