शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतचे प्रतिनिधीच बनले ‘देवदूत’; कडी नदीच्या पुरातून दोन कुटुंबांना बाहेर काढून वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 19:14 IST

नदीपात्राच्या मध्यभागी असलेल्या शेतीत राहणारी दोन कुटुंबे पुराच्या पाण्याने वेढली गेली. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की, त्यांना बाहेर पडणे अशक्य झाले होते.

कडा (बीड) : आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी गावात सोमवारी पहाटे मुसळधार पावसामुळे कडी नदीला आलेल्या महापुरात अडकलेल्या दोन कुटुंबांसाठी 'लोकमत'चे प्रतिनिधी नितीन कांबळे आणि त्यांचे सहकारी प्रदीप साबळे देवदूत बनून धावले. नदीच्या दोन्ही बाजूने पाण्याचा प्रचंड प्रवाह वाहत असताना, त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, ही धोक्यातील कुटुंबे सुरक्षित बाहेर काढली आणि माणुसकीचे दर्शन घडवले.

सोमवारी पहाटेपासून सुरू झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे घाटापिंपरी परिसरात हाहाकार उडाला. कडी नदी आणि आजूबाजूचे ओढे दुथडी भरून वाहत होते. नदीपात्राच्या मध्यभागी असलेल्या शेतीत राहणारी दोन कुटुंबे पुराच्या पाण्याने वेढली गेली. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की, त्यांना बाहेर पडणे अशक्य झाले होते. त्यांच्या घराभोवती पाण्याचा वेढा वाढत असल्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती.

पत्रकार म्हणून कर्तव्य आणि माणुसकीया घटनेची माहिती मिळताच, ‘लोकमत’चे प्रतिनिधी नितीन कांबळे आणि त्यांचे सहकारी प्रदीप साबळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. 'बातमी कव्हर करायची' या भूमिकेऐवजी त्यांनी 'माणुसकी वाचवायची' या भूमिकेतून परिस्थितीकडे पाहिले. पुराचा जोर मोठा असूनही, त्यांनी कोणतीही भीती न बाळगता पाण्यात उडी घेतली. कमरेपर्यंत पाण्यातून मार्ग काढत ते अडकलेल्या कुटुंबांपर्यंत पोहोचले. त्यांनी कुटुंबातील सदस्यांना धीर दिला आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास मदत केली. यामध्ये लहान मुले, महिला आणि वृद्ध व्यक्तींचा समावेश होता. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला.

‘बातमी देण्यापलीकडचे काम’या धाडसी आणि संवेदनशील कामगिरीमुळे नितीन कांबळे आणि प्रदीप साबळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या कृतीमुळे नैसर्गिक आपत्तींच्या काळात पत्रकारांची भूमिका केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसते, तर ती समाजसेवेची आणि मदतीचीही असू शकते, हे सिद्ध झाले आहे. एका बातमीदाराने फक्त घटनेची नोंद न घेता, फक्त कॅमेरात कैद न करता, त्यातील पीडितांना मदत करून एक नवा आदर्श घालून दिला आहे.

अभिनंदनाचा वर्षाव या घटनेमुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्यांना तातडीने मदत पोहोचवणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. समाजासाठी असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून केलेल्या या धाडसी कामगिरीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :BeedबीडfloodपूरLokmatलोकमत