शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

हारतुरे न स्वीकारता ग्रंथभेट चळवळ व्हावी - सुरेश धस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 1:41 PM

कोणत्याही समारंभात हारतुर्‍यांना फाटा देत ग्रंथभेट दिली तर खर्‍या अर्थाने ग्रंथ वाचनाची चळवळ गतिमान होईल. असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश धस यांनी केले. 

अंबाजोगाई (बीड) : कोणत्याही समारंभात हारतुर्‍यांना फाटा देत ग्रंथभेट दिली तर खर्‍या अर्थाने ग्रंथ वाचनाची चळवळ गतिमान होईल. असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश धस यांनी केले. 

३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनातील  ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन सुरेश धस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, रमेशराव आडसकर, संजय दौंड, हनुमंतराव मोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. 

सुरेश धस म्हणाले की, दर्जेदार व दुर्मिळ पुस्तकांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. ही पुस्तके व ग्रंथ समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहचले तर अनेक प्रकारचे अज्ञान या माध्यमातून दूर होईल.  पुढे बोलताना ते म्हणाले की, समस्यांचा हुंदका हा साहित्याचा एक भाग आहे. राजकीय विचारधारेवर साहित्याचं प्रतिबिंब उमटलेलं असतं त्यामुळं साहित्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजच्या या भरकटलेल्या पिढीला वाचन चळवळीतूनच प्रेरणा मिळेल. ग्रंथ हेच खरे गुरू असून प्रत्येकाच्या घराघरातील कापाटात पुस्तकांना प्रतिष्ठा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त यावेळी केली. 

संमेलनात मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या विविध प्रकाशकांचे ग्रंथ प्रदर्शन व ४५ विक्री केंदे्र लक्ष वेधत होती. सोमवारपर्यंत प्रदर्शन राहणार असून, दुर्मिळ ग्रंथ येथे उपलब्ध झाले आहेत.

सेल्फी स्थळ ठरले संमेलनाचे आकर्षणया संमेलनानिमित्त संमेलनस्थळी निर्माण करण्यात आलेले  ‘सेल्फी स्थळ’ गर्दी खेचून घेत आहे. संमेलनस्थळी ७ फुट उंचीचे हे स्थळ निर्माण करण्यात आलेला असून साहित्याचे प्रतिनिधित्व करणा-या पुस्तक, दौत, लेखणी आणि मोरपीस या साधनातून या सेल्फी स्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. ७ फुट उंचीचा हा ‘सेल्फी कट्टा’ संमेलनानिमित्त उभारण्यात आलेल्या आद्यकवी मुकुंदराज कटटा आकर्षक ठरत असून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :Marathwada Sahity Sammelanमराठवाडा साहित्य संमेलनBeedबीडliteratureसाहित्य