शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

‘स्मशानभूमी असावी तर घाटनांदूरसारखी’ - A - A - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:37 IST

घाटनांदूर : गाव करील ते राव काय करील? असे म्हटले जाते. मात्र, घाटनांदूर येथे नेमके उलटे घडले असून, ते ...

घाटनांदूर : गाव करील ते राव काय करील? असे म्हटले जाते. मात्र, घाटनांदूर येथे नेमके उलटे घडले असून, ते केवळ एका व्यक्तीमुळे. माजी सैनिक बन्सीसाहेब जाधव यांच्या पुढाकारातून येथील स्मशानभूमीचा कायापालट केला आहे. पूर्वी अंत्यविधीवेळी बाहेरगावचे नाक मुरडणारे पाहुणे आज ‘स्मशानभूमी असावी तर घाटनांदूरसारखी’ असे म्हणताना दिसत आहेत. प्रेक्षणीय स्थळ वाटावे इतपत स्मशानभूमीची सुधारणा करण्यात आली.

निजामकालीन जहागिरीचे गाव असलेल्या घाटनांदूर येथे मराठा समाज (पाटील, देशमुख) मोठ्या प्रमाणात आहे. पारंपरिक स्मशानभूमी गावातील रेल्वे गेटजवळ भदाडा आंबा नामक जागेत होती. सर्वत्र घाणीचे साम्राज्य होते. जायला धड रस्ता नव्हता. पावसाळ्यात खांदेकऱ्यांना त्रास व्हायचा. एक पाय रोवला की दुसरा काढायचा, अशी बिकट अवस्था. रेल्वे पटरीने जावे तर रेल्वे, मालवाहतूक करणाऱ्या वॅगन कधी येतील याचा नेम नसे. अंत्यविधीला पाहुणा येणेही कठीण बनले होते. हे सर्व पाहून प्रा. सुरेश जाधव यांनी तपेश्वर मठ संस्थानजवळ झोपडपट्टी भागातील स्वतःची वीटभट्टीची जागा पाण्याच्या हौदासह स्मशानभूमीसाठी दिली. समाजाच्या निधीतून गेट बसविले आणि मृत्यूनंतर होणारी फरफट थांबली; पण कुंपण, सुशोभिकरण, विकासाचे काय? वेळ कोणी द्यायचा? या घोळात अनेक वर्षे गेली. अखेर माजी सैनिक तथा लक्ष्मी नारायण पतसंस्थेचे चेअरमन बन्सीसाहेब जाधव यांनी वैयक्तिक लक्ष देऊन सुरुवातीला स्वत: खर्च करत सुधारणेसाठी पुढाकार घेतला. माजी सरपंच ज्ञानोबा जाधव यांच्या सहकार्यातून रहिवाशांना विश्वासात घेत काटेरी कुंपण पूर्ण केले. साधे शेड असलेल्या स्मशानभूमीत चोहोबाजूने पत्रे वाढविले. सरण रचण्याआधी मृतदेह (तिरडी) ठेवण्यासाठी मोठा ओटा केला. तब्बल साठ टिप्पर काळी माती चोहोबाजूने टाकून वड, पिंपळ, लिंब, चंदन आदींसह शोभेची फुलझाडे लावली. यात प्रामुख्याने २४ तास ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचा भरणा अधिक आहे. कचखडी टाकून बाजूने विटा लावून रस्ता तयार केला. पितृपक्षात महत्त्वाच्या असलेल्या मोहाच्या झाडांची जवळपास ३० रोपे लावली. तुळशीपत्र, मंजुळांशिवाय अंत्यविधी होत नाही, याची जाणीव ठेवत तुळशीबन तयार केले आहे. अस्थिकलशासाठी लॉकर, अंत्यविधीसाठी आलेल्यांना विश्रांतीसाठी सिमेंटचे बाक आहेत. संपूर्ण झाडांना नियमित पाणी मिळावे म्हणून सर्वत्रच ठिबक बसविले. रोपट्यांची आता दहा ते बारा फुटांपर्यंत वाढ झाली आहे. बन्सी जाधव स्वतः दररोज सकाळी व संध्याकाळी फेरफटका मारून देखभाल करतात. त्यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून आदर्शवत असे वैकुंठधाम प्रत्यक्षात साकारले आहे.

मृत्यू हेच अंतिम सत्य

जन्मानंतर मृत्यू हेच आयुष्याचे अंतिम सत्य असून, जन्माचा उत्सव करतो, तसेच अंतिम ध्येय साध्य झाल्यास त्याचाही उत्सव व्हायला पाहिजे. सर्वांना प्रसन्न वाटावे, यादृष्टीने स्मशानभूमीची सुधारणा करण्याचे ध्येय मी अंगिकारले. यात समाजबांधव यथाशक्ती सहकार्य करीत असल्याचे सेवानिवृत्त सैनिक बन्सी जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.