शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
2
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
3
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
4
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
5
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
6
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
7
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
8
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
9
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
10
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
11
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
12
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
13
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
14
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
15
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
16
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
17
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
18
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
19
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
20
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
Daily Top 2Weekly Top 5

कष्टाने पिकविलेला भाजीपाला मातीमोल, शेतात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:31 IST

धारूर : बाजार बंद व लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी मेहनत करून पिकवलेला भाजीपाला मातीमोल झाला असून जनावरांना घालण्याची वेळ आली आहे. ...

धारूर : बाजार बंद व लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी मेहनत करून पिकवलेला भाजीपाला मातीमोल झाला असून जनावरांना घालण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील जायभायवाडी येथील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी हताश होत शेतात जनावरे सोडण्याचा निर्णय घेतला.

तालुक्यातील डोंगराळ भागातील जायभायवाडी येथे जलसंवर्धनाची कामे झाल्याने फळबाग व भाजीपाला उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. मात्र, मागील वर्षीच्या लाॅकडाऊनमुळे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर, या वर्षी ऐन भाजीपाला विक्रीचा हंगाम असताना कडाडून ऊन पुन्हा सुरू झाल्याने जिवापाड मेहनत व खर्च करून पिकवलेला भाजीपाला मातीमोल भावात विकण्याची वेळ आली. उत्पादनाचा खर्च सोडा, तोडणीचे पैसे मिळणे मुश्कील झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

येथील शेतकरी मनोज जायभाये याने आपल्या डोंगराळ जमिनीवर मेहनत करून पाऊण एकर क्षेत्रावर वांग्याची लागवड केली. आता चांगले पीक हातात येत असताना बाजार बंद व लॉकडाऊनमुळे २५ किलो कॅरेट ४० ते ५० रुपयांत विकण्याची वेळ आली आहे. या शेतकऱ्याने वांग्याच्या शेतात आपले बैल, शेळ्या, म्हशी सोडल्या. तोडलेले वांगे यांना खाऊ घातले. बाजारात मातीमोल भाव मिळत असल्याने परिस्थितीमुळे हताश होऊन हा निर्णय घेतल्याचे मनोज जायभाये यांनी सांगितले. जायभाये यांच्याप्रमाणे सर्वच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची ही परिस्थिती आहे. मोठे आर्थिक नुकसान त्यांना सहन करावे लागत आहे.

===Photopath===

270321\img-20210325-wa0101_14.jpg