शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

मागील वर्षी १७५ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा; १५ प्रस्ताव ठरले अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:33 IST

बीड : राज्यात कर्जबाजारीपणामुळे २५ वर्षांपूर्वी शेतकरी आत्महत्या झाली होती. त्यानंतरदेखील हे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्याला ...

बीड : राज्यात कर्जबाजारीपणामुळे २५ वर्षांपूर्वी शेतकरी आत्महत्या झाली होती. त्यानंतरदेखील हे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र दरवर्षी दिसून येते. १ जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० अखेरपर्यंत १७५ शेतकऱ्यांनी विविध कारणास्तव आत्महत्या केल्याची नोंद शासनदरबारी आहे. यातील जवळपास १५ प्रस्ताव अपात्र ठरवण्यात आले असून, १५१ जणांच्या नातेवाइकांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली आहे. मात्र, कुटुंबांना इतर लाभ देण्यात प्रशासन कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.

नापिकी दुष्काळी, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा यासह इतर अनेक कारणांमुळे मागील काही वर्षांपासून बीड जिल्ह्यातील शेतकऱी आत्महत्येची प्रकरणे वाढत आहेत. या आत्महत्या होऊ नयेत, यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. यामध्ये शासनाकडून पात्र आत्महत्या ठरली तर, एक लाखांच्या मदतीसोबतच कृषी, महसूल, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह इतर काही विभागांतून त्या कुटुंबास विविध योजनांचा लाभ प्राधान्याने दिला जाते.

२०१९ साली आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही २१६ इतकी होती. तर, २०१८ या वर्षात ही संख्या १८७ इतकी होती. तरीदेखील आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून कार्यक्रम राबवला जात नाही. असे कार्यक्रम राबवले तरी त्याची अंमलबजावणी योग्यरीत्या केली जात नसल्याचे दिसून येते.

शेतकरी आत्महत्येला आज ३५ वर्षे पूर्ण

२०१९ आत्महत्या २१६ पात्र १९७

२०२० आत्महत्या १७५ पात्र १५१

पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या - अपेट

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतीमालावरील निर्यात बंदी उठवली गेली पाहिजे. शेतीचे खुलीकरण करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांवर सर्व प्रकारचे कर्ज शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे झाल्यामुळे सर्व प्रकारच्या कर्जातून त्याची मुक्तता करणे गरजेचे आहे. वाढत्या महागाईप्रमाणे शेती पिकालादेखील त्या पटीत भाव मिळणे गरजेचे आहे. शेतकरी नेते शरद जोशी यांच्या समितीने दिलेल्या शिफारशी लागू कराव्यात, असे मत शेतकरी संघटनेचे कालिदास अपेट यांनी व्यक्त केले आहे.

व्यवस्थेच्या छाताडवर नाचून हक्क मिळवणे गरजेचे

यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे हे प्रगतशील शेतकरी होते. मात्र, काही कारणास्तव तत्कालीन शासनाने वेळोवेळी नोटिसा देऊन त्यांच्या शेतातील विद्युतप्रवाह खंडित केला होता. हा अपमान सहन न झाल्यामुळे साहेबराव करपे व मालती करपेंसह सहा जणांनी आत्महत्या केली होती. तीच परिस्थिती या शासनाच्या काळातदेखील असून, तशाच पद्धतीने विद्युतप्रवाह खंडित करण्याचे काम सुरू आहे. परंतु, आता शेतकऱ्यांनी खचून न जाता व्यवस्थेच्या छाताडावर नाचून आपले अधिकार हस्तगत करावेत तर, शेतकरी आत्महत्या थांबतील. असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी व्यक्त केले आहे.