शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

आरोग्यविभागाचे अपयश; कोट्यवधी खर्चूनही बाळांतपण होईना सुखरूप, राज्यात १४३५ माता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 13:30 IST

आरोग्य विभागाच्या अपयशाने १६० मृत्यू वाढले :राज्यातील माता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते.

- सोमनाथ खताळबीड : राज्यातील माता मृत्यू रोखण्यात आरोग्य विभागाला अपयश आल्याचे दिसत आहे. २०२१-२२ मध्ये राज्यात तब्बल १४३५ मातांचा जीव गेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल १६० मृत्यू वाढल्याचे समोर आले आहे. रक्तस्त्राव, कोरोना, उच्च रक्तदाब व त्यामुळे होणारी गुंतागुंत यामुळेच सर्वात जास्त मृत्यू होत आहेत. विशेष म्हणजे महापालिकांच्या ठिकाणीच हे मृत्यू वाढले आहेत. जिल्हास्तरावर मृत्यूचा आकडा ४५ ने घटला आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चूनही महिलांचे बाळांतपण सुखरूप हाेत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

राज्यातील माता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते. पोस्टर, योजना, जनजागृती, औषधी, तज्ज्ञ, सोयी, सुविधा, समित्या आदींचा यात समावेश आहे. असले तरी राज्यातील एकूण माता मृत्यू दर कमी करण्यात त्यांना यश येत नसल्याचे दिसते. २०२०-२१ मध्ये राज्यात १ हजार २७५ मातांचा मृत्यू झाला होता. यात घट होण्याऐवजी २०२१-२२ मध्ये १६० ने वाढ होऊन १४३५ एवढा झाला आहे. यावरून आरोग्य विभाग आणि यासाठी काम करणाऱ्या यंत्रणेचे अपयश चव्हाट्यावर आले आहे. आता तरी आरोग्य विभागाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन हे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

कोणत्या कारणामुळे किती मृत्यू?माता मृत्यू होण्यास अनेक कारणे आहेत. याचे विवरण माता अन्वेषण समितीकडून करण्यात आले आहे. यामध्ये रक्तस्त्रावामुळे १३ टक्के मृत्यू होतात. तसेच जंतुसंसर्ग ७ टक्के, उच्च रक्तदाब व त्यामुळे होणारी गुंतागुंत १६ टक्के, कोरोनामुळे १८ टक्के, इतर कारणांमुळे १७ टक्के, कावीळ १ टक्का, हृदयरोग १ टक्का, रक्तक्षय ४ टक्के, गर्भाची गुंतागुंत १ टक्का, गर्भाची पिशवी फाटल्यामुळे १ टक्का आणि २१ टक्के मातांचा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण निश्चितच करता आलेले नाही.

या जिल्हा, शहरांत वाढले मृत्यूजिल्ह्याच्या ठिकाणी ठाण्यात ३, पालघर ७, नंदुरबार २, पुणे ८, लातूर ३, यवतमाळ ५, बुलडाणा ३, नागपूर २, वर्धा ३, गडचिरोली ७ तसेच महापालिकांच्या ठिकाणी मालेगाव १, धुळे १३, जळगाव १७, अहमदनगर ४, पुणे ४६, पिंपरी चिंचवड २, सोलापूर ७, कोल्हापूर १७, सांगली ३३, औरंगाबाद २५, नांदेड १, अकोला १, नागपूर ४० असे मृत्यू वाढले आहेत.

२९ तालुक्यांमध्ये ५ पेक्षा जास्त माता मृत्यूराज्यातील २९ तालुक्यांत ५ पेक्षा जास्त मृत्यू आहेत. यात मालेगाव, करवीर, कर्जत, गोंदिया, धारणी, साकरी, निफड, हातकलंगले, मिरज, अंबेरनाथ, निलंगा, धुळे, नंदुरबार, नवापुर, धानूरा, वर्धा, दिंडोरी, हावेली, अकोल, पुसद, कन्नड, सिल्लोड, कराड, पनवेल, भंडारा, जळगाव, अक्कलकुवा, काळवण, दौंड या तालुक्यांचा समावेश आहे.

राज्यातील माता मृत्यूची आकडेवारी२०२०-२१ २०२१-२२ कमी/वाढलेजिल्हास्तर ४५३ ४०८ ४५ ने कमीमहापालिका ८२२ १०२७ २०५ ने वाढलेएकूण १२७५ १४३५ १६० ने वाढले

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाDeathमृत्यूBeedबीडHealthआरोग्य