शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
3
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
4
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
5
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
6
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
7
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
8
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
9
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
10
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
11
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
12
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
13
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
14
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
15
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
17
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
18
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
19
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
20
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...

बीड जिल्हा कृषी कार्यालयावर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:25 AM

बीड येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयासमोर सोमवारी शेतक-यांनी आंदोलन केले.

बीड : खरीप २०१८ हंगामातील शेतकऱ्यांना आगाऊ विमा भरल्याचे कारण दाखवत जिल्ह्यातील ९० हजार शेतकऱ्यांना सोयाबीन विम्याच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. ही प्रकरणे तात्काळ निकाली काढून कंपनीने सर्व पात्र शेतक-यांना लाभ द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी बीड येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयासमोर सोमवारी शेतक-यांनी आंदोलन केले.ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील ९० हजार शेतक-यांना सोयाबीन विम्याचा लाभ देण्यात आलेला नाही. या संदर्भात गेवराई तालुक्यातील डॉ. उद्धव घोडके यांनी वेळोवेळी कंपनीशी व प्रशासनाशी मागणी करुन देखील मागील पाच महिन्यांपासून कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. तक्रार निवारण करण्यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये शेतकºयांनी २०१८ खरीप विम्याच्या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत. जिल्हाधिका-यांनी देखील या तक्रारी निकाली काढण्याचे आदेश कंपनीच्या प्रतिनिधीला दिले आहेत. परंतु सोयाबीन विम्याची रक्कम अजूनही पात्र शेतकºयांच्या खात्यावर जमा झालेली नाही. ती तत्काळ जमा करावी, या मागणीसाठी डॉ. उद्धव घोडके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आत्माराम भिताडे, राजेंद्र धोतरे, ओंकार रासकर, मनोज खरात, स्वप्नील ठेंगरे यांच्यासह शेतकरी सहभागी होते.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन