शाळेसाठी शासनाची घंटा, पण पालक काय ठरवणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:05+5:302021-07-07T04:41:05+5:30

बीड : कोरोनाची लाट ओसरत असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात इयत्ता ८ वी ते ...

Government bell for school, but what will parents decide? | शाळेसाठी शासनाची घंटा, पण पालक काय ठरवणार ?

शाळेसाठी शासनाची घंटा, पण पालक काय ठरवणार ?

बीड : कोरोनाची लाट ओसरत असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वीजे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना केल्या असून संबंधित गावातील ग्रामपंचायतीने पालकांशी चर्चा करून ठराव करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बीड जिल्ह्यात ७४७ ग्रामपंचायती कोविडमुक्त असल्याने स्थानिक पातळीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

कोविड संसर्गामुळे एक वर्षापासून शाळा बंद व मुले घरी राहिल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान झले. सामाजिक कौशल्यांचे नुकसान झाले तसेच मोबाईल, इंटरनेटचा गैरवापर, व गेम्सच्या आहारी गेले आहेत तसेच नैराश्य वाढले आहे.अनेक मुले ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिल्याने मानसिक तणाव वाढले आहेत. बालविवाह, बालमजुरीचे वाढते प्रमाण, मुलींचे ड्रॉपआऊट व घर, शेतीकामात ठेवण्यामुळे सामाजिक नुकसान लक्षात घेत विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ होण्यासाठी कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत शासनाने सूचना केल्या आहेत.

बीड जिल्ह्यात कोरोनाची लाट उतरणीला लागली आहे. ७४७ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झालेल्या आहेत. या ठिकाणी शाळा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून लवकरच चाचपणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी संगितले.

----

कोविडमुक्त क्षेत्रात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना मिळाल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतील. यासंदर्भात आवश्यक माहिती संकलित करत आहोत.

- डॉ. विक्रम सारूक, शिक्षणाधिकारी, (मा.), बीड.

--------

वडवणी १९, अंबाजोगाई ८१, बीड १८०, गेवराई ७७, आष्टी ४७, पाटोदा ३९, शिरूर ०, माजलगाव ७१, धारूर ५१, केज १०५, परळी ७७ , एकूण ७४७

----------

जिल्ह्यात ७४७ ग्रामपंचायती कोविडमुक्त असल्या तरी त्या ठिकाणी माध्यमिक शाळा व ११ वी आणि १२ वीचे वर्ग असतीलच असे नाही. त्यामुळे किती गावांमध्ये शाळा सुरू करता येतील तसेच किती ग्रामपंचायती पालकांशी चर्चा करून ठराव करतील, या बाबी लक्षात घ्याव्या लागणार आहेत.

----------

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा

खासगी व्यवस्थापनाच्या शाळा ७१२

जिल्हा परिषदेच्या शाळा ५६

एकूण ७६८

------------

Web Title: Government bell for school, but what will parents decide?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.