शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

लोकमतचे प्रतिनिधीच बनले ‘देवदूत’; कडी नदीच्या पुरातून दोन कुटुंबांना बाहेर काढून वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 19:14 IST

नदीपात्राच्या मध्यभागी असलेल्या शेतीत राहणारी दोन कुटुंबे पुराच्या पाण्याने वेढली गेली. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की, त्यांना बाहेर पडणे अशक्य झाले होते.

कडा (बीड) : आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी गावात सोमवारी पहाटे मुसळधार पावसामुळे कडी नदीला आलेल्या महापुरात अडकलेल्या दोन कुटुंबांसाठी 'लोकमत'चे प्रतिनिधी नितीन कांबळे आणि त्यांचे सहकारी प्रदीप साबळे देवदूत बनून धावले. नदीच्या दोन्ही बाजूने पाण्याचा प्रचंड प्रवाह वाहत असताना, त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, ही धोक्यातील कुटुंबे सुरक्षित बाहेर काढली आणि माणुसकीचे दर्शन घडवले.

सोमवारी पहाटेपासून सुरू झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे घाटापिंपरी परिसरात हाहाकार उडाला. कडी नदी आणि आजूबाजूचे ओढे दुथडी भरून वाहत होते. नदीपात्राच्या मध्यभागी असलेल्या शेतीत राहणारी दोन कुटुंबे पुराच्या पाण्याने वेढली गेली. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की, त्यांना बाहेर पडणे अशक्य झाले होते. त्यांच्या घराभोवती पाण्याचा वेढा वाढत असल्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती.

पत्रकार म्हणून कर्तव्य आणि माणुसकीया घटनेची माहिती मिळताच, ‘लोकमत’चे प्रतिनिधी नितीन कांबळे आणि त्यांचे सहकारी प्रदीप साबळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. 'बातमी कव्हर करायची' या भूमिकेऐवजी त्यांनी 'माणुसकी वाचवायची' या भूमिकेतून परिस्थितीकडे पाहिले. पुराचा जोर मोठा असूनही, त्यांनी कोणतीही भीती न बाळगता पाण्यात उडी घेतली. कमरेपर्यंत पाण्यातून मार्ग काढत ते अडकलेल्या कुटुंबांपर्यंत पोहोचले. त्यांनी कुटुंबातील सदस्यांना धीर दिला आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास मदत केली. यामध्ये लहान मुले, महिला आणि वृद्ध व्यक्तींचा समावेश होता. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला.

‘बातमी देण्यापलीकडचे काम’या धाडसी आणि संवेदनशील कामगिरीमुळे नितीन कांबळे आणि प्रदीप साबळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या कृतीमुळे नैसर्गिक आपत्तींच्या काळात पत्रकारांची भूमिका केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसते, तर ती समाजसेवेची आणि मदतीचीही असू शकते, हे सिद्ध झाले आहे. एका बातमीदाराने फक्त घटनेची नोंद न घेता, फक्त कॅमेरात कैद न करता, त्यातील पीडितांना मदत करून एक नवा आदर्श घालून दिला आहे.

अभिनंदनाचा वर्षाव या घटनेमुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्यांना तातडीने मदत पोहोचवणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. समाजासाठी असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून केलेल्या या धाडसी कामगिरीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :BeedबीडfloodपूरLokmatलोकमत