शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:38 IST

बीड : कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. मागील वर्गातील गुण आणि चालू वर्षातील तोंडी, प्रात्यक्षिक व ...

बीड : कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. मागील वर्गातील गुण आणि चालू वर्षातील तोंडी, प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापनावर विद्यार्थ्यांचे गुणदान करण्यात आले. मात्र, निकालानंतर मूल्यांकन करणारे ‘गुरुजी पास आणि विद्यार्थी नापास’ असा अनुभव सातत्याने अभ्यास करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना आला आहे. माझ्यापेक्षा मित्राला जास्त गुण मिळाले, माझ्यापेक्षा मैत्रिणीला जास्त गुण मिळाल्याचे हे विद्यार्थी खासगीत बोलतात.

लेखी परीक्षा घेतली असती तर बरे झाले असते. पालक म्हणून आम्ही तयार होतो, मुलांची काळजी घेतली असती. मात्र, शासनाने पाऊल उचलले नाही. त्यामुळे आमच्या मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान झाल्याची प्रतिक्रिया पालक व्यक्त करत आहेत.

दहावीनंतर अकरावी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाणार होती. दहावीला कमी मार्क मिळालेल्या परंतु चांगल्या गुणांची खात्री असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची तयारी केली होती.

मात्र, सीईटीदेखील रद्द करण्यात आली. मूल्यांकनात कमी गुण मिळाल्याने ‘ड्रीम कॉलेज’ मिळणार नाही, अशी चिंता विद्यार्थी आणि पालक व्यक्त करीत आहेत.

दहावीचे विद्यार्थी - ४०,५४०

पास झालेले विद्यार्थी - ४०,५२२

बारावीचे विद्यार्थी - ३५,००८

पास झालेले विद्यार्थी - ३४,७३९

परीक्षा नाही, पुनर्मुल्यांकनही नाही (बॉक्स)

दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर अपेक्षेनुसार गुण मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे. मात्र, पुनर्मुल्यांकन नाही आणि आणि अकरावीसाठी सीईटी नाही. त्यामुळे पर्याय नसल्याने हे वर्ष मुलांच्या दृष्टीने नुकसानीचे गेल्याचे पालकांनाही जाणवत आहे. आता मिळेल त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन बारावीचा गड सर करण्याचा निश्चय गुणवत्तेची खात्री असणारे विद्यार्थी करीत आहेत.

मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला जास्त गुण कसे?

काही विद्यार्थ्यांना अनपेक्षितपणे अपेक्षेपेक्षा जास्त गुण देण्यात आलेले आहेत. ज्यांनी प्रामाणिकपणे खरोखर अभ्यास केला तसेच परीक्षा लेखी घेतली असती तर गुणवत्ता सिद्ध करू शकले असते, असे विद्यार्थी मात्र नाराज आहेत. त्यांचे पालकही नाराजी दर्शवितात. अनेक पालक आणि विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांशी या विषयावर बोलत खंत व्यक्त करतात.

विद्यार्थी म्हणतात...

मला ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुणांची अपेक्षा होती. त्यादृष्टीने मी अभ्यासाची तयारी केली होती. क्लासेस केले होते. लेखी परीक्षा झाली असती तर जास्त गुण मिळाले असते. गुणवत्ता सिद्ध करता आली असती. मैत्रिणींनादेखील अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. --श्रेया भगीरथ बियाणी, विद्यार्थी, बीड.

-----

निकालासाठी केलेले मूल्यांकन पटलेले नाही. खऱ्या गुणवत्तेवर ते नसल्याने मी समाधानी नाही. वर्षभर अभ्यास केला. परीक्षा झाली नाही. त्यामुळे माझी खरी गुणवत्ता कळलीच नाही. अपेक्षेनुसार महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. अकरावी सीईटी झाली नसल्याच्या कारणांमुळे मुलांमध्ये नैराश्य येते. -- स्वप्नील मेघराज कोल्हे, विद्यार्थी, बीड.

पालक म्हणतात

माझ्या मुलाला ९८पेक्षा जास्त गुणांची अपेक्षा होती. लातूरच्या महाविद्यालयात घेतलेल्या परीक्षेत फाऊंडेशन बॅचसाठी तो निवडला गेला. मात्र, आता सीईटी रद्द केल्याने या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल की नाही, हे सांगता येत नाही. अकरावी प्रवेशासाठी सीईटी अपेक्षित होती. ज्या विद्यार्थ्यांनी खरोखर वर्षभर अभ्यास केला, त्यांना संधी मिळाली असती. --वल्लभ गोडबोले, पालक, बीड

-------

माझ्या मुलाला ९२ टक्क्यांच्या पुढे अपेक्षा होती. मात्र, मूल्यांकनात शाळेने कमी गुणांकन केले आहे. आता काहीच करू शकत नाही. चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार नसला तरीही आम्ही खचलेलो नाही. बारावीनंतरच्या नीट परीक्षेवर लक्ष केंद्रित करून मुलगा अभ्यासाला लागला आहे. त्यावेळी खरी गुणवत्ता तो नक्कीच सिद्ध करेल. - स्वीटी शीतल कोटेचा, पालक, बीड.