शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

माजलगाव, अंबाजोगाईच्या तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:37 IST

मान्सूनचे आगमन होण्यास काही दिवस बाकी असतानाच मंगळवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास जिल्ह्यात माजलगाव, परळी, अंबाजोगाईसह इतर तालुक्यात विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. माजलगाव आणि अंबाजोगाई तालुक्यातील ३ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली . जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी १३ मिलीमीटर पाऊस झाला.

ठळक मुद्दे पहिल्या पावसाने शेतकरी सुखावला

बीड : मान्सूनचे आगमन होण्यास काही दिवस बाकी असतानाच मंगळवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास जिल्ह्यात माजलगाव, परळी, अंबाजोगाईसह इतर तालुक्यात विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. माजलगाव आणि अंबाजोगाई तालुक्यातील ३ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली . जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी १३ मिलीमीटर पाऊस झाला.

माजलगाव आणि अंबाजोगाई महसूल मंडळात ७० मि.मी. पावसाची नोंद झाली. अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव महसूल मंडळात तब्बल ७७ मि.मी.पावसाची नोंद झाली. याशिवाय परळी महसूल मंडळात ४२ मि.मी., माजलगाव तालुक्यातील गंगामसला महसूल मंडळात ४० मि.मी. तर दिंद्रुड महसूल मंडळांतही ६३ मि.मी.पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. वादळी वारे आणि पावसामुळे परळी, वडवणी तालुक्यात वीज पुरवठा काही तास खंडीत झाला. केज तालुक्यातील यूसूफ वडगाव येथे फळबागेचे नुकसान झाले. पावसामुळे गेवराईच्या संजयनगर भागात एक घर कोसळले.गेवराई तालुक्यात मान्सुनपुर्व पावसाने सोमवारी जोरदार हजेरी लावली. नंतर पुन्हा मंगळवारीही पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. मान्सून पूर्व पावसाने सोमवारी पहाटे तालुक्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर पुन्हा रात्री पासुन पावसाला सुरूवात झाली. शहरासह तालुक्यातील मादळमोही, उमापुर, धोंडराई, तलवाडा, सिरसदेवी, पाचेगाव, जातेगाव, पाडळिसंगी, चकलांबासह विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे गारवा निर्माण झाला आहे. मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत हा पाऊस सुरूच होता.मातीचे घर पडले; दोन मुले किरकोळ जखमीगेवराई शहरातील संजयनगर भागात मातीचे बांधकाम व पत्र्याचे शेड जास्त आहेत. वादळ वाऱ्यात त्यांना याचा अधिक त्रास होतो. मंगळवारच्या पावसात सुदर्शन बाबुराव बर्डे यांचे मातीचे घर पडले. यात घरात असलेल्या अमोल बर्डे (१५) व कुमार बर्डे (६) हे दोघे किरकोळ जखमी झाले. ही माहिती समजताच आ.लक्ष्मण पवार यांनी पंचनामा करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे दादासाहेब गिरी, तलाठी राजेश राठोड यांनी पंचनामा केला. यावेळी शेख शब्बीर, शेख खाजा, मुरली बर्डे, भारत बर्डे,केरबा बर्डे, सय्यद रिफक, शेख मुस्सा, राजेंद्र माळी, शेख बाबु, सय्यद अंबर आदी उपस्थित होते.वडवणीत नद्या, नाल्यांना आले पाणीवडवणी : तालुक्यात पहाटे तीन पासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात सर्वदुर पाऊस झाला. यामुळे अनेक छोट्या मोठ्या नद्या, नाल्यांना पाणी आले होते. पहिल्याच पावसात महावितरण कंपनीचे पितळ उघडे पडले आहे. पावसादरम्यान वीज पुरवठा खंडीत झाला आहे. गत आठवड्यात दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवून मोठा गाजावाजा करत पावसाळा पूर्व वीज दुरु स्तीची कामे केली जात असल्याचे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात पाऊस सुरू झाल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला अपयश आले आहे. यामुळे नागरिकांचे हाल झाले.दोन दिवसांच्या पावसाने अंबाजोगाई गारवाअंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात गेली दोन दिवसापासुन सतत होणाºया पावसामुळे गारवा निर्माण झाला आहे. मंगळवारी भल्यापहाटेच सुरु झालेल्या वादळी पावसाचा तडाखा सहन न झाल्यामुळे गेली १०० वर्षापूर्वी पासून सबजेल समोर उभे असलेले वडाचे झाड मंगळवारी सकाळी आठ वाजता उन्मळुन पडले. यामुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.लोखंडी सावरगाव येथे सर्वाधिक ७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून तालुक्यातील ग्रामीण भागातील नद्या, नाल्या वाहू लागल्याचे चित्र दिसून आले. पहिल्याच पावसासमोर महावितरणने गुडघे टेकले आहेत. पावसाचे अधिक प्रमाण असलेल्या भागात मध्यरात्रीनंतर बराच काळ विद्युत पुरवठा खंडित राहिला.परळी तालुक्यात संततधार पाऊसपरळी : शहर व ग्रामीण भागात मंगळवारी पहाटे विजेच्या कडकडाटसह दमदार पाऊस झाला. सेलू येथील एका शाळेवरील पत्रे उडाली. पेरणीपूर्व मशागतीसाठी पाऊस फायद्याचा ठरणार आहे. सोमवारी सायंकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मध्यरात्रीनंतर पावसाला सुरुवात झाली. सकाळी ६ वाजेपर्यंत संततधार पाऊस चालू होता. शहरातील सखल भागात पाणी साचले होते. हवेत गारवा निर्माण झाला व उष्णता कमी झाली. परळी, सिरसाळा, गाढेपिंपळगाव, महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. परळी तालुक्यात एकूण ४४ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. जलयुक्त शिवारच्या करण्यात आलेल्या कामाच्या काही ठिकाणी पाणी साचले होते. परळी -पिंपळा धायगुडा अंबाजोगाई रस्त्याचे काम चालू असल्याने वाहन धारकांची तारांबळ उडत आहे.युसूफवडगावमध्ये केळीचे नुकसानकेज : केज शहरासह तालुक्यात सोमवारी रात्री वादळी वाºयासह झालेल्या पावसाने युसूफवडगाव येथील शेतकरी सचिन रमेश मुकादम यांच्या शेतातील केळीच्या बागेतील ७०० झाडे आडवी पडली. यामध्ये त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यात इतर ठिकाणीही अनेक भागात किरकोळ नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने ते शेतकरी संकटात सापडले आहेत. पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी आहे.

 

टॅग्स :BeedबीडRainपाऊसMarathwadaमराठवाडाAgriculture Sectorशेती क्षेत्र