शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ऊसतोडणीला जाण्यापूर्वी व नंतर महिलांची आरोग्य तपासणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 19:46 IST

बीडमधील गर्भपिशवी शस्त्रक्रियाप्रकरणी अहवाल सादर

ठळक मुद्देमंत्र्यांनीही तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.

बीड : ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या प्रत्येक महिलेला आरोग्य कार्ड देणे, ऊस तोडणीला जाण्यापूर्वी आणि आल्यानंतर महिलांची आरोग्य तपासणी करणे, साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ऊसतोडणीच्या ठिकाणी महिलांची वैद्यकीय तपासणी करणे, तज्ज्ञांनी केलेल्या एसओपीचा सर्व खासगी रुग्णालयांनी वापर करूनच शस्त्रक्रिया करावी. आदी शिफारशींसह  गर्भपिशवी शस्त्रक्रिया प्रकरणी नेमलेल्या समितीने आरोग्यमंत्र्यांना अहवाल सोपविला आहे. यावर मंत्र्यांनीही तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. 

बीड जिल्ह्यातील गर्भपिशवी शस्त्रक्रिया प्रकरण राज्यभर गाजले. यावर याची चौकशी करण्यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोºहे यांच्या अध्यक्षतेखाली २६ जून रोजी समिती नियूक्त केली होती. या समितीने बीड जिल्ह्यात मुक्काम ठोकून  चौकशी केली. शस्त्रक्रिया झालेल्या महिलांशी संवाद साधला. त्यानंतर सर्व कामगार महिलांचे सर्वेक्षण केले. या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर समितीने यावर अभ्यास केला. त्यानंतर बुधवारी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अहवाल सादर केला. यावेळी समिती अध्यक्षा डॉ.गोºहे यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील यांची उपस्थिती होती.

आता निर्णयाकडे लक्षदोन महिने अभ्यास करून चौकशी समितीने अहवाल सादर केला आहे. यामध्ये आवश्यकता नसताना काही खाजगी रूग्णालयांनी गर्भपिशव्या काढल्याचे समोर आले होते. हे सुद्धा या अहवालात नमूद आहे. आता अशा दोषी रुग्णालयांवर आरोग्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे याकडे  राज्याचे लक्ष लागले आहे.

समितीने मंत्र्यांकडे केलेल्या इतर शिफारशीखासगी स्त्रीरोग तज्ज्ञांनी त्यांच्याकडील गर्भपिशवी शस्त्रक्रियांचा अहवाल दरमहा जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठवावा, सर्व उसतोड मजूरांची नोंदणी सहाय्यक कामगार आयुक्तांकडे करावी, त्यांना ओळखपत्र देण्यात यावीत, गाळप हंगामात कारखाना परिसरात ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह व अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरूपाची स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी, कारखाना परिसरात घरकुल धर्तीवर घरे बांधण्यात यावीत, शेतावर निवासासाठी तंबू उपलब्ध करून देण्यात यावा, प्रत्यक्ष कार्यक्षेत्राच्या ठिकाणी फिरते स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात यावीत, च्कारखान्याच्या ठिकाणी उसतोड मजुरांच्या मुलांसाठी पाळणाघर तयार करावे, मजुरांच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतीगृह व हंगामी शाळा कारखान्यांच्या ठिकाणी सुरू कराव्यात, बालविवाह प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी करावी, ऊसतोडणीला जाण्याआधी मजुरांना सहा महिने पुरेल एवढे स्वस्त धान्य आगाऊ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात यावेमजूरांच्या शिधापत्रिकेवर स्थलांतरीत ठिकाणी स्वस्त धान्य मिळण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करावा, यासह ग्रामस्तरावर समिती स्थापन करणे, शस्त्रक्रिया झालेल्या महिलांचे स्वमदत गट तयार करणे आदी शिफारशी चौकशी समितीने केल्या.

टॅग्स :Healthआरोग्यSugar factoryसाखर कारखानेBeedबीड