शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

गेवराई तालुक्यात हातपंप, विहिरी ठरताहेत कुचकामी; ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 15:16 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उन्हाळ्यात आठवण येते ती हातपंप व विहिरीची; पण प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहारांसह अनेक गावातील हातपंप नादुरूस्त अवस्थेत दिसून येतात.

ठळक मुद्देजिल्हा व तालुका प्रशासनाकडून दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात.तालुक्यातील हातपंप आणि विहिरी कुचकामी ठरत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

गेवराई (बीड ) : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उन्हाळ्यात आठवण येते ती हातपंप व विहिरीची; पण प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहारांसह अनेक गावातील हातपंप नादुरूस्त अवस्थेत दिसून येतात. दरवर्षी नवीन हातपंपावर मात्र नित्यनेमाने पैसा खर्च केला जातो. या कारभारामुळे तालुक्यातील हातपंप आणि विहिरी कुचकामी ठरत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

जिल्हा व तालुका प्रशासनाकडून दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. यात नवीन हातपंप करणे, विहिरींचे अधिग्रहण करणे, विहिरींमध्ये बोअर करणे इ. अनेक उपायांचा समावेश असतो. मात्र, हे करीत असताना जुन्या हातपंपांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे प्रकर्षाने जाणवते. परिणामी अनेक ठिकाणचे हातपंप बंद अवस्थेत दिसतात.

गेवराई तालुक्यातील गढी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, जय भवानी नगर, नवोदय विद्यालय येथील काही हातपंप गत अनेक दिवसांपासून बंद आहेत. अन्य ठिकाणचे हातपंपही अनेक दिवसांपासून बंद आहेत. भूगर्भातील पाणी पातळी खालावल्यामुळे हातपंप कुचकामी ठरू लागले आहेत. पंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हे हातपंप दुरूस्त करणे गरजेचे झाले आहे. गढीतील हातपंप तक्रार करूनही नादुरूस्त अवस्थेतच आहेत. गढी तथा गेवराई तालुक्यातील अनेक गावांतील हातपंप मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. परिणामी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हातपंप बंद असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या; पण संबधित यंत्रणा दुरूस्त करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत गेवराई पंचायत समिती येथील गट विकास अधिकारी एन.पी. राजगुरु यांना माहिती विचारण्यासाठी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

हातपंप बनले शोभेची वस्तूतालुक्यातील अनेक गावांत हातपंप आहेत; पण कुठे पाणी खोल गेले तर कुठे दांड्यांनी माना टाकल्या आहेत. परिणामी हे हातपंप शोभेची वस्तू ठरत असल्याचे दिसून येत आहे. उपयोगाचे नसल्याने अनेक हातपंप माती मुरूमामध्ये दबलेल्या स्थितीत आढळून येतात. त्या हातपंपाची दुरूस्ती करून ते उपयोगात आणण्याचे प्रयत्न कुठेही होताना दिसत नाही. दरवर्षी नवीन हातपंपांची मागणी वाढताना दिसून येत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. तालुक्यातील हातपंपाची दुरूस्ती करण्याबाबत प्रशासन कायम उदासीन भूमिका घेत आहे. काही हातपंपांची चेन तुटली, तर कुठे पाणी खोल गेल्याने हातपंप बंद आहे.यामुळे महिलांना शेतशिवारातून पाणी आणावे लागते. ग्रामसेवकांनी तक्रार करुनही दुरूस्तीचे वाहन आले नाही.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईBeedबीडFarmerशेतकरी