शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ७० हजारांची मदत द्या’- जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 01:11 IST

शेतक-यांना हेक्टरी ७० हजार रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. या दुष्काळामध्ये खरीप व रबी हंगामात पेरणी होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे शेतक-यांना हेक्टरी ७० हजार रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली. ते शेकापच्या मराठवाडा विभागीय दुष्काळी परिषदेत बोलत होते.यावेळी आ. बाळाराम पाटील, माजी आ. गंगाधर गाडे, नामदेव चव्हा़ण, राजू कोरडे, बाळासाहेब घुंबरे, काकासाहेब शिंदे, उमाकांत राठोड, संग्राम तुपे, मोहन जाधव, विष्णू घोलप आदींसह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दुष्काळी परिषदेत बोलताना आ. जयंत पाटील म्हणाले, मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे येथील शेतकरी संकटात आहे. त्याचसोबत बीड हा जिल्हा मजुरांचा जिल्हा आहे, महाराष्ट्रातले सगळे साखर कारखाने या मजुरांच्या जिवावर आहेत. मात्र येथील नेत्यांनी या कामगारांनी राजकारण केले मोठे झाले, विविध पदे मिळवली परंतू मजुरांची संख्या कमी होण्यापेक्षा वाढत आहे. या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सभागृहात आम्ही मागणी केली आहे, कोकणातून समुद्रात जाणारे पाणी मुंबईकडे वळवा व नाशिकचे पाणी मराठवाडा व प्रमुख्याने बीड जिल्ह्याकडे वळवा परंतू शासनाने ही मागणी गांभिर्याने घेतली नाही. या अधिवेशनात देखील ही मागणी लावून धरली जाईल. शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे शेतक-यांना सरसकट मदत देण्यात यावी, व विमा कंपन्या बंद करुन थेट शेतक-यांना ७० हजार रुपये हेक्टरी मदत करण्यात यावी. तसेच शेततळ््यांचे निकष बदलण्यात यावेत अशी मागणी देखील यावेळी आ.जयंत पाटील यांनी केली.तसेच पुढे बोलताना आ.पाटील म्हणाले शेकाप प्रसिद्धीसाठी काम करत नाही, तर शेतक-यांशी बांधिलकी असणारा हा पक्ष आहे. दुष्काळी परिस्थिती व शासकीय धोरणांमुळे शेती करणे कठीन झाले आहे. त्यामुळे यापुढे शेतीची कामे ही रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात यावीत, तसेच लागणोर बियाणे, खते ही मोफत देण्यात यावी अशी मागणी यावेळी केली. आ. बाळाराम पाटील, काकासाहेब शिंदे, उमाकांत राठोड, एस.व्ही जाधव यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.अप्रत्यक्षरीत्या मंत्री पंकजा मुंडे यांना टोलाउसतोड मजुरांचा प्रश्न मांडणारे व सोडवणारे एकमेव नेते होऊन गेले ते म्हणजे गोपीनाथ मुंडे. असा नेता पुन्हा होणे नाही, तसेच त्यांच्या पुण्याईवर राजकारण सुरु आहे. त्यांच्या पश्चात ऊसतोड कामगारांचे हाल होत आहेत. त्यांच्या मतावर राजकारण करणारे ऐषोआरामात फिरतात हे चित्र बदलले पाहिजे. बीडमधील घराणेशाहीला हाकलले पाहिजे, अशी टीका मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव न घेता पाटील यांनी केली. तसेच सर्वसामान्य उमेदवाराच्या पाठीमागे येणा-या निवडणुकीत उभा राहण्याचे आवाहन देखील आ. जयंत पाटील यांनी केले.मराठवाड्याला हक्काचे १६० टीएमसी पाणी द्यापाऊस नसल्यामुळे मराठवाड्याचा वाळवंट झाला आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्राने गोदावरीचे पाणी आडवल्यामुळे मराठवाड्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे मराठवाड्याला गोदावरी व कृष्णा खोºयातील हक्काचे १६० टीएमसी व अतिरिक्त ३०० टीएमसी पाणी देण्यात यावे तरच मराठवाड्यातील पाणीप्रश्न सुटणार आहे. पुढील काळात यासाठी शे.का.पक्ष जनांदोलन उभारु असा इशारा भाई एस.व्ही जाधव यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारणdroughtदुष्काळ