शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

बीडसह ३५ जिल्ह्यांमध्ये कुष्ठरूग्ण शोध अभियानाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 12:51 IST

राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभागाच्यावतीने १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे.

ठळक मुद्देआशासेविकांच्या संपाचा परिणाम  आरोग्य कर्मचाऱ्यांनीच घेतली माहिती

बीड : जिल्ह्यात शुक्रवारपासुन कुष्ठरूग्ण शोध अभियानाला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी आशा सेविकांच्या संपाचा परिणाम या मोहिमेवर जाणवला. हा संप मिटेपर्यंत आरोग्य कर्मचारीच घरोघरी जावून माहिती घेणार आहेत. राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभागाच्यावतीने १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे. असंसर्गजन्य आजाराचीही माहिती घेतली जात आहे. घाटनांदुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सभापती राजेसाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरूवात झाली.

निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकर शोधून त्यांना तात्काळ औषध उपचाराखाली आणून नवीन कुष्ठरुग्ण शोधून विविध औषधोपचाराद्वारे या संसर्गाची साखळी खंडित करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. कुष्ठरोगाविषयी जनजागृती करून कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी योग्य औषधोपचाराचे महत्त्व संबंधितांना पटवून दिले जात आहे. तसेच कुटूंबातील प्रत्येक व्यक्तिची आणि त्यांना असलेल्या आजाराची माहिती घेतली जात आहे. पथकाद्वारे गृहभेटी देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाचारण केले जात आहे. याबरोबरच असंसर्गजन्य रोगांचीही माहिती घेतली जात आहे. ३० वर्षापेक्षा अधिक वयोगटातील लोकांची शारीरिक तपासणी करून उच्च रक्तदाब मधुमेह व कर्करोग याबाबत सर्वेक्षण केले जात आहे.  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.कमलाकर आंधळे, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत. 

अशी आहे यंत्रणाहे सर्वेक्षण करण्यासाठी १ पुरूष व १ महिला असलेले १८६५ पथक, प्रत्येक ५ पथकामागे १ पर्यवेक्षक असे ३६९ पर्यवेक्षक काम पहात आहेत. ग्रामीण १०० टक्के तर शहरात ३० टक्के सर्वेक्षण करण्याचे उद्दीष्ट आरोग्य विभागासमोर आहे. आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य सहायीका, आरोग्य सहायक यांनी पहिल्या दिवशी सर्वेक्षण केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठकया विषयासह आरोग्य विभागातील इतर विविध प्रश्नांवर जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांण्डेय यांच्या अध्यतेखाली बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा  शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, क्षयरोग अधिकारी डॉ.कमलाकर आंधळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, सीईओ व आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. संजय सुर्यवंशी हे मोहिमेची माहिती घेत आहेत.

संप मिटल्यास वेग येईल १३ ते २८ सप्टेंबरदरम्यान ही मोहीम चालणार आहे. पीएचसीतील कर्मचाऱ्यांनीच पहिल्या दिवशी माहिती घेतली. आशांचा संप मिटल्यावर मोहिमेत आणखी गती येईल. हे उद्दीष्ट यशस्वी पूर्ण करण्यासाठी यंत्रणा काम करीत आहे. नागरिकांनीही सहकार्य करावे. जिल्हाधिकारी, सीईओ, डीएचओ, सीएस यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. बैठकही झाली.- डॉ.कमलाकर आंधळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, बीड

टॅग्स :Healthआरोग्यBeedबीडdoctorडॉक्टर