गेवराईत व्यापारी पेठ, बँकेत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST2021-06-26T04:23:44+5:302021-06-26T04:23:44+5:30
गेवराई : कोरोना स्थितीमध्ये बीड जिल्हा तिसऱ्या स्तरात असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले, मात्र याचा गैरफायदा ...

गेवराईत व्यापारी पेठ, बँकेत गर्दी
गेवराई : कोरोना स्थितीमध्ये बीड जिल्हा तिसऱ्या स्तरात असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले, मात्र याचा गैरफायदा घेत शहरात व ग्रामीण भागातील बँकेत, दुकानात, व्यापारी पेठेत लोक दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तर सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश असतानाही शहरातील व ग्रामीण भागातील दुकाने बिनधास्तपणे रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवली जात आहेत. त्यामुळे कोरोना नियमांची पायमल्ली होत असून कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्ह्यातील अनेक निर्बंध शिथिल केले होते. त्यामुळे तालुक्यातील सर्वच दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उघडण्यास मुभा दिली. कोणत्याही ठिकाणी जास्त गर्दी करू नये, तोंडाला मास्क लावणे, विनाकारण रस्त्यावर फिरू नये, असे आदेश प्रशासनाने वेळोवेळी दिलेले आहेत. असे असतानाही शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी गर्दी होत असल्याने यात कोरोना नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवली जात आहेत. नगर परिषद, पोलीस, महसूल विभागाचे कोणतेच अधिकारी फिरकत नसल्याने गर्दीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.
===Photopath===
250621\20210625_134729_14.jpg