शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

पावसाअभावी पैसा फिरेना, बाजार हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:08 IST

पावसाळी हंगामाचे ४८ दिवस होऊनही समाधानकारक पाऊस नसल्याने कृषी बाजारासह किराणा व इतर व्यावसायाला मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देउलाढाल ठप्प : खते, बियाणे बाजारात ३०० कोटींची गुंतवणूक; किराणासह इतर व्यवसायांना फटका; पुन्हा दुष्काळी सावट

बीड : पावसाळी हंगामाचे ४८ दिवस होऊनही समाधानकारक पाऊस नसल्याने कृषी बाजारासह किराणा व इतर व्यावसायाला मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी ग्राहकी नाही आणि ग्राहकीअभावी पैसा फिरेना अशा परिस्थितीमुळे बाजार हवालदिल झाला आहे. यातच मागील वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ९५ मिमी पाऊस कमी झाल्याने यंदा आणखी तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागते की काय? अशी स्थिती आहे तर पुढील ७२ दिवसात चांगला पाऊस झाला तरच हे चित्र बदलू शकणार आहे.कृषी बाजारात या हंगामात एक लाख टन खताची विक्री अपेक्षित होती. मात्र, आतापर्यंत केवळ ४० हजार टन खताची विक्री झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. पावसाअभावी ६० हजार टन खत विक्रेत्यांकडे अद्याप पडून आहे. खताच्या बाजारपेठेत जवळपास दीडशे कोटीची गुंतवणूक झालेली आहे. मात्र, ५० टक्के गुंतवणूक ठप्प झाली आहे. येथील बाजारात विविध १५ कंपन्यांचे खत येते. फेब्रुवारी-मार्चमध्ये खताच्या दरात २० टक्के वाढ झाली होती. त्यानंतर १० जुलैपासून पंधरा टक्के दर कमी झाले आहेत.बियाणे बाजारातही शुकशुकाट आहे. कपाशीच्या नऊ लाख पाकिटांपैकी पैकी केवळ सात लाख पाकिटांची विक्री झाली आहे. कपाशी बियाणांची २ लाख पाकिटे बाजारात पडून आहेत. बाजारात ७५ हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणेआले होते. मात्र विक्री केवळ ४० हजार क्विंटल झाली आहे. ३५ हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे शिल्लक आहे. याशिवाय इतर बियाणे तसेच पडून आहेत. बियाणांच्या बाजारपेठेत जवळपास दीडशे कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. मात्र, विक्री पाहता हे प्रमाण केवळ ५० टक्के इतकेच आहे. त्यामुळे बियाणे बाजारातील ७० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करायचे काय? याची चिंता व्यापाऱ्यांना लागली आहे.जिल्ह्यात कमी अधिक परंतू १०० मिमी पेक्षा कमी पाऊस झालेला असताना चांगल्या पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी २५ जूनदरम्यान पेरण्या केल्या. मोजकेच दिवस वर्दळ दिसली. २८ जूनपासून मात्र होती ती ग्राहकीही ओसरली. पावसाने मोठा खंड दिल्याने त्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. सध्या कृषी बाजारात व्यापारी ग्राहकांची प्रतीक्षा करीत बसले आहेत. मात्र पाऊसच नसल्याने बाजारात ग्राहकही दिसेना अशी परिस्थिती आहे. पाऊस नसल्याचा फटका कापडासह इतर व्यवसायालाही बसला आहे.बाजारातील या परिस्थितीचा फटका व्यापारी, शेतकºयांबरोबरच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हमाल आणि कामगारांना बसला आहे. बाजारात आवक जावक थंडावल्याने हमालांना बुरे दिन आले आहेत. मागील दुष्काळी महिन्यातही काही प्रमाणात आवक जावक होत होती. त्यामुळे दिवसाकाठी ५० ते ६०० रुपये हमाली मिळायची. मागील तीन हप्त्यात आवक-जावक ठप्प असल्याने दिवसाला ४०-५० रुपये मजुरी हाती पडत असल्याचे श्रमिक अशोक माने यांनी सांगितले. बारीश-पानी हुआ तो सब ठीक ठाक होगा साब. पाऊसच नसल्याने दिवसभर असेच बसावे लागते असे किराणा बाजारातील हमाल अब्बास भाई यांनी सांगितले. पाऊस नसल्याचा फटका कापडासह इतर व्यवसायालाही बसला आहे.बीड जिल्हा पाऊस (१ जून ते १८ जुलै)पाऊस मिमी - बीड १०४, पाटोदा १३८.८, आष्टी १०५.१, गेवराई ७४.५, शिरुर ८३.३, वडवणी ९०, अंबाजोगाई ८३.८, माजलगाव १३१.१, केज ९९.६, धारुर ९५, परळी ७०.६ (एकूण सरासरी पाऊस ९७.८ मिमी) (गतवर्षी याच कालावधीत १९३. ४ मिमी पाऊस नोंदला होता.)

टॅग्स :BeedबीडRainपाऊसMarketबाजार