शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

बीड जिल्ह्यात हरभऱ्याच्या तुलनेत ज्वारीच्या क्षेत्रामध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 13:32 IST

मागील दोन वर्षांच्या तुलनेत ज्वारीचे क्षेत्र कमालीचे आणि हरभऱ्यापेक्षा जास्त वाढले आहे. 

ठळक मुद्देरबीच्या ८१ टक्के पेरण्या पूर्ण धान्य आणि चाऱ्यासाठी होणार फायदापिकांवर काही प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव 

बीड : यंदा ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात रबीच्या ८१ टक्के पेरण्या झाल्या असून सर्वाधिक क्षेत्र ज्वारीचे आहे. त्यापाठोपाठ हरभरा पिकाकडे शेतकऱ्यांचा कल राहिला. मागील दोन वर्षांच्या तुलनेत ज्वारीचे क्षेत्र कमालीचे आणि हरभऱ्यापेक्षा जास्त वाढले आहे. 

मागील वर्षी पाऊस प्रमाण अत्यल्प राहिल्याने रबी हंगाम धोक्यात आला होता. यंदा मात्र तो जोमात आला आहे. जिल्ह्यात रबीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख २२ हजार ७३० हेक्टर इतके आहे. यापैकी ३ लाख ४० हजार ६४९ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेल्याने परंतू पुढील वातावरण पोषक राहिल्याने रबी हंगामात शेतकऱ्यांनी कस लावला आहे. ज्वारीच्या २ लाख ५६ हजार २१० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ६३ १ लाख ७५ हजार ११७ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. तर हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ७१ हजार २९० आहे.  १ लाख ३१ हजार ८७६ हेक्टरात हरभऱ्याचा पेरा झाला आहे. मक्याचे क्षेत्र १२ हजार ९३२ असून २५१७ हेक्टरवर पेरा झाला आहे. तर गव्हाचे क्षेत्र ४७ हजार ९८० हेक्टर असून ३० हजार ३६९ हेक्टरात पेरा झाला आहे.

एकमेव बीड तालुक्यात ३० हेक्टरात इतर तृणधान्याचे पीक घेण्यात आले आहे. बीड तालुक्यात २१ आणि अंबाजोगाई तालुक्यात १९० अशा २९० हेक्टर क्षेत्रात इतर कडधान्याचा पेरा झाला आहे. पाटोदा ६५, आष्टीत २७, अंबाजोगाईत १८०, केज तालुक्यात ९२ अशा एकूण ३६४ हेक्टर क्षेत्रात करडईचा पेरा झाला आहे. बीड तालुक्यात ३, पाटोद्यात ८०, अंबाजोगाईत २४ असे एकूण १०७ हेक्टरात जवसाचा पेरा झाला आहे. बीड तालुक्यात ३७, पाटोद्यात ६ आणि अंबाजोगाईत १५ एकूण ५८ हेक्टरात इतर गळितधान्याचा पेरा झाला आहे.

किडीवर पहिला डोज लिंबोळी अर्क वापरा सध्या काही ठिकाणी हरभऱ्यावर घाटेअळीचा तर मका, ज्वारीच्या पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे. अशा ठिंकाणी महागडी औषधे वापरण्यापेक्षा पहिला डोज म्हणून लिंबोळी अर्क वापरावे. त्याचबरोबर आवश्यक वेळी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.

खरिपातील नुकसान भरुन निघेलअतिवृष्टीमुळे खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक अडचणी होत्या. मात्र या पावसामुळे रबीला आधार झाला. खरिपातील नुकसान भरुन काढण्यासाठी उपलब्ध क्षेत्रात रबीच्या पिकांवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले. 

धान्य व चाराही होईलयावर्षी ज्वारीचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे धान्यासह पशुधनासाठी चारा उपलब्ध होईल. अशीच पीक पध्दती राहिली तर चाऱ्याचे भाव कमी राहतील. त्यामुळे पशुधन सांभाळणे सुलभ होऊ शकेल. दोन्ही हंगामात किमान १० टक्के क्षेत्र हे चारा आणि धान्य पिकासाठी शेतकऱ्यांनी ठेवले पाहिजे.- दिलीप जाधव, कृषी अधिकारी, बीड तालुका

टॅग्स :BeedबीडagricultureशेतीFarmerशेतकरी