शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

बीड जिल्हा रुग्णालयात आधीच ३ माता मृत्यू अन् आता महिलेला शस्त्रक्रिया न करताच काढले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 15:11 IST

जिल्हा रूग्णालयातील प्रकार : वरिष्ठांना सांगितल्यानंतर शस्त्रक्रिया यशस्वी

बीड : जिल्हा रूग्णालयात चालू महिन्यात तीन माता मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेबद्दल प्रश्न उपस्थित होत असतानाच मंगळवारी सकाळी एका महिलेला वेळ संपली असे कारण सांगून शस्त्रक्रिया गृहातून बाहेर काढले. हा प्रकार दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडला. त्यानंतर याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर त्यांनी धाव घेतली. त्यानंतर ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. परंतू या निमित्ताने गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

वडवणी तालुक्यातील एक महिला ८ एप्रिल रोजी जिल्हा रूग्णालयात दाखल झाली. अंगावरून लाल, पांढरे जाणे, पोट दुखणे आदी आजार होते. त्यामुळे या महिलेला गर्भपिशवी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सर्व तपासण्याही केल्या. परंतू आज-उद्या करून १५ एप्रिलपर्यंत या महिलेच्या शस्त्रक्रियाला टोलवाटोलवी केली. त्यानंतर १५ एप्रिल रोजी सकाळी साडे नऊ वाजता शस्त्रक्रिया गृहात नेले. परंतू १२ वाजेच्या सुमारास वेळ संपली असे सांगून या महिलेला बाहेर काढण्यात आले. त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणाची जिल्हा शल्य चिकित्सिक आणि आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

सीएस, एसीएस, आरएमओंची धावहा सर्व प्रकार नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय राऊत यांना सांगितला. त्यांनी तातडीने अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सदाशिव राऊत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे यांना शस्त्रक्रिया गृहात पाठविले. आगोदर या महिलेची समुपदेशन केले. त्यानंतर स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.किरण शिंदे, डॉ.वाघमारे आदींना बोलावून घेत गर्भपिशवीची गंभीर शस्त्रक्रिया यशस्त्री केली. वरिष्ठांनी दखल घेतली खरी, परंतू नातेवाईकांनी प्रत्येकवेळी वरिष्ठांनाच सांगायचे? संबंधित डॉक्टर, कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिक बजावत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.

दोन्ही राऊतांनी कठोर भूमिका घ्यावीसध्या जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.संजय राऊत तर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.सदाशिव राऊत आहेत. त्यांनी सेवेत हलगर्जी, टोलवाटोलवी करणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांना शोधून कान टोचण्याची गरज आहे. आपल्या स्वभावात बदल करून थोडी कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. आपले कोणीच काही करू शकत नाही, अशा अविर्भावात असणाऱ्यांना कारवाईचा दणका तर चांगले काम करणाऱ्यांचे कौतूक करणे आवश्यक आहे. जर असे केले नाही तर माता मृत्यू आणि रूग्णसेवेत हलगर्जी झाल्याच्या तक्रारी रोजच येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड