शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
3
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
4
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
5
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
6
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
7
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
8
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
9
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
10
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
11
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
12
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
13
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
14
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
15
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
16
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
17
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
18
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
19
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
20
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
Daily Top 2Weekly Top 5

मागील वर्षी १७५ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा; १५ प्रस्ताव ठरले अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:33 IST

बीड : राज्यात कर्जबाजारीपणामुळे २५ वर्षांपूर्वी शेतकरी आत्महत्या झाली होती. त्यानंतरदेखील हे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्याला ...

बीड : राज्यात कर्जबाजारीपणामुळे २५ वर्षांपूर्वी शेतकरी आत्महत्या झाली होती. त्यानंतरदेखील हे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र दरवर्षी दिसून येते. १ जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० अखेरपर्यंत १७५ शेतकऱ्यांनी विविध कारणास्तव आत्महत्या केल्याची नोंद शासनदरबारी आहे. यातील जवळपास १५ प्रस्ताव अपात्र ठरवण्यात आले असून, १५१ जणांच्या नातेवाइकांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली आहे. मात्र, कुटुंबांना इतर लाभ देण्यात प्रशासन कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.

नापिकी दुष्काळी, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा यासह इतर अनेक कारणांमुळे मागील काही वर्षांपासून बीड जिल्ह्यातील शेतकऱी आत्महत्येची प्रकरणे वाढत आहेत. या आत्महत्या होऊ नयेत, यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. यामध्ये शासनाकडून पात्र आत्महत्या ठरली तर, एक लाखांच्या मदतीसोबतच कृषी, महसूल, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह इतर काही विभागांतून त्या कुटुंबास विविध योजनांचा लाभ प्राधान्याने दिला जाते.

२०१९ साली आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही २१६ इतकी होती. तर, २०१८ या वर्षात ही संख्या १८७ इतकी होती. तरीदेखील आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून कार्यक्रम राबवला जात नाही. असे कार्यक्रम राबवले तरी त्याची अंमलबजावणी योग्यरीत्या केली जात नसल्याचे दिसून येते.

शेतकरी आत्महत्येला आज ३५ वर्षे पूर्ण

२०१९ आत्महत्या २१६ पात्र १९७

२०२० आत्महत्या १७५ पात्र १५१

पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या - अपेट

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतीमालावरील निर्यात बंदी उठवली गेली पाहिजे. शेतीचे खुलीकरण करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांवर सर्व प्रकारचे कर्ज शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे झाल्यामुळे सर्व प्रकारच्या कर्जातून त्याची मुक्तता करणे गरजेचे आहे. वाढत्या महागाईप्रमाणे शेती पिकालादेखील त्या पटीत भाव मिळणे गरजेचे आहे. शेतकरी नेते शरद जोशी यांच्या समितीने दिलेल्या शिफारशी लागू कराव्यात, असे मत शेतकरी संघटनेचे कालिदास अपेट यांनी व्यक्त केले आहे.

व्यवस्थेच्या छाताडवर नाचून हक्क मिळवणे गरजेचे

यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे हे प्रगतशील शेतकरी होते. मात्र, काही कारणास्तव तत्कालीन शासनाने वेळोवेळी नोटिसा देऊन त्यांच्या शेतातील विद्युतप्रवाह खंडित केला होता. हा अपमान सहन न झाल्यामुळे साहेबराव करपे व मालती करपेंसह सहा जणांनी आत्महत्या केली होती. तीच परिस्थिती या शासनाच्या काळातदेखील असून, तशाच पद्धतीने विद्युतप्रवाह खंडित करण्याचे काम सुरू आहे. परंतु, आता शेतकऱ्यांनी खचून न जाता व्यवस्थेच्या छाताडावर नाचून आपले अधिकार हस्तगत करावेत तर, शेतकरी आत्महत्या थांबतील. असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी व्यक्त केले आहे.