निधी पळविण्याचे मनसुबे उधळले !

By Admin | Updated: August 17, 2014 00:13 IST2014-08-17T00:13:08+5:302014-08-17T00:13:08+5:30

संजय तिपाले , बीड दलित वस्ती विकासासाठी आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या पळवापळवीला ‘कोल्हे पॅटर्न’ने यंदा चांगलाच दणका दिला आहे. निधीसाठी दरवर्षी होणारी रस्सीखेच यावेळी नाही.

Money laundering money! | निधी पळविण्याचे मनसुबे उधळले !

निधी पळविण्याचे मनसुबे उधळले !




संजय तिपाले , बीड
दलित वस्ती विकासासाठी आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या पळवापळवीला ‘कोल्हे पॅटर्न’ने यंदा चांगलाच दणका दिला आहे. निधीसाठी दरवर्षी होणारी रस्सीखेच यावेळी नाही. त्यामुळे दलित वस्त्यांतील विकासाचा ‘बॅकलाग’ तर भरुन निघेलच शिवाय अनावश्यक खर्चालाही ‘ब्रेक’ लागणार आहे. समाजकल्याणकडून १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून दायित्वाचे ७ कोटी वजा जाता १३ कोटी रुपये खर्चासाठी शिल्लक राहतात.
समाजकल्याण विभागाकडून दलित वस्त्यांमध्ये वीज, नाल्या, रस्ता, समाजमंदिर, पाणवठे आदी कामे करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो़ जिल्हा नियोजन समितीकडून हा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात येतो़ गतवर्षी १३ कोटी रुपये आले होते़ मात्र निधी वाटपावरुन चांगलेच राजकारण रंगले होते़ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ अशोक कोल्हे हे रजेवर गेल्यानंतर निधी वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली़
मात्र या निधी वाटपात विशिष्ट भागाचा प्रभाव राहिल्याच्या तक्रारी झाल्या़ दोन वर्षापूर्वी डॉ़ कोल्हे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता़ तेव्हा त्यांनी ग्रामपंचायतींमधील अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने निधी वाटपाची आॅनलाईन प्रक्रिया राबविली होती़ त्यामुळे दलित वस्ती विकासासाठीच्या निधीपासून वंचित राहिलेल्या गावांना न्याय मिळाला होता़
आता यावर्षी देखील अशाच पध्दतीने निधी वाटप होणार आहे़ यासाठी तालुकानिहाय कामांची मागणी करण्यात आली असून चढत्या क्रमाने निधी वाटप केले जाणार आहे़ ज्या गावांना आतापर्यंत निधीच मिळाला नाही, ज्या गावांना अत्यल्प निधी मिळाला अशा गावांना प्राधान्य दिले जाणार आहे़ दरम्यान गटनेते मदनराव चव्हाण यांनी सांगितले की, निधी वाटपात वंचित गावांना न्याय मिळत असेल तर ही चांगलीच बाब आहे़ कामांसाठी आर्थिक व्यवहार करु नयेत, असे आवाहन त्यांनी केले़
अनुशेष भरुन निघेल
समाजकल्याण कडून येणारा निधी योग्य पध्दतीने खर्च झाला पाहिजे़ त्यासाठी दोन वर्षापूर्वी आॅनलाईन प्रक्रिया राबविली होती़ यावर्षी ही प्रक्रिया राबविण्याची गरज पडेल, असे वाटत नाही़ कारण बहुतांश पदाधिकाऱ्यांनी सूचविलेली कामे निकष पूर्ण करुनच सूचविली आहेत़ पदाधिकाऱ्यांचे सहकार्य आहे त्यामुळे निधी वाटप योग्य पध्दतीने होईल, असा विश्वास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ अशोक कोल्हे यांनी व्यक्त केला़

Web Title: Money laundering money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.