गेवराई : गेल्या काही महिन्यांपूर्वी येथील महसूल विभागातील निवडणूक विभागाच्यावतीने नवीन मतदान कार्ड काढण्याची मोहीम सुरू होती. मात्र, या मोहिमेत निवडणूक विभागाच्या गलथान कारभारामुळे नवीन मतदान कार्डावर आडनाव, नांव, पत्ता चुकीचा आल्याने नागरिकांना विविध कामात अडचणी येत आहेत. तरी या चुका झालेले मतदान कार्ड दुरूस्त करून द्यावे, अशी मागणी होत आहे.
येथील महसूल विभागातील निवडणूक विभागात गेल्या काही महिन्यांपूर्वी शहरातील व ग्रामीण भागातील मतदारांचे मतदान कार्ड हे नवीन पद्धतीने बनविण्याची मोहीम राबविण्यात आली. यात अनेकांनी आपले नवीन छायाचित्र, नाव, आडनाव, पत्त्यासह विविध मजकूर भरून अर्ज दिले होते. नवीन कार्ड पण आले. मात्र, येथील निवडणूक विभागाच्या गलथान कारभारामुळे नवीन मतदान कार्डात नाव, आडनाव, पत्त्यासह अनेक चुका झाल्याने नागरिकांना या चुकांचा त्रास आता विविध शासकीय कामात होऊ लागला आहे. यात बँक, दुय्यम निबंधक कार्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय यासह विविध शैक्षणिक कामात अडचणी निर्माण होत असून चुका झालेले मतदान कार्ड त्वरित दुरूस्त करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अशा आहेत नावात, पत्त्यात चुका
सारंगधर साकेच्या नावाऐवजी सर्गधर झाले आहे. तर त्यांचा पत्ता सावतानगर असा असतांना सावंतनगर असा झाला आहे. त्यांच्या पत्नीच्या मतदान कार्डावर देखिल पत्ता व पतीचे नाव चुकले आहे. यासह अनेकांच्या मतदान कार्डवर चुका आहेत.
संगणकामुळे किंवा इतर कशामुळे काही चुका झाल्या असतील तर त्या मतदान कार्डावरील चुका दुरुस्त करून दिल्या जातील, असे येथील निवडणूक विभागातील अधिकारी कैलास सुतार यांनी सांगितले.
060721\20210705_114058_14.jpg~060721\20210705_114015_14.jpg~060721\20210705_114028_14.jpg