शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

विद्युत रोहित्र, तारांचा वाढला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:22 IST

अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युत तारा, खांब आणि रोहित्रांची दुरवस्था झाली आहे. तसेच उघड्या डीपी, वाकलेले ...

अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युत तारा, खांब आणि रोहित्रांची दुरवस्था झाली आहे. तसेच उघड्या डीपी, वाकलेले विद्युत खांब व लोंबकळणाऱ्या विद्युत तारा यापासून ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे.

वीज वितरण कंपनीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागातील वीज तसेच जीर्ण झालेल्या वीज तारांची दुरुस्ती याकडे गांभीर्याने बघितले जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

मात्र, वीज वितरण कंपनीकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मागील अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले डीपी, वीज तारा व विद्युत पोल यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. जुन्या डोलाऱ्यावरच वीज वितरणाचे काम सुरू असल्याने वारंवार रोहित्रात बिघाड होऊन वीज वितरणात अडचणी येत आहेत. शिवाय लोंबकळणाऱ्या विद्युत तारा सतत उघड्या असणाऱ्या व जमिनीपासून कमी उंचीवर रस्त्यालगत उभारलेल्या डीपी यामुळे लहान मुले, ग्रामस्थ व जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

जुन्या असलेल्या या डीपीमधील किटकॅट खराब झाल्याने वारंवार फ्यूज जाऊन तासन्‌तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. तरीही महावितरणचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

....

यंत्रसामग्रीवर गंज; वीज प्रवाहात अडथळे

मागील अनेक वर्षांपूर्वी गावात उभारण्यात आलेले विजेचे खांब व वीज तारा अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. डीपीमधील फ्यूज, केबल यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या यंत्रसामग्रीवर गंज चढला असून याठिकाणी तांत्रिक बिघाड होऊन वारंवार केबल जळण्याचे प्रकार सुरू आहेत. पावसाळ्यात त्यावर पाणी पडून विजेच्या ठिणग्या बाहेर पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.