शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

इंदिराजींनी आणीबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:26 PM

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी उघडपणे कोणी बोलत नव्हते. मात्र अहमदाबाद आणि पाटणा येथून विरोध सुरू झाला. त्यातून जयप्रकाश नारायण हे नेतृत्व पुढे आले. जनशक्तीपुढे इंदिराजींचा पराभव झाला, अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्या ध्येयधोरणावर टीका केली.

ठळक मुद्देजितेंद्र आव्हाड : संविधान बचाव सभेत भाजप सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीवर टीका; संघटित लढा देण्याचे वक्त्यांचे आवाहन

बीड : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी उघडपणे कोणी बोलत नव्हते. मात्र अहमदाबाद आणि पाटणा येथून विरोध सुरू झाला. त्यातून जयप्रकाश नारायण हे नेतृत्व पुढे आले. जनशक्तीपुढे इंदिराजींचा पराभव झाला, अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्या ध्येयधोरणावर टीका केली.बीड येथे बुधवारी संविधान बचाओ संघर्ष समितीच्या महासभेत ते बोलत होते. व्यासपीठावर मौलाना अबु तालीब रहमानी, माजी. न्या. बी. जी कोळसे पाटील, तिस्ता सेटलवाड, दीपसिता धार, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. राजेंद्र जगताप, अमरसिंह पंडित, सय्यद सलीम, उषा दराडे, सिराज देशमुख, प्रा. सुनील धांडे आदी उपस्थित होते.आव्हाड म्हणाले, एखादा हिटलर जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो सर्वात जास्त बुद्धिवाद्यांना आणि विद्यार्थ्यांना घाबरतो, कारण बंडखोरी त्यांच्या अंगात असते म्हणूनच जेएनयुसह इतर विद्यापीठांतील विद्यार्थ्यांवर हल्ले सुरू आहेत. आज विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल, परंतु हीच संख्या मोठी असल्याचे सांगत त्यांनी इंदिरा गांधींच्या काळातील आणीबाणीचा संदर्भ दिला.यावेळी आव्हाड यांनी ‘ना हिंदू , ना मुसलमान संविधान खतरे में है’ म्हणत मोदी- शहांवर टीका केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या बापजाद्यांनी रक्त सांडले, आम्हाला पुरावे मागणारे त्यावेळी कोठे होते, असा सवाल आव्हाड यांनी केला. भाजपला जे काय करायचं, ते करु द्या. एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातात संविधान आणि मुखात जयभीमचा नारा देऊन देश विभक्त करण्याचे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन आव्हाड यांनी केले.जेएनयूच्या विद्यार्थी नेत्या दीपसिता धार, तिस्ता सेटलवाड यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या धोरणावर टीका केली.देश अहंकाराने नव्हे, संविधानावर चालेलमोदी- शहांवर टीका करताना मौलाना तालीब रहमानी म्हणाले, एकही इंच हटणार नाही म्हणणाऱ्यांना पळता भुई थोडी करु. तुम्ही चेहरे पाहतात, आम्ही तिरंग्याकडे पाहतो. आमच्या एका हातात कुराण आणि दुसºया हातात संविधान असेल. हजारो प्रयत्न केले तरी हा देश अहंकाराने नव्हे तर संविधानानुसार चालेल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.जनशक्तीच्या बळावर क्रांती करून्या.बी.जी. कोळसे पाटील यांनी मोदी, शहा यांच्यावर टीका केली. आरएसएस देशाची शत्रू असून मोदी, शहा दलाल असल्याचे ते म्हणाले. साडेपाच वर्षात रोजगार संपला, बॅँका बुडाल्या, सामान्यांसाठीचे कायदे बासनात गुंडाळले. न्याय व्यवस्था नोकरशाही धोक्यात आली. सीएए, एनसीआर कायद्याविरोधात संघटितपणे लढा देण्याचे आवाहन केले

टॅग्स :BeedबीडJitendra Awhadजितेंद्र आव्हाडIndira Gandhiइंदिरा गांधी