शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

शेतकर्‍यांसाठी शासकीय मदतच आधार; केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारने प्रथम हात पुढे करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 5:45 PM

राज्य शासन शेतकर्‍यांच्या बाबतीत वेळ काढूपणा करत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना वार्‍यावर सोडण्याची सत्ताधाऱ्यांची भूमिका आहेनिकष आडसर ठरत असतील ते बदलून शेतकर्‍यांना मदत करा

अंबाजोगाई- अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. या नुकसानीतून शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी शासकीय मदतच आधार ठरेल. राज्य सरकारचा मदतीचा हात प्रथम पुढे आला पाहिजे. केंद्र सरकार तर मदत देणारच आहे. केंद्राच्या मदतीची वाट पाहत शेतकर्‍यांना वार्‍यावर न सोडता तात्काळ मदत करावी. अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. अंबाजोगाई तालुक्यात अपत्तीग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

अंबाजोगाई तालुक्यातील चतुरवाडी येथे मंगळवार दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ.नमिता मुंदडा, आ.सुरेश धस, आ.लक्ष्मण पवार, आ.रमेश कराड,आ.अभिमन्यु पवार, रमेशराव आडसकर, भिमराव धोंडे, अक्षय मुंदडा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाजपाचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, भगवान केदार, प्रवक्ते राम कुलकर्णी, सांरंग  पुजारी, अ‍ॅड.संतोष लोमटे यांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित शेतकर्‍यांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, वर्षभरापासुन सातत्याने शेतकर्‍यांवर संकटाचा मारा सुरूच आहे. अतिवृष्टी, वादळी, पाऊस, गारपीट यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांनी पिकविमा भरूनही विमा कंपन्या शेतकर्‍यांना मुर्ख बनवत आहेत. अशा स्थितीत शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली पाहिजे. मात्र राज्य शासन शेतकर्‍यांच्या बाबतीत वेळ काढूपणा करत आहे.  त्यांना वार्‍यावर सोडण्याची सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली. 

...तर नियम बदलाअतिवृष्टी व वादळी पावसाने शेतकर्‍यांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात इतर पिकांसोबत ऊस मोठ्या प्रमाणात आडवा पडला आहे. या संदर्भात नुकसानीची मागणी शेतकर्‍यांनी शासनाकडे केली आहे. मात्र शासन हे नुकसान निकषात बसत नाही असे कारण पुढे करून शेतकर्‍यांना टाळत आहे. असे निकष आडसर ठरत असतील ते बदलून शेतकर्‍यांना मदत केली पाहिजे अशी मागणीही फडणवीस यांनी केली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीडFarmerशेतकरी