शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

सत्ता असताना एक तरी विकासाचे काम केले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:15 IST

राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना तुम्ही विकासाचे एक तरी काम केले का? मग कोणत्या तोंडाने जनतेला मत’ मागता ? किती दिवस भूलथापा देणार अशा शब्दांत भाजपा महायुतीच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी टोकवाडीच्या सभेत राष्ट्रवादीवर शरसंधान साधले. पंकजा मुंडे यांनी या सभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांचा विरोधकांना सवाल : टोकवाडीच्या सभेत राष्ट्रवादीवर शरसंधान

परळी : राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना तुम्ही विकासाचे एक तरी काम केले का? मग कोणत्या तोंडाने जनतेला मत’ मागता ? किती दिवस भूलथापा देणार अशा शब्दांत भाजपा महायुतीच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी टोकवाडीच्या सभेत राष्ट्रवादीवर शरसंधान साधले. पंकजा मुंडे यांनी या सभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.बुडत्या जहाजात बसू नकाराष्ट्रवादीचे जहाज आता बुडणार त्यात बसू नका असे सांगून त्या म्हणाल्या की, विरोधक आता विकासाच्या गप्पा मारत आहेत,पण गल्ली ते दिल्ली त्यांची सत्ता होती तेंव्हा त्यांनी एक तरी विकासाचे काम केले का? मग आता कोणत्या तोंडाने मतदान मागत आहेत. मला मिळणारा प्रतिसाद पाहून राष्ट्रवादीच्या पोटात गोळा आला आहे म्हणून निवडणूक जड असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. खोटे बोलण्यात त्यांना पीएच.डी. मिळाली आहे मात्र जनता सर्व ओळखून आहे. म्हणून ती माझ्या पाठीशी आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येणारी सत्ता ही भाजपा महायुतीची असणार आहे आणि मी त्या माध्यमातून उर्वरित विकास पूर्ण करणार आहे. गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. त्यावरून आपले महत्त्व लक्षात घ्या. येणाऱ्या काळात मोठी संधी मिळणार आहे. त्यामुळे मला भरभरून आशिर्वाद द्या असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, बंकटराव कांदे, निळकंठ चाटे, श्रीराम मुंडे, राजाभैया पांडे, मारूती मुंडे, सुग्रीव मुंडे, जगन्नाथ मुंडे, संजय मुंडे, रामकिशन काळे यांच्यासह जिरेवाडी गटातील सर्व गावचे सरपंच, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.विकासासाठी तुमचा आशीर्वाद गरजेचागेल्या पाच वर्षांत मी आपल्या भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे ग्रामीण भागात विकास पोहचला आहे. चांगले रस्ते झाले, पाण्याची व्यवस्था झाली.मी विकासाला गती देण्याचे काम केले, ही गती वाढविण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे असे त्या म्हणाल्या.मी मताचे राजकारण करीत नाही तर विकासाचे करते. मतदारसंघाच्या विकासासाठी भरपूर निधी दिला. अनेक विकास कामे झाली हे मतदारांना माहीत असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा