शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

पावसाअभावी पैसा फिरेना, बाजार हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:08 IST

पावसाळी हंगामाचे ४८ दिवस होऊनही समाधानकारक पाऊस नसल्याने कृषी बाजारासह किराणा व इतर व्यावसायाला मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देउलाढाल ठप्प : खते, बियाणे बाजारात ३०० कोटींची गुंतवणूक; किराणासह इतर व्यवसायांना फटका; पुन्हा दुष्काळी सावट

बीड : पावसाळी हंगामाचे ४८ दिवस होऊनही समाधानकारक पाऊस नसल्याने कृषी बाजारासह किराणा व इतर व्यावसायाला मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी ग्राहकी नाही आणि ग्राहकीअभावी पैसा फिरेना अशा परिस्थितीमुळे बाजार हवालदिल झाला आहे. यातच मागील वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ९५ मिमी पाऊस कमी झाल्याने यंदा आणखी तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागते की काय? अशी स्थिती आहे तर पुढील ७२ दिवसात चांगला पाऊस झाला तरच हे चित्र बदलू शकणार आहे.कृषी बाजारात या हंगामात एक लाख टन खताची विक्री अपेक्षित होती. मात्र, आतापर्यंत केवळ ४० हजार टन खताची विक्री झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. पावसाअभावी ६० हजार टन खत विक्रेत्यांकडे अद्याप पडून आहे. खताच्या बाजारपेठेत जवळपास दीडशे कोटीची गुंतवणूक झालेली आहे. मात्र, ५० टक्के गुंतवणूक ठप्प झाली आहे. येथील बाजारात विविध १५ कंपन्यांचे खत येते. फेब्रुवारी-मार्चमध्ये खताच्या दरात २० टक्के वाढ झाली होती. त्यानंतर १० जुलैपासून पंधरा टक्के दर कमी झाले आहेत.बियाणे बाजारातही शुकशुकाट आहे. कपाशीच्या नऊ लाख पाकिटांपैकी पैकी केवळ सात लाख पाकिटांची विक्री झाली आहे. कपाशी बियाणांची २ लाख पाकिटे बाजारात पडून आहेत. बाजारात ७५ हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणेआले होते. मात्र विक्री केवळ ४० हजार क्विंटल झाली आहे. ३५ हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे शिल्लक आहे. याशिवाय इतर बियाणे तसेच पडून आहेत. बियाणांच्या बाजारपेठेत जवळपास दीडशे कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. मात्र, विक्री पाहता हे प्रमाण केवळ ५० टक्के इतकेच आहे. त्यामुळे बियाणे बाजारातील ७० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करायचे काय? याची चिंता व्यापाऱ्यांना लागली आहे.जिल्ह्यात कमी अधिक परंतू १०० मिमी पेक्षा कमी पाऊस झालेला असताना चांगल्या पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी २५ जूनदरम्यान पेरण्या केल्या. मोजकेच दिवस वर्दळ दिसली. २८ जूनपासून मात्र होती ती ग्राहकीही ओसरली. पावसाने मोठा खंड दिल्याने त्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. सध्या कृषी बाजारात व्यापारी ग्राहकांची प्रतीक्षा करीत बसले आहेत. मात्र पाऊसच नसल्याने बाजारात ग्राहकही दिसेना अशी परिस्थिती आहे. पाऊस नसल्याचा फटका कापडासह इतर व्यवसायालाही बसला आहे.बाजारातील या परिस्थितीचा फटका व्यापारी, शेतकºयांबरोबरच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हमाल आणि कामगारांना बसला आहे. बाजारात आवक जावक थंडावल्याने हमालांना बुरे दिन आले आहेत. मागील दुष्काळी महिन्यातही काही प्रमाणात आवक जावक होत होती. त्यामुळे दिवसाकाठी ५० ते ६०० रुपये हमाली मिळायची. मागील तीन हप्त्यात आवक-जावक ठप्प असल्याने दिवसाला ४०-५० रुपये मजुरी हाती पडत असल्याचे श्रमिक अशोक माने यांनी सांगितले. बारीश-पानी हुआ तो सब ठीक ठाक होगा साब. पाऊसच नसल्याने दिवसभर असेच बसावे लागते असे किराणा बाजारातील हमाल अब्बास भाई यांनी सांगितले. पाऊस नसल्याचा फटका कापडासह इतर व्यवसायालाही बसला आहे.बीड जिल्हा पाऊस (१ जून ते १८ जुलै)पाऊस मिमी - बीड १०४, पाटोदा १३८.८, आष्टी १०५.१, गेवराई ७४.५, शिरुर ८३.३, वडवणी ९०, अंबाजोगाई ८३.८, माजलगाव १३१.१, केज ९९.६, धारुर ९५, परळी ७०.६ (एकूण सरासरी पाऊस ९७.८ मिमी) (गतवर्षी याच कालावधीत १९३. ४ मिमी पाऊस नोंदला होता.)

टॅग्स :BeedबीडRainपाऊसMarketबाजार