शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

बीड जिल्ह्यात हरभऱ्याच्या तुलनेत ज्वारीच्या क्षेत्रामध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 13:32 IST

मागील दोन वर्षांच्या तुलनेत ज्वारीचे क्षेत्र कमालीचे आणि हरभऱ्यापेक्षा जास्त वाढले आहे. 

ठळक मुद्देरबीच्या ८१ टक्के पेरण्या पूर्ण धान्य आणि चाऱ्यासाठी होणार फायदापिकांवर काही प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव 

बीड : यंदा ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात रबीच्या ८१ टक्के पेरण्या झाल्या असून सर्वाधिक क्षेत्र ज्वारीचे आहे. त्यापाठोपाठ हरभरा पिकाकडे शेतकऱ्यांचा कल राहिला. मागील दोन वर्षांच्या तुलनेत ज्वारीचे क्षेत्र कमालीचे आणि हरभऱ्यापेक्षा जास्त वाढले आहे. 

मागील वर्षी पाऊस प्रमाण अत्यल्प राहिल्याने रबी हंगाम धोक्यात आला होता. यंदा मात्र तो जोमात आला आहे. जिल्ह्यात रबीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख २२ हजार ७३० हेक्टर इतके आहे. यापैकी ३ लाख ४० हजार ६४९ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेल्याने परंतू पुढील वातावरण पोषक राहिल्याने रबी हंगामात शेतकऱ्यांनी कस लावला आहे. ज्वारीच्या २ लाख ५६ हजार २१० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ६३ १ लाख ७५ हजार ११७ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. तर हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ७१ हजार २९० आहे.  १ लाख ३१ हजार ८७६ हेक्टरात हरभऱ्याचा पेरा झाला आहे. मक्याचे क्षेत्र १२ हजार ९३२ असून २५१७ हेक्टरवर पेरा झाला आहे. तर गव्हाचे क्षेत्र ४७ हजार ९८० हेक्टर असून ३० हजार ३६९ हेक्टरात पेरा झाला आहे.

एकमेव बीड तालुक्यात ३० हेक्टरात इतर तृणधान्याचे पीक घेण्यात आले आहे. बीड तालुक्यात २१ आणि अंबाजोगाई तालुक्यात १९० अशा २९० हेक्टर क्षेत्रात इतर कडधान्याचा पेरा झाला आहे. पाटोदा ६५, आष्टीत २७, अंबाजोगाईत १८०, केज तालुक्यात ९२ अशा एकूण ३६४ हेक्टर क्षेत्रात करडईचा पेरा झाला आहे. बीड तालुक्यात ३, पाटोद्यात ८०, अंबाजोगाईत २४ असे एकूण १०७ हेक्टरात जवसाचा पेरा झाला आहे. बीड तालुक्यात ३७, पाटोद्यात ६ आणि अंबाजोगाईत १५ एकूण ५८ हेक्टरात इतर गळितधान्याचा पेरा झाला आहे.

किडीवर पहिला डोज लिंबोळी अर्क वापरा सध्या काही ठिकाणी हरभऱ्यावर घाटेअळीचा तर मका, ज्वारीच्या पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे. अशा ठिंकाणी महागडी औषधे वापरण्यापेक्षा पहिला डोज म्हणून लिंबोळी अर्क वापरावे. त्याचबरोबर आवश्यक वेळी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.

खरिपातील नुकसान भरुन निघेलअतिवृष्टीमुळे खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक अडचणी होत्या. मात्र या पावसामुळे रबीला आधार झाला. खरिपातील नुकसान भरुन काढण्यासाठी उपलब्ध क्षेत्रात रबीच्या पिकांवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले. 

धान्य व चाराही होईलयावर्षी ज्वारीचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे धान्यासह पशुधनासाठी चारा उपलब्ध होईल. अशीच पीक पध्दती राहिली तर चाऱ्याचे भाव कमी राहतील. त्यामुळे पशुधन सांभाळणे सुलभ होऊ शकेल. दोन्ही हंगामात किमान १० टक्के क्षेत्र हे चारा आणि धान्य पिकासाठी शेतकऱ्यांनी ठेवले पाहिजे.- दिलीप जाधव, कृषी अधिकारी, बीड तालुका

टॅग्स :BeedबीडagricultureशेतीFarmerशेतकरी