शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

विद्युत रोहित्र, तारांचा वाढला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:22 IST

अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युत तारा, खांब आणि रोहित्रांची दुरवस्था झाली आहे. तसेच उघड्या डीपी, वाकलेले ...

अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युत तारा, खांब आणि रोहित्रांची दुरवस्था झाली आहे. तसेच उघड्या डीपी, वाकलेले विद्युत खांब व लोंबकळणाऱ्या विद्युत तारा यापासून ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे.

वीज वितरण कंपनीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागातील वीज तसेच जीर्ण झालेल्या वीज तारांची दुरुस्ती याकडे गांभीर्याने बघितले जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

मात्र, वीज वितरण कंपनीकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मागील अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले डीपी, वीज तारा व विद्युत पोल यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. जुन्या डोलाऱ्यावरच वीज वितरणाचे काम सुरू असल्याने वारंवार रोहित्रात बिघाड होऊन वीज वितरणात अडचणी येत आहेत. शिवाय लोंबकळणाऱ्या विद्युत तारा सतत उघड्या असणाऱ्या व जमिनीपासून कमी उंचीवर रस्त्यालगत उभारलेल्या डीपी यामुळे लहान मुले, ग्रामस्थ व जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

जुन्या असलेल्या या डीपीमधील किटकॅट खराब झाल्याने वारंवार फ्यूज जाऊन तासन्‌तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. तरीही महावितरणचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

....

यंत्रसामग्रीवर गंज; वीज प्रवाहात अडथळे

मागील अनेक वर्षांपूर्वी गावात उभारण्यात आलेले विजेचे खांब व वीज तारा अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. डीपीमधील फ्यूज, केबल यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या यंत्रसामग्रीवर गंज चढला असून याठिकाणी तांत्रिक बिघाड होऊन वारंवार केबल जळण्याचे प्रकार सुरू आहेत. पावसाळ्यात त्यावर पाणी पडून विजेच्या ठिणग्या बाहेर पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.