शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

राज्यातील मंत्री रोज सकाळी विचार मांडतात; मात्र जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी एकावरच टीका करतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 17:43 IST

MP Pritam Munde: ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर अध्यादेश हा आतापुरता दिलासा, येणाऱ्या काळातील निवडणुकांचे काय ?

बीड : राज्य सरकारमधील मंत्री रोज सकाळी आपले विचार मांडतात, परंतु लोकांच्या प्रश्नांवर भाष्य करण्याऐवजी ते केवळ एका व्यक्तीवर बोलतात, हे दुर्दैवी आहे अशी खोचक टीका करत खासदार प्रीतम मुंडे ( MP Pritam Munde ) यांनी आज राष्ट्रवादींच्या मंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाना साधला. तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सरकारने तातडीने कारवाई करावी, अध्यादेश काढून आतापुरता दिलासा मिळाला आहे. मात्र येणाऱ्या काळातील निवडणुकांचे काय ? (MP Pritam Munde criticizes State Government ) असा सवाल खा. मुंडे यांनी केला. 

खा. प्रीतम मुंडे यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत आज राज्य सरकारवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या,  भाजपने केलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे राज्य सरकारचे डोळे उघडले आणि त्यांनी ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी अध्यादेश काढला. इम्पिरिअल डेटा मिळणे कठीण काम नाही. परंतु, राज्य सरकारने तारीख पे तारीख केले, यामुळे ओबीसींवर अन्याय झाला. याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. अध्यादेश आताच्या निवडणुकांसाठी लागू असला तरी येत्या काळात पालिका, जिल्हा परिषद अशा संपूर्ण राज्यात निवडणुका आहेत  येणाऱ्या काळात आणखी निवडणुका आहेत. सरकारने यावर तातडीने कारवाई करून न्याय मिळवून द्यावा. आज समाजातील कोणताही घटक राज्य सरकारच्या कामगिरीवर खुश नाही, अशी जोरदार टीकाही खा. मुंडे यांनी यावेळी केले. तसेच सर्वसामान्य नागरिकांनी सरकारच्या कामगिरीवर लक्ष ठेवून येत्या काळात त्यांना त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

राज्याकडून रेल्वेसाठी मदत नाहीबीडच्या रेल्वेसाठी राज्य आणि केंद्र सरकार हे दोघे मदत करणार होते. मात्र,  राज्य सरकारकडून मदत मिळत नाही. आतापर्यंत केंद्राने भरपूर मदत केली, राज्याने केवळ १९ कोटी दिले. राज्य सरकारने निधी द्यावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. जर निधी उपलब्ध झाला तर २०२४ पर्यंत रेल्वेचे काम पूर्ण होईल असेही त्या म्हणाल्या. 

 विधानपरिषद निवडणुकीत डावलले नाही राज्य विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. यात पंकजा मुंडे यांना पुन्हा डावले गेले का ? असे  खा. प्रीतम मुंडे यांना विचारण्यात आले. यावर या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडणूक येणाऱ्या विधानपरिषद आमदारांच्या आहेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भातील जागेसाठी मराठवाड्यातील पंकजा मुंडे यांना कसे उभे राहता येणार, असे स्पष्टीकरण खा. मुंडे यांनी दिले.

टॅग्स :Pritam Mundeप्रीतम मुंडेBJPभाजपाOBC Reservationओबीसी आरक्षणPankaja Mundeपंकजा मुंडे