शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अंबाजोगाईत उत्खननातून मंदिराचा लागला शोध; रंगशिळा, दुर्मिळ मूर्ती सापडल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 15:24 IST

शहरातील पुरातन व ऐतिहासिक असलेल्या संकलेश्वर (बाराखांबी) मंदिर परिसरात पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खननाचे काम चालू झाले आहे. या उत्खननात एका मंदिराचा शोध लागला आहे.

- अविनाश मुडेगांवकर 

अंबाजोगाई (बीड) : शहरातील पुरातन व ऐतिहासिक असलेल्या संकलेश्वर (बाराखांबी) मंदिर परिसरात पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खननाचे काम चालू झाले आहे. या उत्खननात एका मंदिराचा शोध लागला आहे. उत्खनन सुरू असतांना नवीन मंदिराची रंगशिळा निघाली तर अनेक दुर्मिळ मूर्तींसह नवनवीन अवशेष हाती लागू लागले आहेत. 

११ व्या शतकातील यादवकालीन व चालुक्यांचा प्रभाव असलेल्या संकलेश्वर (बाराखांबी) मंदिर परिसरात पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनालयच्या वतीने १८ मार्चपासून उत्खननाचे काम सुरू झाले आहे. मंदिराच्या उत्तर व दक्षिण बाजूने उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन सुरू होताच उत्तर बाजूला नवे मंदिर सापडले. ढिगाऱ्याखाली दडलेल्या या मंदिराची मोठी रंगशिळा पायाभागात निघाली तर द्वारशाखेच्या बाजूला असणारी एक विष्णूची पुरातन सुंदर अशी मूर्ती सापडली आहे. तसेच चुन्यापासून तयार केलेल्या मूर्तीचे भाग, तत्कालिन खापरी भांडयाचे तुकडे, दगडाप्रमाणेच  घडविलेल्या विटा, अशा अनेक दुर्मिळ वस्तू उत्खननातून निघाल्या आहेत. तर दक्षिण-पश्चिम बाजूस झालेल्या उत्खननात दगडी शिळेच्या पुरातन पायऱ्या निघाल्या. या पायऱ्यांवर गजधर आढळून आलेला आहे. तर मंदिराच्या पूर्वेकडे समोरील बाजूस मोठे कुंड असून या कुंडाचे खोदकामही होणार आहे. पुरातत्व विभागाच्या औरंगाबाद येथील सहाय्यक संचालक कार्यालयातील सहा अधिकारी व कर्मचारी यांचे पथक अंबाजोगाईत तळ ठोकून आहेत. यात तंत्रसहाय्यक, निलिमा मार्केडे, पुरातत्व समन्वयक मयुरेश खडके, स्नेहाली खडके, कामाजी डक, मुश्रीफ पठाण, सर्वेक्षक प्रल्हाद सोनकांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खननाचे काम गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे. 

तीन मंदिरांची शृंखलासंकलेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेल्या उत्खननाचे काम सुरू झाल्यानंतर एक नवीन मंदिर उत्खननातून पुढे आले. सध्या असलेल्या संकलेश्वर मंदिराच्या उत्तर बाजूस दोन्ही मंदिरे असावीत असा अंदाज पुरातत्व खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शिवमंदिराच्या बाजूला तीन मंदिरे असल्याचा शोध ठिकठिकाणी लागलेला आहे. याही ठिकाणी तीन मंदिरांची शृंखला  असावी असा अंदाज वर्तवून उत्खननाचे काम सुरूच आहे. 

‘त्या’ ७० ते ८० मुर्त्या सुरक्षितदीड वर्षापूर्वी अंबाजोगाई येथील काही हौसी नागरिकांनी संकलेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवितांना जेसीबीच्या सहाय्याने मंदिर परिसरातील मुर्त्या हलविल्या या प्रकारामुळे मुर्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. ही घटना पुरातत्व खात्याला कळाल्यानंतर पुरातत्व खात्याचे सहाय्यक संचालक अजित खंदारे यांनी  दखल घेऊन त्या मुर्त्या सुरक्षित स्थळी हलविल्या.आता पुरातत्व विभागाने तयार केलेल्या नवीन शेडमध्ये त्या मुर्त्या स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. त्या सर्व मुर्त्या सुरसुंदरी,साधक, विष्णू, शिव यांच्या असून बऱ्याच मुर्त्यांची झीज झाल्याने त्या ओळखता येत नाहीत. मात्र, या सर्व मुर्त्यांवर दक्षिणात्य शिल्प शैलीचा प्रभाव दिसून येतो. 

टॅग्स :AmbajogaiअंबाजोगाईTempleमंदिरExcavationउत्खननArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणAurangabadऔरंगाबाद