शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

भूसंपादन ते ठेकेदाराची मनमानी; बीड जिल्ह्यात रखडलेले राष्ट्रीय महामार्ग बनलेत जीवघेणे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 17:20 IST

पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचा गेल्या कित्येक वर्षांपासून गाजावाजा सुरू आहे. परंतु हा मार्ग अजून पूर्णत्वाला जात नाही.

बीड : जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्वच महामार्गांची कामे गेल्या तीन वर्षांपासून रखडली आहेत. राज्य मार्गांची तर कामेच बंद पडली आहेत. निधी मिळूनही ठेकेदारांच्या मनमानीमुळे काम संथगतीने सुरू आहेत. तर काही ठिकाणी भूसंपादनाचा प्रश्न अजून मिटला नाही. असे असले तरी हे मार्ग वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत असून आतापर्यंत अनेक जणांचे बळी देखील गेले आहेत. तरी याकडे शासकीय यंत्रणा, नेते मंडळींचे दुर्लक्ष होत आहे.

पाटोदा ते अहमदपूर हा राष्ट्रीय महामार्ग सध्या मृत्यूमार्ग बनला आहे. काम पूर्ण करण्याचा कालावधी संपूनही अद्याप नेकनूर, केज, अंबाजोगाई शहरातील कामे अपूर्णच आहेत. या मार्गावर जवळपास ३८ पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. दरम्यान, औरंगाबाद-बीड-सोलापूर व कल्याण-गेवराई-माजलगाव-नांदेड महामार्गाचे काम बऱ्यापैकी झाले असले तरी याही रस्त्यावर अनेक ठिकाणी कामे अपुरे आहेत.

तांत्रिक अडचण, टेंडर निघताच काम सुरूआष्टी तालुक्यातून सध्या बीड-कडा-नगर राष्ट्रीय महामार्ग तर बीड-धामणगांव-नगर राज्य महामार्ग व पैठण-बारामती असे तीन महामार्ग गेले असून तिन्ही रस्त्याचे काम तालुक्यात बंद आहे. सध्या हे महामार्ग अपघात मार्ग बनत आहेत. दोन महिन्यापूर्वी धामणगावनजीक चार जणांचे बळी गेले आहेत. या महामार्गाचे टेंडर निघताच कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता आर. व्ही. भोपळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

बीड जिल्ह्यातून गेलेले राष्ट्रीय महामार्गमहामार्ग क्रमांक-२११ (नवीन ५२)- औरंगाबाद-सोलापूर.२२२-कल्याण-अहमदनगर-गेवराई-माजलगाव-नांदेड-निर्मल५४८-बी-पिंपळा-परळी-मांजरसुंबा., लोखंडी सावरगाव-रेणापूर.५४८-सी-परतूर-केज, केज-कुसळंब.५४८-डी-अहमदपूर-पाटोदा, अहमदपूर-अहमदनगर.७५२-ई-पैठण-पंढरपूर (पालखी महामार्ग)३६१-एफ-खरवंडी-नवगण राजूर-बीड.

पालखी मार्गाचे स्वप्न अधुरेपैठण-पंढरपूर पालखी मार्गाचा गेल्या कित्येक वर्षांपासून गाजावाजा सुरू आहे. परंतु हा मार्ग अजून पूर्णत्वाला जात नाही. अनेक ठिकाणी भूसंपादन झाले नाही. तसेच रस्ते, पूल अपूर्ण आहेत. यामुळे यंदाही हा मार्ग आषाढीसाठी वारकऱ्यांना वेदनादायी ठरणार असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Beedबीडhighwayमहामार्गAccidentअपघात