महिन्यात आष्टी तालुक्यातील १२६६ जण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST2021-08-01T04:30:52+5:302021-08-01T04:30:52+5:30
कडा : थोड्या फार प्रमाणात राहिलेला कोरोना दुसऱ्या लाटेत हद्दपार होण्याच्या मार्गावर असताना आता आकडा उतरणीला लागेल, अशी परिस्थिती ...

महिन्यात आष्टी तालुक्यातील १२६६ जण कोरोनाबाधित
कडा : थोड्या फार प्रमाणात राहिलेला कोरोना दुसऱ्या लाटेत हद्दपार होण्याच्या मार्गावर असताना आता आकडा उतरणीला लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण, आता कोरोना गेला या अतिविश्वासाने नियमांचे कसलेच पालन न केल्याने आष्टी तालुक्यात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरले असुन जुलै महिन्यात आष्टी तालुक्यातील १२६६ जण कोरोनाबाधित झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे. हे संकट दिवसेंदिवस
ओढवत चालल्याचे दिसून येत आहे.
प्रशासनाचा फक्त दिखाऊपणा असल्याने नियमांचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे.
आष्टी तालुक्यात आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून त्याचबरोबर महसूल, पोलीस प्रशासनाच्या दिमतीने दिवसरात्र मेहनतीने आकडा उतरणीला लागला होता. तुरळकच रुग्ण आढळून येत होते. पण, नागरिकांनी नियमाला पायदळी तुडवत प्रशासन निष्क्रिय होऊ लागल्याने आता हा दररोज वाढत चाललेला आकडा डोकेदुखी होऊ लागला आहे.
या महिन्यात तालुक्यातील १२६६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रशासन आता रस्त्यावर उतरून जनजागृती करत आहे, निर्बंध कडक करण्यात आले आहेत. पण, तरीही नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे आता नियम मोडणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे फक्त प्रशासन बोलत असले, तरी प्रत्यक्षात काहीच होत नसल्याने आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला जबाबदार कोण, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते प्रा. संजय खंडागळे यांनी उपस्थित केला आहे.