शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

आरोग्यविभागाचे अपयश; कोट्यवधी खर्चूनही बाळांतपण होईना सुखरूप, राज्यात १४३५ माता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 13:30 IST

आरोग्य विभागाच्या अपयशाने १६० मृत्यू वाढले :राज्यातील माता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते.

- सोमनाथ खताळबीड : राज्यातील माता मृत्यू रोखण्यात आरोग्य विभागाला अपयश आल्याचे दिसत आहे. २०२१-२२ मध्ये राज्यात तब्बल १४३५ मातांचा जीव गेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल १६० मृत्यू वाढल्याचे समोर आले आहे. रक्तस्त्राव, कोरोना, उच्च रक्तदाब व त्यामुळे होणारी गुंतागुंत यामुळेच सर्वात जास्त मृत्यू होत आहेत. विशेष म्हणजे महापालिकांच्या ठिकाणीच हे मृत्यू वाढले आहेत. जिल्हास्तरावर मृत्यूचा आकडा ४५ ने घटला आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चूनही महिलांचे बाळांतपण सुखरूप हाेत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

राज्यातील माता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते. पोस्टर, योजना, जनजागृती, औषधी, तज्ज्ञ, सोयी, सुविधा, समित्या आदींचा यात समावेश आहे. असले तरी राज्यातील एकूण माता मृत्यू दर कमी करण्यात त्यांना यश येत नसल्याचे दिसते. २०२०-२१ मध्ये राज्यात १ हजार २७५ मातांचा मृत्यू झाला होता. यात घट होण्याऐवजी २०२१-२२ मध्ये १६० ने वाढ होऊन १४३५ एवढा झाला आहे. यावरून आरोग्य विभाग आणि यासाठी काम करणाऱ्या यंत्रणेचे अपयश चव्हाट्यावर आले आहे. आता तरी आरोग्य विभागाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन हे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

कोणत्या कारणामुळे किती मृत्यू?माता मृत्यू होण्यास अनेक कारणे आहेत. याचे विवरण माता अन्वेषण समितीकडून करण्यात आले आहे. यामध्ये रक्तस्त्रावामुळे १३ टक्के मृत्यू होतात. तसेच जंतुसंसर्ग ७ टक्के, उच्च रक्तदाब व त्यामुळे होणारी गुंतागुंत १६ टक्के, कोरोनामुळे १८ टक्के, इतर कारणांमुळे १७ टक्के, कावीळ १ टक्का, हृदयरोग १ टक्का, रक्तक्षय ४ टक्के, गर्भाची गुंतागुंत १ टक्का, गर्भाची पिशवी फाटल्यामुळे १ टक्का आणि २१ टक्के मातांचा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण निश्चितच करता आलेले नाही.

या जिल्हा, शहरांत वाढले मृत्यूजिल्ह्याच्या ठिकाणी ठाण्यात ३, पालघर ७, नंदुरबार २, पुणे ८, लातूर ३, यवतमाळ ५, बुलडाणा ३, नागपूर २, वर्धा ३, गडचिरोली ७ तसेच महापालिकांच्या ठिकाणी मालेगाव १, धुळे १३, जळगाव १७, अहमदनगर ४, पुणे ४६, पिंपरी चिंचवड २, सोलापूर ७, कोल्हापूर १७, सांगली ३३, औरंगाबाद २५, नांदेड १, अकोला १, नागपूर ४० असे मृत्यू वाढले आहेत.

२९ तालुक्यांमध्ये ५ पेक्षा जास्त माता मृत्यूराज्यातील २९ तालुक्यांत ५ पेक्षा जास्त मृत्यू आहेत. यात मालेगाव, करवीर, कर्जत, गोंदिया, धारणी, साकरी, निफड, हातकलंगले, मिरज, अंबेरनाथ, निलंगा, धुळे, नंदुरबार, नवापुर, धानूरा, वर्धा, दिंडोरी, हावेली, अकोल, पुसद, कन्नड, सिल्लोड, कराड, पनवेल, भंडारा, जळगाव, अक्कलकुवा, काळवण, दौंड या तालुक्यांचा समावेश आहे.

राज्यातील माता मृत्यूची आकडेवारी२०२०-२१ २०२१-२२ कमी/वाढलेजिल्हास्तर ४५३ ४०८ ४५ ने कमीमहापालिका ८२२ १०२७ २०५ ने वाढलेएकूण १२७५ १४३५ १६० ने वाढले

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाDeathमृत्यूBeedबीडHealthआरोग्य