शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

साडेचार हजार पशुधनाला मिळाले ‘राहत’मुळे जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:24 AM

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस नसल्यामुळे रबी व खरीप दोन्ही हंगामात पिकांची लागवड झाली नव्हती, त्यामुळे चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार होता. तसेच डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे जनावरं सांभाळणे कठीण झाले होते.

ठळक मुद्देजेवणाची व्यवस्था । १३ ते १४ गावांतील शेतकऱ्यांनी घेतला राहत शिबिरात आश्रय

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस नसल्यामुळे रबी व खरीप दोन्ही हंगामात पिकांची लागवड झाली नव्हती, त्यामुळे चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार होता. तसेच डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे जनावरं सांभाळणे कठीण झाले होते. अनेक पशुपालक शेतकºयांनी कवडीमोल भावाने आपली जनावरे बाजारात विकली. त्यानंतर शासनाच्या वतीने गोशाळेच्या माध्यमातून बीड तालुक्यातील पालवन येथे ‘राहत’ शिबीर सुरु करण्यात आले. शिबिरामुळे १३ ते १४ गावांमधील साडेचार हजार जनावरांना जीवदान मिळाले आहे.बीड शहराच्या आसपास बहूतांश गावांमधील शेती ही खडकाळ आहे. त्यामुळे पिकांपेक्षा शहर जवळ असल्यामुळे शेतकºयांमधून दुग्ध व्यवसायाला पसंती दिली जाते. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे चारा-पाण्याची टंचाई जाणवत होती. अनेक शेतकºयांना पशुधन कसे टिकवायचे, हा प्रश्न पडला होता. तसेच छावण्या सुरु करण्याचा शासनाचा निर्णय झालेला नव्हता. मात्र, पालवन परिसरातील राजेंद्र मस्के यांच्या गोशाळेच्या माध्यमातून ‘राहत’ शिबिराला मान्यता मिळाली व ते सुरु झाले. परिसरातील शेतकरी आपल्या बिºहाडासह या शिबिरावर राहायला आले. या राहत शिबिरामुळे पशुधन वाचल्याचे शेतकºयांमधून सांगण्यात आले.शेतकºयांसाठी जेवणबीड शहराच्या परिसरातील १३ ते १४ गावांमधील शेतकरी या राहत शिबिरात सहभागी झाले आहेत. अनेक जण मागील चार महिन्यापासून आपल्या कुटुंबासोबत तर काही जण जनावरांची देखरेख करण्यासाठी एक जण राहत शिबिरावर वास्तव्यास असतो. त्यांच्या जेवणाची व्यवस्था होत नसल्याचे दिसून आल्यानंतर राहत शिबिरावरच जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय राहत शिबिराचे चालक राजेंद्र मस्के यांनी घेतला आहे.लसीकरणामुळे साथीचे रोग नाहीतएकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने जनावरे एकत्र आल्यानंतर साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते मात्र, त्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी लसीकरण केले जात आहे. त्यामुळे जनारवांचे स्वास्थ चांगले आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संतोष पालवे यांनी दिली.गांडूळ खत निर्मितीचा प्रयोगराहत शिबिरावर पडलेल्या शेणावर प्रक्रिया करुन गांडूळ खत निर्मिती करण्यात येत आहे. या माध्यमातून उत्पादन कसे घ्यावे याचे प्रशिक्षण देखील राहत शिबिरावर शेतकºयांना दिले जात आहे. त्यामुळे शेतकºयांना दुग्ध व्यवसायासोबतच इतर पुरक व्यवसायातून आपली प्रगती साधता येणार आहे.रोज लागतो ८५ टन चारासाडेचार हजारांपेक्षा अधिक जनावरे असलेल्या राहत शिबिरात रोज ८५ टन चारा वाटप केला जातो. तसेच इतर राज्यातून मुर घास आणला असून त्याचे देखील वाटप केले जाते. तसेच जनावरांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक शेतकºयांसाठी पाण्याची व्यवस्था त्यांच्या जवळ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रोज सकाळी व संध्याकाळी येथील शेतकरी बीड शहरात दुधाची विक्री करतात. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळत असल्याचे शेतकºयांमधून सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र