शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

जिवाचीवाडी परीसराला अवकाळी पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:33 IST

गारा व विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने आंबा पिकाचे नुकसान येवता : केज तालुक्यातील जिवाचीवाडी येवता परिसरात दुपारच्या वेळी अचानक ...

गारा व विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने आंबा पिकाचे नुकसान

येवता : केज तालुक्यातील जिवाचीवाडी येवता परिसरात दुपारच्या वेळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली . वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच इतर पिकांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

दिवसभर उन असताना दुपारच्या वेळी अचानक वादळी वारा येउन त्या बरोबरच गारा व अवकाळी पाऊस सुरु झाला. त्यामुळे आंबा पिकासह भाजीपाला, कडबा यासह अनेक कृषी मालाचे नुकसान झाले आहे . झाडांना चांगले आंबे लगडले आहेत . आंब्याचे उत्पादन या वर्षी चांगले होईल, अशी अपेक्षा असताना अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे. अगोदरच कोरोनाच्या दुष्प्रभावाने शेतीमालाचे व भाजीपाल्याचे भाव कोसळले असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे . त्यातच निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाने त्वरित पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत .