शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडेचे PA अनंत गर्जे यांना अटक, आज कोर्टात हजर करणार !
2
"मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा
3
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
4
आजचे राशीभविष्य, २४ नोव्हेंबर २०२५: मन आनंदी राहील, आर्थिक लाभ होतील, नोकरीत लाभ होतील !
5
'बिग बॉस मराठी ६' लवकरच? कलर्स मराठीने शेअर केला 'धमाकेदार' प्रोमो, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
7
१५ दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता, २ डिसेंबरला लग्न पण त्याआधीच मयुरेशवर काळाने घाला घातला
8
वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं लग्न, वृंदावन मंदिरात अभिनेत्यासोबत अडकली विवाहबंधनात
9
"टर्मिनेटरसारखी फिरतेय..." श्रद्धा कपूरच्या पायाला दुखापत, स्वत: व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
10
‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
11
बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
12
पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
13
कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
14
मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस
15
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
16
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
17
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
18
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
19
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
20
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत होणार पहिले राज्यस्तरीय परिवर्तन साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 16:42 IST

आद्यकवी मुकुंदराज यांच्या भूमीत येथील परिवर्तन साहित्य मंडळ व घाटनांदूर येथील वसुंधरा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १७ जून रोजी पहिले राज्यस्तरीय परिवर्तन साहित्य संमेलन होणार आहे.

अंबाजोगाई (बीड ) :  आद्यकवी मुकुंदराज यांच्या भूमीत येथील परिवर्तन साहित्य मंडळ व घाटनांदूर येथील वसुंधरा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १७ जून रोजी पहिले राज्यस्तरीय परिवर्तन साहित्य संमेलन होणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष गोविंदराव देशमुख, प्रा.गौतम गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहाला स्व. डॉ. संतोष मुळावकर साहित्यनगरी असे नाव दिले असून १७ जून रोजी सकाळी नऊ वाजता उद्घाटन होईल. उद्घाटन सत्रात स्व.प्रा.रा.द. आरगडे व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष कुमार सप्तर्षी, उद्घाटक म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी आ. सतीश चव्हाण, माजी मंत्री पंडितराव दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, प्रा.एस.के. जोगदंड, रणजित लोमटे यांची उपस्थिती असेल. माजी प्राचार्य डॉ.साहेबराव गाठाळ, डॉ.विजया इंगोले, डॉ. गणपत राठोड, रविकिरण देशमुख, संतोष लहामगे, दत्ता वालेकर, विद्याधर पंडित, हर्षवर्धन मुंडे, विनोद गायकवाड यांचा सत्कार होईल.

दरम्यान, परिसंवादाचे दुसरे सत्र सकाळी ११ वाजता सुरू होईल.  ‘भारतीय शेती, पाणी, नियोजन, व्यवस्थापन’ हा परिसंवादाचा विषय असून या सत्राच्या  अध्यक्षस्थानी बजरंग सोनवणे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बच्चू कडू, विक्रम काळे, विचारवंत डॉ. डी. टी. गायकवाड, कालिदास आपेट हे उपस्थित राहतील.

साहित्य संमेलनातील तिसरे सत्र दुपारी ३ वाजता सुरू होईल. हे सत्र पुस्तक संस्कृती विकास प्रकल्पांतर्गत लोकसहभागातून परिवर्तन साहित्य मंडळाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा परिचय अशा स्वरूपाचे आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी वि. सो. वराट हे असून या सत्रात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे, शीतल बोधले, रामकिसन मस्के, डॉ. गायत्री गाडेकर, प्रा.डॉ.भारत हंडीबाग हे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे चौथे सत्र सायंकाळी ५ वाजता सुरू होईल. या वेळी जातीय सलोखा या विषयावर परिसंवाद होणार आहे.  अध्यक्षस्थानी माजी खा. रजनी पाटील या उपस्थित राहतील तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. सोमनाथ रोडे, अ‍ॅड. मीर फरकुंदअली उस्मानी हे असतील. साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विविध पुस्तकांचे होणार प्रकाशनपरिवर्तन साहित्य मंडळाच्या पुस्तक संस्कृती विकास प्रकल्पांतर्गत मान्यवर साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन  या संमेलनात केले जाणार आहे. त्यामुळे हे संमेलन वाचन चळवळीला प्रोत्साहन देणारे ठरणार आहे.

टॅग्स :literatureसाहित्यAmbajogaiअंबाजोगाईBeedबीड