शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

धारूरच्या डोंगरात गावरान मेव्याचे वैभव परतणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 18:36 IST

शेतकऱ्यांनी माळरानावर तब्बल १,६०० झाडे लावली आहेत. 

ठळक मुद्देजलसंधारणामुळे आशेचा किरण  जायभायवाडीत माळरानावर फुलली पुन्हा सीताफळाची झाडे

- अनिल महाजन 

धारूर (जि. बीड) : ऊसतोड कामगारांचे गाव असलेले धारूर तालुक्यातील जायभायवाडी हे सीताफळासाठीही प्रसिद्ध. मात्र, सततच्या दुष्काळामुळे  हे गाव उजाड झाले. आता जलसंधारणाच्या कामातून येथे आशेचा किरण दिसू लागला असून, गावरान मेव्याचे गतवैभव आणण्यासाठी जायभायवाडीच्या शेतकऱ्यांनी माळरानावर तब्बल १,६०० झाडे लावली आहेत. 

अतिदुर्गम भागात आणि डोंगरदरीत असलेल्या जायभायवाडी गावात सीताफळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होते. एके काळी याच गावात सीताफळ खरेदी करण्यासाठी बाहेरचे मोठे व्यापारी येत. सीताफळाचा दर्जा आणि आकार पाहून सौदे व्हायचे. परिसरातल्या लोकांना रोजगार मिळायचा. शेतकऱ्यांनाही पैसा मिळू लागला. 

दररोज किमान दोन ट्रक भरून सीताफळे खरेदी करून बाहेरगावचे व्यापारी विक्रीसाठी नेत असत; परंतु मागील सहा- सात वर्षांत निसर्गाने धोका दिला. झाडे पाण्याअभावी वाळून गेली. सीताफळातून मिळणारा आर्थिक स्रोत बंद झाला; पण म्हणून येथील शेतकरी खचले नाहीत. गावातील अशोक महादेव जायभाये, मनोज पंडितराव जायभाये, बाबासाहेब पांडुरंग जायभाये, उपसरपंच डॉ. सुंदर अर्जुन जायभाये आदी शेतकऱ्यांनी प्रत्येकी ४०० (एकूण १,६००) झाडे लावली. विशेष म्हणजे माळरानावर जेसीबीने खड्डे खोदून त्यात रोपे लावली. निसर्गाने साथ दिली, तर येणाऱ्या चार-पाच वर्षांत पहिल्यासारखेच नंदनवन फुलणार, असा विश्वास हे शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

चौघांपासून प्रेरणाजून २०१८ मध्ये या चौघांनी झाडे लावलेली आहेत. येत्या दोन वर्षांत वाढणाऱ्या झाडांना फळे लगडणार असून, चांगला भाव मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांचे पाहून ग्रामस्थही प्रेरणा घेत कष्ट करीत आहेत. येत्या जूनमध्ये थोडी- फार झाडे लावावीत. शेतीला पूरक उद्योग म्हणून सीताफळाची शेती करावी, पुन्हा या उजाड झालेल्या डोंगरावर सीताफळाची शेती करून स्वत:साठी आर्थिक स्रोत उभा करावा म्हणून जलसंधारण चळवळीतून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सधन होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

जलबचतीवर भर :

या शेतकऱ्यांनी बोअरवरून झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. त्याचबरोबर पाण्याचा अतिवापर होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेतलेली आहे. दोन वर्षांपासून जायभायवाडीत जलसंधारणाची जी कामे झालेली आहेत, त्याचा फायदा झाला. बोअर आणि विहिरीतील पाण्याची पातळी वाढली. बंद पडलेले बोअर चालू झाले. प्रत्येक ओढ्यावर सिमेंट बंधारे, लहान लहान ओघळीवर अनघड दगडी बांध, माती बंधारे यासारखे उपचार  केले. तळहाताला फोड येईपर्यंत ग्रामस्थांनी कष्ट केले. त्याचे फळ लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

टॅग्स :fruitsफळेagricultureशेतीFarmerशेतकरी