शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

धारूर घाटातून जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास; अरुंद रस्त्याने घेतले आतापर्यंत ५० बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 15:10 IST

गेल्या चार वर्षांपासून धारुर घाटाचे रुंदीकरण रखडल्याने हा अपघात मार्ग झाला आहे.

- अनिल महाजनधारूर : शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५४८-सी चे काम करताना धुनकवड पाटी ते धारुर घाटासह शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतच बारा किलोमीटर रस्ता अरुंदच ठेवून फक्त वरवर डागडुजी करण्यात आली. गेल्या चार वर्षांपासून हा रस्ता अरुंदच राहिल्याने धारुर घाटाचे रुंदीकरण रखडल्याने हा अपघात मार्ग झाला आहे. आतापर्यंत ५० जणांचे बळी या रस्त्याने घेतले आहेत. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

धारुर शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४८-सी हा खामगाव-पंढरपूर पालखी मार्ग गेल्यावर या परिसरातील या मार्गावरील गावांनी खूप आनंद व्यक्त केला; मात्र या रस्त्याचे काम होताना धुनकवड पाटी ते धारुर शहरातील भारतरत्न डॉ. आंबेडकर चौक हे बारा किलोमीटर रस्त्याचे काम रुंदीकरण न करता आहे त्या रस्त्यावर फक्त डागडुजी करून हे काम आटोपण्यात आले. आरणवाडी साठवण तलावाच्या बाजूने डोंगराचे पायथ्यापासून दोन किलोमीटर रस्ता करण्यात आला. अवघड वळणामुळे हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा रस्ता झाला आहे. धारुर घाटातही तीन किलोमीटरपर्यंत एका बाजूने खोलदरी, अवघड वळणे, खोल दरीच्या बाजूने रोडबरोबर आलेली संरक्षण भिंत यामुळे रस्ता अरुंद बनला आहे. यामुळे या रस्त्यावरून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. वाहन दरीत कोसळणाऱ्या घटना तर नियमित झाल्या आहेत. घाटात अपघाताचे प्रमाण वाढले असून रोजच लहान, मोठे अपघात होत आहेत. आतापर्यंत पन्नासपेक्षा जास्त बळी या घाटाने व अवघड वळण रस्त्याने घेतले आहेत. घाटात नेहमीच वाहतूकही ठप्प होते. चार वर्षे होऊनही एमएसआरडीसीचे अधिकारी घाट रुंदीकरणाकडे मात्र दुर्लक्ष करीत आहेत.

धारुर घाट रुंदीकरण तत्काळ कराया रस्त्याने वाहनाची वर्दळ वाढली आहे. धारुर घाट व साठवण तलावाशेजारचा पर्यायी रस्ता अरुंद असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे तत्काळ घाटाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बंडोबा सावंत यांनी केली आहे.

परवानगी मिळताच काम करूधारुर येथील घाटातील रुंदीकरणासाठीचा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळास पाठविण्यात आला आहे. परवानगी मिळताच हे काम तत्काळ सुरू करण्यात येईल, असे एमएसआरडीसीचे उपअभियंता अतुल कोटेचा यांनी सांगीतले.

पोलिसांचा देखील पाठपुरावा सुरु धारुर घाटात वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघात होत आहेत. यामुळे वाहनांची कोंडी होत आहे. यामुळे पोलिसांनाही सतत याकडे लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे तत्काळ रुंदीकरण करण्यासाठी संबंधित खात्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे धारुरचे सहायक पोलिस निरीक्षक व्ही. एस. अटोळे यांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीडhighwayमहामार्गAccidentअपघात