शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव आगाराच्या खराब बसमुळे प्रवाशांची एसटीला पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 18:00 IST

आगाराअंतर्गत असणार्‍या अनेक बस खटारा झाल्यामुळे झाल्यामुळे प्रवासी या आगारातून सुटणार्‍या बस गाड्यांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देसध्या आगारात असणार्‍या ५९ बस पैकी ६ बस खराब झालेल्या आहेत. तर ६ बस या दुरुस्तीसाठी गेलेल्या आहेत.दोन बसच्या काचा या खराब रस्त्यामुळे निखळून पडल्यामुळे त्या बस सोडता येत नाहीत.

माजलगाव (बीड) : आगाराअंतर्गत असणार्‍या अनेक बस खटारा झाल्यामुळे झाल्यामुळे प्रवासी या आगारातून सुटणार्‍या बस गाड्यांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. यातून अवैध वाहतुकीला चांगलेच प्रोत्साहन मिळत आहे. स्थानिक व्यवस्थापन आणि वरिष्ठांच्या दुर्लक्षतेमुळे माजलगाव आगाराचे नुकसान होत आहे. 

माजलगाव बस आगार हे नेहमी या-ना त्या कारणावरून चर्चेत असते. सध्या आगारात असणार्‍या ५९ बस पैकी ६ बस खराब झालेल्या आहेत. तर ६ बस या दुरुस्तीसाठी गेलेल्या आहेत. तसेच दोन बसच्या काचा या खराब रस्त्यामुळे निखळून पडल्यामुळे त्या बस सोडता येत नाहीत. आगारातील एकूण ५९ बसपैकी १४ बस या निकामी असल्यामुळे येथील आगार प्रमुखांची मोठी पंचाईत झाली आहे. आगार प्रमुखांना उपलब्ध असलेल्या बसेसच्या आधारे   व्यवस्थापन सांभाळताना  तारेवरची कसरत करावी लागत आहे. आगारातील बसेस वेळेवर सोडण्यासाठी देखील मोठ्या अडचणी येत आहेत. त्यातही ज्या बसेस चालू आहेत त्यांची अवस्था देखील काही व्यवस्थित नाही.

नेहमी या-ना त्या कारणावरून या बसेस ‘फेल’ होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठा वैताग होताना पहावयास मिळत असून बसेसच्या या  अवस्थेमुळे प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळताना पाहावयास मिळत आहेत. प्रवाशांनी बसकडे पाठ फिरवल्यामुळे अवैध वाहतूकदारांचे उखळ पांढरे होत आहे.  बीड विभागात चांगले उत्पन्न मिळवून देणारे माजलगाव आगार मागील काही महिन्यांंपासून खराब बसमुळे चर्चेत असून प्रवाशांच्या पाठ फिरवणीमुळे  सर्वसामान्यांच्या एसटीचा प्रवास तोट्याकडे जाताना दिसत आहे. 

थंडीमुळे प्रवासी काकडू लागलेसध्या हिवाळ्याचे दिवस असून थंडी देखील मोठ्या प्रमाणावर पडलेली आहे. माजलगाव आगारातील अनेक गाड्यांचे काच निखळलेले असल्यामुळे सकाळच्या वेळी प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. थंडीने काकडून जाण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. त्यामुळे सकाळी व संध्याकाळच्यावेळी प्रवासी बसने प्रवास करण्यास टाळाटाळ करीत आहेत. जे प्रवासी मजबुरीने प्रवास करीत आहेत, ते मात्र काकडून गेल्याचे पहावयास मिळत आहे.

रस्ता खराब असल्याने दयनीय स्थिती माजलगाव तालुक्यातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असल्याने गाड्या खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्ते दुरूस्त करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकर्‍यांना  अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही काही उपयोग होत नसल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करण्याची वेळ आली आहे.    - एस. पी. डोके, आगार प्रमुख, माजलगाव

टॅग्स :state transportएसटीBeedबीड