कृषी संजीवनी मोहिमेतून महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST2021-06-26T04:23:41+5:302021-06-26T04:23:41+5:30
आवरगाव येथे कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक डी.जी. मुळे, तालुका कृषी अधिकारी एस.डी. शिनगारे ...

कृषी संजीवनी मोहिमेतून महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन
आवरगाव येथे कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक डी.जी. मुळे, तालुका कृषी अधिकारी एस.डी. शिनगारे उपस्थित होते. यावेळी महिला शेतकरी प्रशिक्षणार्थींना रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीनची पेरणी केल्यामुळे कमी पाऊस किंवा अतिवृष्टीमध्ये सोयाबीन पिकाचे नुकसान होत नाही. आंतरमशागत करणे सोपे कसे होते याची माहिती देण्यात आली. यावेळी जैविक बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. बीजप्रक्रियेमुळे उत्पन्नात किमान १० टक्के वाढ होते, असे तज्ज्ञांनी सांगितले. रासायनिक कीटकनाशकांचा कमी वापर करून, सेंद्रिय पद्धतीने अल्पखर्चात कशाप्रकारे निविष्ठा वापरता येतात याचे मार्गदर्शन करण्यात आले. रासायनिक खतांचा दहा टक्के कमी वापर करण्याविषयी महिला शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. या प्रशिक्षण सत्रात उमेदच्या प्रतिनिधी कल्पना लांगोटे, पाणी फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी एस. यू. वाघमोडे, कृषी सहायक महेश बसर्गी, आत्मा विभागाचे बिपीन दरफे, ज्ञानेश्वर धस, संतोष देशमुख, सरपंच पद्मिन जगताप व परिसरातील शेतकरी गटाच्या महिला शेतकरी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेदच्या कृषी सखी आणि पशू सखींनी परिश्रम घेतले.
===Photopath===
250621\img-20210625-wa0146_14.jpg