शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

बालाघाट हिरवागार करण्यासाठी बीजांकुर ग्रुपचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:21 IST

३० गावांमध्ये रोज १०० झाडे लावून जगविण्याचा संकल्प बीड : कोरोनाकाळात ऑक्सिजनची किंमत प्रत्येकाला जाणवली आहे. तसेच मागील काळात ...

३० गावांमध्ये रोज १०० झाडे लावून जगविण्याचा संकल्प

बीड : कोरोनाकाळात ऑक्सिजनची किंमत प्रत्येकाला जाणवली आहे. तसेच मागील काळात वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्यामुळे वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी नेकनूर परिसरातील काही प्रशासकीय अधिकारी व तरुणांनी मिळून बीजांकुर नावाची मोहीम सुरू केली आहे. या माध्यमातून रोज १०० झाडे लावण्याचा उपक्रम या मोहिमेच्या माध्यमातून राबविला जात आहे. तसेच झाडे जगविण्यासाठी गावातील नागरिकांवर जबाबदारी दिली जात आहे. यामधून वृक्षसंवर्धनाच्या संदर्भात जनजागृती केल्यामुळे ग्रामस्थांचाही या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मागील वर्षी नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्‍मण केंद्रे यांच्यासह अशोक शिंदे, मनोज गव्हाणे, सुरेश रोकडे, रामनाथ घोडके, अमोल नवले यांच्यासह ‘मॉर्निंग टी’ आणि ‘बीजांकुर ग्रुप’ यांनी नेकनूरसह परिसरात बीजारोपण व वृक्षारोपण करीत झाडांचे महत्त्व अधोरेखित केले होते. या मोहिमेची आता चळवळ व्हावी यासाठी या ग्रुपच्या वतीने जनजागृती करण्यात आली. त्यामुळे अनेक गावांमधून मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता हरित गावे हा उपक्रम राबविण्यात सुरुवात केली असून, याचा प्रारंभ तालुक्यातील कळसंबर येथून झाली. ग्रामस्थांनी वड, पिंपळ, लिंब यांचे वृक्षारोपण करून ते जतन करण्याचा संकल्प केला आहे.

गेल्या वर्षी डोंगरमाथ्यावर ७५ हजार बीजरोपणासह नेकनूर बाजारतळ, चाकरवाडी, मांडवखेल, भंडारवाडी येथे हजारो झाडांची लागवड केली होती. ती झाडे आता मोठी झाली आहेत. या वर्षी मात्र, नेकनूर पोलीस ठाणेअंतर्गत असलेल्या ३० गावांमध्ये १५ जुलै ते १५ ऑगस्ट या एका महिन्याच्या काळामध्ये रोज १०० याप्रमाणे ३००० झाडे लावून ती ग्रामस्थांच्या सहकार्याने जोपासण्याचे काम हाती घेत ‘हरित गावे’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. या चळवळीमुळे मोठ्या प्रमाणत वृक्षांची लागवड होणार असून, पुढील काळात निसर्गसंवर्धन होण्यास मदत होणार आहे.

रोपांचा केला जातो पुरवठा

गावांमध्ये वृक्षारोपण करायचे असल्यास बीजांकुर ग्रुपच्या वतीने त्या गावांमध्ये रोपांचा पुरवठा केला जातो. तसेच ग्रुपमधील सदस्य त्या गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांसबोत वृक्षारोपण करतात. तसेच ग्रामस्थांमध्ये वृक्षसंवर्धनाची गरज याविषयी जनजागृती केली जाते.

नागरिकांनी मोठ्या प्रमाणत सहभागी व्हावे

बालाघाट परिसरातील डोंगर बोडके झालेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. दरम्यान, ग्रामीण भागातही वृक्षलागवड करणे गरजेचे असून, ‘हरित गाव’ या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन वृक्षलागवड करावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी केले आहे.

200721\565620_2_bed_8_20072021_14.jpg~200721\565920_2_bed_7_20072021_14.jpeg

ग्रमस्थांच्या मागणीनुसार रोपांचा पुरवठा केला जातो.~डोंगर रांगावर वृक्षारोपण करताताना  सपोनि लक्ष्मण केंद्रे, अशोक शिंदे, गोरख वाघमारे, रामनाथ घोडके, मनोज गव्हाणे, सुरेश रोखडे, अमोल नवले यांच्यासह बिजांकूर गृपचे सदस्य व ग्रामस्थ दिसत आहेत.