शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

‘राष्टÑवादीची कागदोपत्री, आमची कामे गुणवत्तेची’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:20 IST

बीड जिल्ह्यातील विकासकामासाठी आलेल्या निधीत पूर्वीचे लोक सरकार चालवत. पूर्वी कागदोपत्री कामे केली जात होती. मात्र, आता गुणवत्ता असलेली कामे केली जातात. गेली चौदा वर्षे सत्ता भोगून सर्वसामान्याच्या कामी राष्ट्रवादी काँग्रेस आले नसल्याने त्यांना बोलायला तोंड नाही असा घणाघाती हल्लाबोल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बनसारोळा येथील जाहीर सभेत बोलताना केला.

ठळक मुद्देपालकमंत्री पंकजा मुंडेची राष्टÑवादीवर टीका : बनसारोळा येथील कार्यक्रमात वाचला विकासकामांचा पाढा

केज : बीड जिल्ह्यातील विकासकामासाठी आलेल्या निधीत पूर्वीचे लोक सरकार चालवत. पूर्वी कागदोपत्री कामे केली जात होती. मात्र, आता गुणवत्ता असलेली कामे केली जातात. गेली चौदा वर्षे सत्ता भोगून सर्वसामान्याच्या कामी राष्ट्रवादी काँग्रेस आले नसल्याने त्यांना बोलायला तोंड नाही असा घणाघाती हल्लाबोल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बनसारोळा येथील जाहीर सभेत बोलताना केला. तालुक्यातील बनसारोळा जिल्हा परिषद गटात रविवारी एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. प्रा. संगीता ठोंबरे या होत्या तर यावेळी जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, रमेश आडसकर, सभापती संदीप पाटील,ऋषिकेश आडसकर, जोगदंड, रमाकांत मुंडे आदी उपस्थित होते.पंकजा मुंडे म्हणाल्या की, बनसारोळा येथे वैद्यनाथ साखर कारखान्याच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली. पूर्वी लोकांना ग्रामविकास मंत्रालयाचा २५/१५ चा निधी माहीत नव्हता. मात्र, हे खाते माझ्याकडे आल्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावास २५/१५ अंतर्गत विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. २८०० कोटी रुपये खर्च करुन रेल्वे आम्ही आणली. गल्ली ते दिल्लीपर्यंत आमची सत्ता असताना यांनी कामे कोठून आणत विकास केला असा प्रश्न त्यांनी केला. पवार साहेबांनी जिल्ह्यात डझनभर आमदार दिले मात्र रस्ते, सिंचनाची कामे त्यांच्याकडेच केली, असे त्या म्हणाल्या. आता जिल्ह्यातील कंत्राटी कामात बोगसगिरी चालत नसल्याचे मुंडे म्हणाल्या.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व रस्ते आपण २०१९ पर्यंत पूर्ण होतील. ९१९ कोटी रुपयांचा निधी आपल्या खात्यातून दिला असून, ३ हजार बचतगट तयार केले तर पळसखेडा येथील बचत गटासही निधी दिला आहे. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढल्याचे त्यांनी नमूद केले. आ. संगीता ठोंबरे म्हणाल्या, पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेला निधी जनतेपर्यंत पोहचवला. होळ गटासाठी तब्बल ४० कोटी निधी दिला. आता केवळ भीमा अस्तरीकरण योजनेतून उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी धनेगाव धरणात सोडावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली. रमेश आडसकर म्हणाले की, यापूर्वी विकासकामांची केवळ उद्घाटने झाली. जे काम ज्यांनी आणले त्यांनीच त्याचे श्रेय घ्यावे. शिवाय दुष्काळी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. प्रास्ताविकात जि. प. सदस्या डॉ. योगिनी थोरात यांनी विकासकामांचा लेखाजोखा मांडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस