मोबाइल रेंजची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST2021-07-05T04:21:17+5:302021-07-05T04:21:17+5:30
पाटोदा : तालुक्यात दोन महिन्यांपासून बीएसएनएलच्या ग्राहकांना वेळोवेळी खंडित सेवेचा त्रास होत आहे. अनेक वेळा रेंज मिळत नसल्याने मोबाइलधारकांना ...

मोबाइल रेंजची अडचण
पाटोदा : तालुक्यात दोन महिन्यांपासून बीएसएनएलच्या ग्राहकांना वेळोवेळी खंडित सेवेचा त्रास होत आहे. अनेक वेळा रेंज मिळत नसल्याने मोबाइलधारकांना त्रास होत आहे. सुरळीत सेवेची मागणी होत आहे.
दारूविक्री वाढली
आष्टी : तालुक्यात ग्रामीण भागात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी स्थानिक महिलांसह नागरिक दारूबंदीची मागणी करतात. तरीही, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
रस्त्याची दुरवस्था
बीड : तालुक्यातील चौसाळा गावांतर्गत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, पूर्वी हा महामार्ग होता, मात्र बायपास झाल्यामुळे या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून रस्ता दुरुस्तीची मागणी आहे.
कठडे गायब
बीड : तालुक्यात अनेक ठिकाणी पुलांना बसविण्यात आलेले लोखंडी कठडे गायब झाले आहेत. अनेक मद्यपी अथवा चोरट्यांनी पुलाला बसवलेले लोखंडी पाइप तोडून भंगारमध्ये नेऊन विकले. त्यामुळे वाहनांना पुलावरून जाताना धोका निर्माण होत आहे.
डासांचे प्रमाण वाढले
अंबाजोगाई : शहर व नव्याने विकसित होत असलेल्या सिल्व्हरसिटी परिसरात अद्याप नाल्याचे बांधकाम न झाल्याने पाण्याचा डोह साचल्याने डास झाले आहेत. डास निर्मूलनासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.