शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

परळी रेल्वे पोलीस ठाण्यात अपुरा कर्मचारी वर्ग; स्वत:चे वाहनही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:22 IST

१८ रेल्वे स्टेशन हद्दीतील गुन्हेगारीवर कसे ठेवणार नियंत्रण?

ठळक मुद्देपोलीस स्टेशनसाठी ४५ कर्मचाऱ्यांचा स्टाफ मंजूर आहे. २३ पोलीस कर्मचारी व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पदे रिक्त आहेत

परळी (जि.बीड) : बीड जिल्ह्यातील मोठे रेल्वे स्टेशन असलेल्या परळी रेल्वे स्टेशनमधील रेल्वे पोलीस ठाण्यात पोलिसांची संख्या अपुरी झाली आहे. या ठाण्यासाठी स्वतंत्र असे वाहनही नाही. त्यामुळे तपासाला रेल्वेनेच जाण्याशिवाय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे पर्याय नाही. आहे त्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांवर कामांचा ताण येत असून, धावत्या रेल्वेत घडणाऱ्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास व तपास कामात तत्परता आणण्यासाठी अडथळे निर्माण झाले आहेत.

परळी रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत १८ रेल्वे स्टेशन हद्दीतील धावत्या रेल्वेमधील घटनेकडे लक्ष दिले जाते. यासाठी केवळ २५ कर्मचारी नेमलेले आहेत. या पोलीस स्टेशनसाठी ४५ कर्मचाऱ्यांचा स्टाफ मंजूर आहे. परंतु मंजुर क्षमतेएवढे रेल्वे पोलीस कर्मचारीच उपलब्ध नाही. २३ पोलीस कर्मचारी व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पदे रिक्त आहे. सध्या येथे १ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १ पोलीस उपनिरीक्षक, ११ जमादार, १२ पोलीस कर्मचारी मंजूर आहेत. महिला पोलीस कर्मचाऱ्यांची ३ पदे मंजूर असताना प्रत्यक्षात १ महिला कर्मचारी आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची ७ पदे रिक्त असून, कर्मचाऱ्यांचीही पदे रिक्त आहेत. अपुऱ्या स्टाफवरच १८ रेल्वे स्टेशनमधील घडणाऱ्या घटनेचा तपास करावा लागत आहे.

परळी रेल्वे पोलीस ठाण्याची बीड, परभणी, लातूर या तीन जिल्ह्यात हद्द आहे. यातील परळी रेल्वे स्टेशन, उखळी, वडगाव, गंगाखेड, पोखर्णी, धोंडी, घाटनांदूर, मूर्ती, कारेपूर, पानगाव, जानवळ, लातूर रोड, चाकूर, हेरकुमठा, उदगीर यासह १८ रेल्वे स्टेशन हद्दीतील गुन्हेगारीवर  आळा घालण्यासाठी परळी रेल्वे स्टेशनमधून नियोजन केले जाते. हे नियोजन करता करता आहे त्या पोलिसांची तारांबळ होत आहे. रेल्वेचे पोलीस अधिकारी या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत, मात्र कर्मचारी संख्या अपुरी असल्याचे खाजगीत सांगतात. 

पोलीस बळ वाढल्यास मदत होणारपरळी हे काही रेल्वे गाड्यांचे शेवटचे स्थानक आहे. त्यामुळे लांब अंतरावरुन निघालेल्या या रेल्वेमधून प्रवास करत अनेक मनोरुग्ण, गुन्हेगारी वत्तीचे लोक परळी परिसरात आढळतात. उपविभागीय कार्यालय होऊन पोलीस बळ वाढल्यास परिस्थिती नियंत्रणात आणणे सुलभ ठरू शकेल.

नेमणुका आणि सीसीटीव्हीच्या मागणीकडे दुर्लक्ष बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक परळीतील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी रेल्वेने अनेक राज्यातून भाविक येतात. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये दररोज १८ रेल्वे गाड्या धावतात. त्यामुळे परळी रेल्वे पोलीस स्टेशनमधील रिक्त पदे भरावीत व रेल्वे पोलीस उपअधीक्षक यांचे कार्यालय सुरु करुन नेमणूक करावी, अशी मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे. परळी रेल्वे स्टेशन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीही यापूर्वी केलेली आहे. - जी. एस. सौंदळे, अध्यक्ष, परळी रेल्वे प्रवासी संघटना

टॅग्स :Policeपोलिसrailwayरेल्वेBeedबीडCrime Newsगुन्हेगारी