शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १५० विधवांचा सन्मान करत केली नवीन आयुष्याची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 4:34 PM

’आधार माणुसकीच्या’ माध्यमातून अंबाजोगाई  तालुक्यातील भारज येथे साकार झाला. 

ठळक मुद्देऐश्वर्या व निखिल या नवदांपत्यांचा निर्णय 

- अविनाश मुडेगांवकर 

अंबाजोगाई: विवाहानंतर सासरी येताच आयोजित स्वागत समारंभाची सुरुवात नव वधु-वरांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना साडीचोळी भेट देऊन, त्यांचा सन्मान करून आपल्या  नवीन आयुष्याची सुरुवात केली. हा उपक्रम ’आधार माणुसकीच्या’ माध्यमातून अंबाजोगाई  तालुक्यातील भारज येथे साकार झाला. 

अंबाजोगाई तालुक्यातील भारज येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पुणे येथील उद्योजक व्यंकटराव शिंदे यांचे सुपुत्र निखिल याचा विवाह पुणे येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भाजपाचे गटनेते एकनाथराव पवार  यांची मुलगी ऐश्वर्या हिच्याशी झाला.विवाहाप्रीत्यर्थ मंगळवारी भारज येथे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या स्वागत समारंभाची सुरुवात नवदाम्पत्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १५० विधवांचा सन्मान करून केली. या सर्व महिलांना साडीचोळीचा आहेर  भेट देण्यात आला. तसेच या सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणीही यावेळी करण्यात आली. 

विवाहावर लाखो रुपयांची उधळण, आतिषबाजी व विविध माध्यमांतून केली जाते. समाजात शुभकार्यात विधवांना दूर ठेवले जाते. मात्र, शिंदे व पवार कुटुंबियांनी आपल्या या नवीन वधूवरांची आयुष्याची सुरुवात सामाजिक बांधिलकी जोपासून केली. यावेळी भव्य समारंभ घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे भाजपाचे गटनेते एकनाथराव पवार, भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ, अंबाजोगाईचे तहसीलदार संतोष रूईकर, उपनगराध्यक्षा सविता लोमटे, ज्योती शिंदे, अशोकराव कदम, संयोजक व्यंकटराव शिंदे, शिवाजी शिंदे, वसंत शिंदे, आधार माणुसकीचा चे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याmarriageलग्नBeedबीड