शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

गेवराई तालुक्यात हातपंप, विहिरी ठरताहेत कुचकामी; ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 15:16 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उन्हाळ्यात आठवण येते ती हातपंप व विहिरीची; पण प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहारांसह अनेक गावातील हातपंप नादुरूस्त अवस्थेत दिसून येतात.

ठळक मुद्देजिल्हा व तालुका प्रशासनाकडून दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात.तालुक्यातील हातपंप आणि विहिरी कुचकामी ठरत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

गेवराई (बीड ) : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उन्हाळ्यात आठवण येते ती हातपंप व विहिरीची; पण प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहारांसह अनेक गावातील हातपंप नादुरूस्त अवस्थेत दिसून येतात. दरवर्षी नवीन हातपंपावर मात्र नित्यनेमाने पैसा खर्च केला जातो. या कारभारामुळे तालुक्यातील हातपंप आणि विहिरी कुचकामी ठरत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

जिल्हा व तालुका प्रशासनाकडून दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. यात नवीन हातपंप करणे, विहिरींचे अधिग्रहण करणे, विहिरींमध्ये बोअर करणे इ. अनेक उपायांचा समावेश असतो. मात्र, हे करीत असताना जुन्या हातपंपांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे प्रकर्षाने जाणवते. परिणामी अनेक ठिकाणचे हातपंप बंद अवस्थेत दिसतात.

गेवराई तालुक्यातील गढी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, जय भवानी नगर, नवोदय विद्यालय येथील काही हातपंप गत अनेक दिवसांपासून बंद आहेत. अन्य ठिकाणचे हातपंपही अनेक दिवसांपासून बंद आहेत. भूगर्भातील पाणी पातळी खालावल्यामुळे हातपंप कुचकामी ठरू लागले आहेत. पंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हे हातपंप दुरूस्त करणे गरजेचे झाले आहे. गढीतील हातपंप तक्रार करूनही नादुरूस्त अवस्थेतच आहेत. गढी तथा गेवराई तालुक्यातील अनेक गावांतील हातपंप मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. परिणामी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हातपंप बंद असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या; पण संबधित यंत्रणा दुरूस्त करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत गेवराई पंचायत समिती येथील गट विकास अधिकारी एन.पी. राजगुरु यांना माहिती विचारण्यासाठी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

हातपंप बनले शोभेची वस्तूतालुक्यातील अनेक गावांत हातपंप आहेत; पण कुठे पाणी खोल गेले तर कुठे दांड्यांनी माना टाकल्या आहेत. परिणामी हे हातपंप शोभेची वस्तू ठरत असल्याचे दिसून येत आहे. उपयोगाचे नसल्याने अनेक हातपंप माती मुरूमामध्ये दबलेल्या स्थितीत आढळून येतात. त्या हातपंपाची दुरूस्ती करून ते उपयोगात आणण्याचे प्रयत्न कुठेही होताना दिसत नाही. दरवर्षी नवीन हातपंपांची मागणी वाढताना दिसून येत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. तालुक्यातील हातपंपाची दुरूस्ती करण्याबाबत प्रशासन कायम उदासीन भूमिका घेत आहे. काही हातपंपांची चेन तुटली, तर कुठे पाणी खोल गेल्याने हातपंप बंद आहे.यामुळे महिलांना शेतशिवारातून पाणी आणावे लागते. ग्रामसेवकांनी तक्रार करुनही दुरूस्तीचे वाहन आले नाही.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईBeedबीडFarmerशेतकरी