शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

धारूरच्या डोंगरात गावरान मेव्याचे वैभव परतणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 18:36 IST

शेतकऱ्यांनी माळरानावर तब्बल १,६०० झाडे लावली आहेत. 

ठळक मुद्देजलसंधारणामुळे आशेचा किरण  जायभायवाडीत माळरानावर फुलली पुन्हा सीताफळाची झाडे

- अनिल महाजन 

धारूर (जि. बीड) : ऊसतोड कामगारांचे गाव असलेले धारूर तालुक्यातील जायभायवाडी हे सीताफळासाठीही प्रसिद्ध. मात्र, सततच्या दुष्काळामुळे  हे गाव उजाड झाले. आता जलसंधारणाच्या कामातून येथे आशेचा किरण दिसू लागला असून, गावरान मेव्याचे गतवैभव आणण्यासाठी जायभायवाडीच्या शेतकऱ्यांनी माळरानावर तब्बल १,६०० झाडे लावली आहेत. 

अतिदुर्गम भागात आणि डोंगरदरीत असलेल्या जायभायवाडी गावात सीताफळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होते. एके काळी याच गावात सीताफळ खरेदी करण्यासाठी बाहेरचे मोठे व्यापारी येत. सीताफळाचा दर्जा आणि आकार पाहून सौदे व्हायचे. परिसरातल्या लोकांना रोजगार मिळायचा. शेतकऱ्यांनाही पैसा मिळू लागला. 

दररोज किमान दोन ट्रक भरून सीताफळे खरेदी करून बाहेरगावचे व्यापारी विक्रीसाठी नेत असत; परंतु मागील सहा- सात वर्षांत निसर्गाने धोका दिला. झाडे पाण्याअभावी वाळून गेली. सीताफळातून मिळणारा आर्थिक स्रोत बंद झाला; पण म्हणून येथील शेतकरी खचले नाहीत. गावातील अशोक महादेव जायभाये, मनोज पंडितराव जायभाये, बाबासाहेब पांडुरंग जायभाये, उपसरपंच डॉ. सुंदर अर्जुन जायभाये आदी शेतकऱ्यांनी प्रत्येकी ४०० (एकूण १,६००) झाडे लावली. विशेष म्हणजे माळरानावर जेसीबीने खड्डे खोदून त्यात रोपे लावली. निसर्गाने साथ दिली, तर येणाऱ्या चार-पाच वर्षांत पहिल्यासारखेच नंदनवन फुलणार, असा विश्वास हे शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

चौघांपासून प्रेरणाजून २०१८ मध्ये या चौघांनी झाडे लावलेली आहेत. येत्या दोन वर्षांत वाढणाऱ्या झाडांना फळे लगडणार असून, चांगला भाव मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांचे पाहून ग्रामस्थही प्रेरणा घेत कष्ट करीत आहेत. येत्या जूनमध्ये थोडी- फार झाडे लावावीत. शेतीला पूरक उद्योग म्हणून सीताफळाची शेती करावी, पुन्हा या उजाड झालेल्या डोंगरावर सीताफळाची शेती करून स्वत:साठी आर्थिक स्रोत उभा करावा म्हणून जलसंधारण चळवळीतून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सधन होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

जलबचतीवर भर :

या शेतकऱ्यांनी बोअरवरून झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. त्याचबरोबर पाण्याचा अतिवापर होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेतलेली आहे. दोन वर्षांपासून जायभायवाडीत जलसंधारणाची जी कामे झालेली आहेत, त्याचा फायदा झाला. बोअर आणि विहिरीतील पाण्याची पातळी वाढली. बंद पडलेले बोअर चालू झाले. प्रत्येक ओढ्यावर सिमेंट बंधारे, लहान लहान ओघळीवर अनघड दगडी बांध, माती बंधारे यासारखे उपचार  केले. तळहाताला फोड येईपर्यंत ग्रामस्थांनी कष्ट केले. त्याचे फळ लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

टॅग्स :fruitsफळेagricultureशेतीFarmerशेतकरी