शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात हरभऱ्याच्या तुलनेत ज्वारीच्या क्षेत्रामध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 13:32 IST

मागील दोन वर्षांच्या तुलनेत ज्वारीचे क्षेत्र कमालीचे आणि हरभऱ्यापेक्षा जास्त वाढले आहे. 

ठळक मुद्देरबीच्या ८१ टक्के पेरण्या पूर्ण धान्य आणि चाऱ्यासाठी होणार फायदापिकांवर काही प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव 

बीड : यंदा ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात रबीच्या ८१ टक्के पेरण्या झाल्या असून सर्वाधिक क्षेत्र ज्वारीचे आहे. त्यापाठोपाठ हरभरा पिकाकडे शेतकऱ्यांचा कल राहिला. मागील दोन वर्षांच्या तुलनेत ज्वारीचे क्षेत्र कमालीचे आणि हरभऱ्यापेक्षा जास्त वाढले आहे. 

मागील वर्षी पाऊस प्रमाण अत्यल्प राहिल्याने रबी हंगाम धोक्यात आला होता. यंदा मात्र तो जोमात आला आहे. जिल्ह्यात रबीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख २२ हजार ७३० हेक्टर इतके आहे. यापैकी ३ लाख ४० हजार ६४९ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेल्याने परंतू पुढील वातावरण पोषक राहिल्याने रबी हंगामात शेतकऱ्यांनी कस लावला आहे. ज्वारीच्या २ लाख ५६ हजार २१० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ६३ १ लाख ७५ हजार ११७ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. तर हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ७१ हजार २९० आहे.  १ लाख ३१ हजार ८७६ हेक्टरात हरभऱ्याचा पेरा झाला आहे. मक्याचे क्षेत्र १२ हजार ९३२ असून २५१७ हेक्टरवर पेरा झाला आहे. तर गव्हाचे क्षेत्र ४७ हजार ९८० हेक्टर असून ३० हजार ३६९ हेक्टरात पेरा झाला आहे.

एकमेव बीड तालुक्यात ३० हेक्टरात इतर तृणधान्याचे पीक घेण्यात आले आहे. बीड तालुक्यात २१ आणि अंबाजोगाई तालुक्यात १९० अशा २९० हेक्टर क्षेत्रात इतर कडधान्याचा पेरा झाला आहे. पाटोदा ६५, आष्टीत २७, अंबाजोगाईत १८०, केज तालुक्यात ९२ अशा एकूण ३६४ हेक्टर क्षेत्रात करडईचा पेरा झाला आहे. बीड तालुक्यात ३, पाटोद्यात ८०, अंबाजोगाईत २४ असे एकूण १०७ हेक्टरात जवसाचा पेरा झाला आहे. बीड तालुक्यात ३७, पाटोद्यात ६ आणि अंबाजोगाईत १५ एकूण ५८ हेक्टरात इतर गळितधान्याचा पेरा झाला आहे.

किडीवर पहिला डोज लिंबोळी अर्क वापरा सध्या काही ठिकाणी हरभऱ्यावर घाटेअळीचा तर मका, ज्वारीच्या पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे. अशा ठिंकाणी महागडी औषधे वापरण्यापेक्षा पहिला डोज म्हणून लिंबोळी अर्क वापरावे. त्याचबरोबर आवश्यक वेळी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.

खरिपातील नुकसान भरुन निघेलअतिवृष्टीमुळे खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक अडचणी होत्या. मात्र या पावसामुळे रबीला आधार झाला. खरिपातील नुकसान भरुन काढण्यासाठी उपलब्ध क्षेत्रात रबीच्या पिकांवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले. 

धान्य व चाराही होईलयावर्षी ज्वारीचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे धान्यासह पशुधनासाठी चारा उपलब्ध होईल. अशीच पीक पध्दती राहिली तर चाऱ्याचे भाव कमी राहतील. त्यामुळे पशुधन सांभाळणे सुलभ होऊ शकेल. दोन्ही हंगामात किमान १० टक्के क्षेत्र हे चारा आणि धान्य पिकासाठी शेतकऱ्यांनी ठेवले पाहिजे.- दिलीप जाधव, कृषी अधिकारी, बीड तालुका

टॅग्स :BeedबीडagricultureशेतीFarmerशेतकरी