शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

‘शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ७० हजारांची मदत द्या’- जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 01:11 IST

शेतक-यांना हेक्टरी ७० हजार रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. या दुष्काळामध्ये खरीप व रबी हंगामात पेरणी होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे शेतक-यांना हेक्टरी ७० हजार रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली. ते शेकापच्या मराठवाडा विभागीय दुष्काळी परिषदेत बोलत होते.यावेळी आ. बाळाराम पाटील, माजी आ. गंगाधर गाडे, नामदेव चव्हा़ण, राजू कोरडे, बाळासाहेब घुंबरे, काकासाहेब शिंदे, उमाकांत राठोड, संग्राम तुपे, मोहन जाधव, विष्णू घोलप आदींसह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दुष्काळी परिषदेत बोलताना आ. जयंत पाटील म्हणाले, मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे येथील शेतकरी संकटात आहे. त्याचसोबत बीड हा जिल्हा मजुरांचा जिल्हा आहे, महाराष्ट्रातले सगळे साखर कारखाने या मजुरांच्या जिवावर आहेत. मात्र येथील नेत्यांनी या कामगारांनी राजकारण केले मोठे झाले, विविध पदे मिळवली परंतू मजुरांची संख्या कमी होण्यापेक्षा वाढत आहे. या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सभागृहात आम्ही मागणी केली आहे, कोकणातून समुद्रात जाणारे पाणी मुंबईकडे वळवा व नाशिकचे पाणी मराठवाडा व प्रमुख्याने बीड जिल्ह्याकडे वळवा परंतू शासनाने ही मागणी गांभिर्याने घेतली नाही. या अधिवेशनात देखील ही मागणी लावून धरली जाईल. शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे शेतक-यांना सरसकट मदत देण्यात यावी, व विमा कंपन्या बंद करुन थेट शेतक-यांना ७० हजार रुपये हेक्टरी मदत करण्यात यावी. तसेच शेततळ््यांचे निकष बदलण्यात यावेत अशी मागणी देखील यावेळी आ.जयंत पाटील यांनी केली.तसेच पुढे बोलताना आ.पाटील म्हणाले शेकाप प्रसिद्धीसाठी काम करत नाही, तर शेतक-यांशी बांधिलकी असणारा हा पक्ष आहे. दुष्काळी परिस्थिती व शासकीय धोरणांमुळे शेती करणे कठीन झाले आहे. त्यामुळे यापुढे शेतीची कामे ही रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात यावीत, तसेच लागणोर बियाणे, खते ही मोफत देण्यात यावी अशी मागणी यावेळी केली. आ. बाळाराम पाटील, काकासाहेब शिंदे, उमाकांत राठोड, एस.व्ही जाधव यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.अप्रत्यक्षरीत्या मंत्री पंकजा मुंडे यांना टोलाउसतोड मजुरांचा प्रश्न मांडणारे व सोडवणारे एकमेव नेते होऊन गेले ते म्हणजे गोपीनाथ मुंडे. असा नेता पुन्हा होणे नाही, तसेच त्यांच्या पुण्याईवर राजकारण सुरु आहे. त्यांच्या पश्चात ऊसतोड कामगारांचे हाल होत आहेत. त्यांच्या मतावर राजकारण करणारे ऐषोआरामात फिरतात हे चित्र बदलले पाहिजे. बीडमधील घराणेशाहीला हाकलले पाहिजे, अशी टीका मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव न घेता पाटील यांनी केली. तसेच सर्वसामान्य उमेदवाराच्या पाठीमागे येणा-या निवडणुकीत उभा राहण्याचे आवाहन देखील आ. जयंत पाटील यांनी केले.मराठवाड्याला हक्काचे १६० टीएमसी पाणी द्यापाऊस नसल्यामुळे मराठवाड्याचा वाळवंट झाला आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्राने गोदावरीचे पाणी आडवल्यामुळे मराठवाड्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे मराठवाड्याला गोदावरी व कृष्णा खोºयातील हक्काचे १६० टीएमसी व अतिरिक्त ३०० टीएमसी पाणी देण्यात यावे तरच मराठवाड्यातील पाणीप्रश्न सुटणार आहे. पुढील काळात यासाठी शे.का.पक्ष जनांदोलन उभारु असा इशारा भाई एस.व्ही जाधव यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारणdroughtदुष्काळ